शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बाजारात रूईचे दर वाढताहेत; कापसाचे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 11:20 IST

सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे.

ठळक मुद्देबाजारातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ नाहीबोंडअळीचा प्रभाव कायम

रूपेश खैरी ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्या आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात रूईचे दर वाढले आहेत. यामुळे कापूस दरवाढीची अपेक्षा होती; पण तसे झाले नाही. बाजारात रूईचे दर वाढत असले तरी सरकीच्या दरातील घट कायम आहे. यामुळेच कापसाला दर मिळत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, कापूस दरवाढीची शेतकऱ्यांची आशा मावळल्याचे चित्र आहे.अमेरिकेच्या कापूस बाजारात २०१७ साली १ किलो रूईचा भाव १ डॉलर ७९ सेंटच्या आसपास होता. यावेळी देशातील कापूस बाजारात शेतकऱ्यांच्या कापसाला ५,००० ते ५,५०० रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला होता. आज अमेरिकेत रूईचा भाव १ डॉलर ९५ सेंट आहे. म्हणजेच रूईबाजारात तेजी आहे. तरी भारतात शेतकऱ्यांना मिळणारे कापसाचे भाव ४,७०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचेच आहे. चीन, बांग्लादेश, पाकिस्तान मधून भारतीय कापसाची मागणी वाढत आहे. तरी मंदी का? हा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. यातच बोंडअळीच्या हल्ल्याने कापसाचा दर्जा खालावला असून त्याची मागणी नाही. व्यापाऱ्यांकडून कापसाला दर मिळत नाही. यामुळे शेतकरी चिंतेत आहे.सध्या कापसाना हमीभावापेक्षा जास्त भाव असल्याने कापूस आयातीकडे कुणाचेही लक्ष नाही. २०१५-१६ साली २२ लाख गाठी, २०१६-१७ साली ३० लाख गाठी आयात झाल्या होत्या. २०१७-१८ साली १७ लाख गाठी आयात होणार आहे. कापसावर आयातकर शून्य असल्यामुळे हा प्रकार घडत आहे.

सरकीच्या दरामुळे आशा मावळली२०१७ मध्ये सरकीच्या भावात विक्रमी तेजी होती. सरकारचे भाव २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटलपर्यंत वाढले होते. खाद्य तेलाच्या भावात मंदी होती तरी सरकीचे भाव तेजीत होते. त्यावेळी २,३०० ते २४०० रुपये प्रती क्विंटलचे भाव सरकी ढेपीचे होते.देशातील रूई बाजारात ३,९०० रुपये ते ४००० रुपये प्रती खंडी रूईचे भाव होते. यावेळी सरकीचे दर २,५०० ते २,६०० रुपये प्रती क्विंटल होते. म्हणूनच कापसाचे भाव ५५०० च्या आसपास होते. आज रूईचे भाव ४,००० रुपये ते ४,२०० रूपये खंडीचे आहेत; पण सरकीचा भाव १,६०० ते १,७०० रूपये प्रती क्विंटलचाच आहे. यामुळे कापसाला दर कमी मिळत असल्याचे सांगण्यात येत आहे.

म्हणूनच दर ४,८०० ते ५,००० रुपयांवर१ क्विंटल कापसापासून ३४ किलो रूई व ६५ किलो सरकी मिळते. १ खंडी रूई म्हणजे १.७० किलो रूईच्या दोन गाठी. म्हणजेच १० क्विंटल कापसापासून १ खंडी रूई व ६.५ क्विंटल सरकी मिळते. म्हणूनच आज कापसाला ४,८०० ते ५,००० रुपये प्रती क्विंटलचे भाव मिळत आहे.

कापसाच्या दराबाबत अनेकांकडून विचारणा होत आहे. प्रारंभी सरकीला दर होता म्हणून कापसाला ५ हजारांच्या वर दर मिळाले. आता पुन्हा सरकीचे दर पडले असल्यामुळे कापसाचे दर कोसळले. यातच यंदाच्या कापसावर आलेल्या शेंदरी बोंडअळीमुळे व्यापाऱ्यांकडून कापसाकडे दुर्लक्ष केले जात आहे. शेतकऱ्यांना दर दिला जात नाही.- विजय जावंधिया, शेतकरी नेते,

टॅग्स :cottonकापूस