शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

अनाथांकरिता मसराम दाम्पत्य बनलेय नाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:31 IST

‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : अंत्यविधीसाठी करतात मयतीच्या सामग्रीचे दान

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. परंतु नशीबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा अन् निराश्रीत जीवनही येतात. अशा अनाथांचा अंत्यसंक्रार करण्यासाठी मयतीच्या साहित्याचे दान देऊन मसराम दांम्पत्य सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्यामुळे हा परिवार अनेक अनाथांसाठी शेवटच्या क्षणी का होईन नाथ होऊन उभा आहेत.जगणं-मरणं एका श्वासाचं अंतर असलं तरी आज पैशा, वैभव व प्रतिष्ठेच्या मागे जग धावतांना दिसतात. या आभासी जगात धडपडताना काहींना आपल्या सग्यासोयºयांचाही विसर पडतो. इतकच काय तर जन्मदात्या आई-वडीलांनाही अनाथाश्रमाच्या पायºया चढाव्या लागतात. तर काहींच्या आयुष्यात अपघाताने एकटेपण येतात. तेव्हा आयुष्यात केलेली धावपळ, मिळविलेले वैभव आणि संपत्तीही सारे निरर्थक वाटायला लागतात.पण, वेळ निघून गेल्यानंतर वाट्याला आलेल्या परिस्थितीत कुंठत जगावेच लागते. अशा अनाथ व निराश्रीतांचा अंत्यसंस्काराची जबाबदारीही दुसºयाच्याच खांद्यावर येऊन पडतात. अशावेळी अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी करायला आलेल्यांना पैसे मोजावे लागतात. त्यातही मग तडजोड करण्याची वेळ येते.हीच परिस्थिती लक्षात घेत राणी दुर्गावतीनगर इतवारा चौकातील सतीश सिताराम मसराम हे परिवारासह सामाजिक बांधलकी जोपासताना दिसून येत आहे.कधी साहित्य तर कधी अर्थसाहाय्यमसराम यांचे अंत्यसंस्काराकरिता आवश्यक असलेल्या साहित्य विक्रीचे दुकान आहे. या साहित्यविक्रीतून ते परिवाराचा उदर्निवाह करतात. मयतीचे साहित्य विक्रीचेच दुकान असल्याने येथे शोकाकूल असलेलेच साहित्य खरेदीसाठी येतात. सर्व धर्मांसाठी हा विधी वेगवेगळया पध्दतीने केला जातात. त्यामुळे त्यांच्या दु:खात सहभागी होत त्यांची अडचणीही मसराम दांम्पत्य जाणून घेतात. कधी साहित्य मोफ त देऊन तर कधी आर्थिक मदत करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.मयतीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. मित्राच्या सहकार्याने इतवारा परिसरात हा व्यवसाय सुरु केला असून त्यासाठी बँकेकडून कर्जही घेतले आहे. यावरच कुटूंबाचा उदर्निवाह सुरु आहे. आयुष्यात पैसाच सारं काही नाही, दु:खीतांच्या चेहºयावर हसू फुलविण्यासारखं दुसरं पुण्य नाही. यामुळे आम्ही अंत्यसंस्काराच्या साहित्य विक्रीतून काहींना सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. तसेच निराश्रीत व अनाथांच्या अंत्यविधीकरिता सहित्य मोफत देऊन माणुसकीच कर्तव्य निभावत आहे.सतीश सीताराम मसराम, राणी दुर्गावती नगर, इतवारा चौक़

टॅग्स :social workerसमाजसेवक