शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

अनाथांकरिता मसराम दाम्पत्य बनलेय नाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 22:31 IST

‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : अंत्यविधीसाठी करतात मयतीच्या सामग्रीचे दान

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘जगलो आयुष्य धकाधकीचे, संपन्नतेचे आणि संघर्षाचेही.पण त्याची काही तक्रार नाही. आता एकच मागणे की आयुष्याचा शेवट गोड व्हावा!’ आयुष्याच्या उत्तरार्धात अशीच साऱ्यांची अपेक्षा असते. परंतु नशीबाचे भोग भोगताना अनेकांच्या वाट्याला एकटेपणा अन् निराश्रीत जीवनही येतात. अशा अनाथांचा अंत्यसंक्रार करण्यासाठी मयतीच्या साहित्याचे दान देऊन मसराम दांम्पत्य सामाजिक बांधिलकी जोपासत आहे. त्यामुळे हा परिवार अनेक अनाथांसाठी शेवटच्या क्षणी का होईन नाथ होऊन उभा आहेत.जगणं-मरणं एका श्वासाचं अंतर असलं तरी आज पैशा, वैभव व प्रतिष्ठेच्या मागे जग धावतांना दिसतात. या आभासी जगात धडपडताना काहींना आपल्या सग्यासोयºयांचाही विसर पडतो. इतकच काय तर जन्मदात्या आई-वडीलांनाही अनाथाश्रमाच्या पायºया चढाव्या लागतात. तर काहींच्या आयुष्यात अपघाताने एकटेपण येतात. तेव्हा आयुष्यात केलेली धावपळ, मिळविलेले वैभव आणि संपत्तीही सारे निरर्थक वाटायला लागतात.पण, वेळ निघून गेल्यानंतर वाट्याला आलेल्या परिस्थितीत कुंठत जगावेच लागते. अशा अनाथ व निराश्रीतांचा अंत्यसंस्काराची जबाबदारीही दुसºयाच्याच खांद्यावर येऊन पडतात. अशावेळी अंत्यसंस्काराचे साहित्य खरेदी करायला आलेल्यांना पैसे मोजावे लागतात. त्यातही मग तडजोड करण्याची वेळ येते.हीच परिस्थिती लक्षात घेत राणी दुर्गावतीनगर इतवारा चौकातील सतीश सिताराम मसराम हे परिवारासह सामाजिक बांधलकी जोपासताना दिसून येत आहे.कधी साहित्य तर कधी अर्थसाहाय्यमसराम यांचे अंत्यसंस्काराकरिता आवश्यक असलेल्या साहित्य विक्रीचे दुकान आहे. या साहित्यविक्रीतून ते परिवाराचा उदर्निवाह करतात. मयतीचे साहित्य विक्रीचेच दुकान असल्याने येथे शोकाकूल असलेलेच साहित्य खरेदीसाठी येतात. सर्व धर्मांसाठी हा विधी वेगवेगळया पध्दतीने केला जातात. त्यामुळे त्यांच्या दु:खात सहभागी होत त्यांची अडचणीही मसराम दांम्पत्य जाणून घेतात. कधी साहित्य मोफ त देऊन तर कधी आर्थिक मदत करीत असल्याचे सांगण्यात आले आहे.मयतीचे साहित्य विक्रीचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. मित्राच्या सहकार्याने इतवारा परिसरात हा व्यवसाय सुरु केला असून त्यासाठी बँकेकडून कर्जही घेतले आहे. यावरच कुटूंबाचा उदर्निवाह सुरु आहे. आयुष्यात पैसाच सारं काही नाही, दु:खीतांच्या चेहºयावर हसू फुलविण्यासारखं दुसरं पुण्य नाही. यामुळे आम्ही अंत्यसंस्काराच्या साहित्य विक्रीतून काहींना सहाय्य करण्याचा प्रयत्न करतो. तसेच निराश्रीत व अनाथांच्या अंत्यविधीकरिता सहित्य मोफत देऊन माणुसकीच कर्तव्य निभावत आहे.सतीश सीताराम मसराम, राणी दुर्गावती नगर, इतवारा चौक़

टॅग्स :social workerसमाजसेवक