शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

बाजार समितीच्या वीजतंत्रीची वीरूगिरी

By admin | Updated: August 17, 2015 02:19 IST

बाजार समितीचे विजतंत्री अनंता साटोणे व दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरीने ...

चर्चेतून मार्ग : विविध मागण्यांकरिता आंदोलनहिंगणघाट : बाजार समितीचे विजतंत्री अनंता साटोणे व दोन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरीने प्रशासन व नागरिकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सायंकाळी पोलिसांनी पुढाकार घेत समिती पदाधिकारी व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा घडवून आणली; परंतु तोडगा निघाला नाही. यावर तोडगा काढण्याकरिता बुधवारी बाजार समिती कार्यालयात उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. शनिवारी सकाळी ८ वाजता विजतंत्री अनंता साटोणे, सेवानिवृत्त कर्मचारी शरद कदम, छत्रपती चौधरी यांनी टाकीवर चढून विरूगिरी आंदोलन केले. या आंदोलनाची सांगता सायंकाळी ६ वाजता पोलिसांच्या हस्तक्षेपाने झाली. यावेळी सहायक पोलीस उपनिरीक्षक विवेक लोणकर, मारोती उईके, शिपाई निरंजन वरभे, दिलीप आंबटकर, राजू तुळसकर, ऋषी घंगारे यांनी टाकीवर चढून आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. त्यानंतर नायब तहसीलदार अरविंद हिंगे यांनी साटोणे व अन्य कर्मचाऱ्यांशी बोलत समिती कार्यालयात पदाधिकाऱ्यांची चर्चा घडवून आणली. चर्चेच्यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव सूर्यवंशी, नायब तहसीलदार हिंगे, बाजार समिती उपसभापती हरिष वडतकर, बाजार समिती सचिव तुळसीदास चांभारे, संचालक मधुसुदन हरणे, अशोक उपासे, सुरेश सातोकर, संजय कातरे उपस्थित होते. बरीच चर्चा होऊन सुद्धा तोडगा निघाला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगांवकर यांचे उपस्थितीत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आंदोलनकर्त्यांसह संबंधीत अधिकारी उपस्थित राहणार आहेत.(तालुका प्रतिनिधी)आंदोलकांच्या मागण्यानियमबाह्य निलंबन मागे घेणे, २००५ पासून पावच्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणे, २००९ पासून सहावे वेतन आयोग लागू करून थकबाकी देणे, निलंबन काळातील थकीत पगाराची पुर्तता, रोखलेली २०११ -१२ ची वार्षिक वेतनवाढ, बडतर्फ काळातील वेतन, तसेच बाजार समितीसाठी आणलेल्या साहित्याची रक्कम मिळणे या मागण्यांचा समावेश आहे. या संदर्भात गत अनेक वर्षांपासून निवेदन देवून, न्यायालयीन लढा देत व प्रशासनाने तोडगा काढून सुद्धा मागण्यांची पूर्तता नसण्याचा आरोप यावेळी करण्यात आला. समिती नियमानुसार काही मागण्या पूर्ण करून काहींची पूर्तता करण्याची प्रक्रीया सुरू असण्याचे समिती प्रशासनाचे म्हणणे आहे.