शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

बाजारात रूईचे दर वाढताहेत; कापसाचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:20 IST

सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे.

ठळक मुद्देबाजारातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ नाहीबोंडअळीचा प्रभाव कायम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे. यामुळेच कापसाला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, कापूस दरवाढीची शेतकऱ्यांची आशा मावळल्याचे चित्र आहे.अमेरिकेच्या कापूस बाजारात २०१७ साली १ किलो रूईचा भाव १ डॉलर ७९ सेंटच्या आसपास होता. यावेळी देशातील कापूस बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला ५,००० ते ५,५०० रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला होता. आज अमेरिकेत रूईचा भाव १ डॉलर ९५ सेंट आहे. म्हणजेच रूईबाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे भाव ४,७०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचेच आहे. चीन, बांग्लादेश, पाकिस्तान मधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. तरी मंदी का? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. यातच बोंडअळीच्या हल्ल्याने कापसाचा दर्जा खालावला असून त्याची मागणी नाही. व्यापाऱ्यांकडून कापसाला दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.सध्या कापसाना हमीभावापेक्षा जास्त भाव असल्याने कापूस आयातीकडे कुणाचेही लक्ष नाही. २०१५-१६ साली २२ लाख गाठी, २०१६-१७ साली ३० लाख गाठी आयात झाल्या होत्या. २०१७-१८ साली १७ लाख गाठी आयात होणार आहे. कापसावर आयातकर शून्य असल्यामुळे हा प्रकार घडत आहे.

सरकीच्या दरामुळे आशा मावळली२०१७ मध्ये सरकीच्या भावात विक्रमी तेजी होती. सरकारचे भाव २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढले होते. खाद्य तेलाच्या भावात मंदी होती तरी सरकीचे भाव तेजीत होते. त्यावेळी २,३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलचे भाव सरकी ढेपीचे होते.देशातील रूई बाजारात ३,९०० रुपये ते ४००० रुपये प्रती खंडी रूईचे भाव होते. यावेळी सरकीचे दर २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटल होते. म्हणूनच कापसाचे भाव ५५०० च्या आसपास होते. आज रूईचे भाव ४,००० रुपये ते ४,२०० रूपये खंडीचे आहेत; पण सरकीचा भाव १,६०० ते १,७०० रूपये प्रती क्विंटलचाच आहे. यामुळे कापसाला दर कमी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

म्हणूनच दर ४,८०० ते ५,००० रुपयांवर१ क्विंटल कापसापासून ३४ किलो रूई व ६५ किलो सरकी मिळते. १ खंडी रूई म्हणजे १.७० किलो रूईच्या दोन गाठी. म्हणजेच १० क्विंटल कापसापासून १ खंडी रूई व ६.५ क्विंटल सरकी मिळते. म्हणूनच आज कापसाला ४,८०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचे भाव मिळत आहे.

कापसाच्या दराबाबत अनेकांकडून विचारणा होत आहे. प्रारंभी सरकीला दर होता म्हणून कापसाला ५ हजारांच्या वर दर मिळाले. आता पुन्हा सरकीचे दर पडले असल्यामुळे कापसाचे दर कोसळले. यातच यंदाच्या कापसावर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळे व्यापाऱ्यांकडून कापसाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांना दर दिला जात नाही.- विजय जावंधिया, शेतकरी नेते,

टॅग्स :cottonकापूस