शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:37 IST

सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसिंचनाकडे शेतकऱ्यांची धाव : भारनियमनाने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून शेतात उगविलेले अंकूर वाचिण्याकरिता सध्या अनेक प्रयोग केले जात आहे. कुठे फवाऱ्याच्या माध्यमातून अंकुरलेल्या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. तर कुठे मजुरांच्या सहायाने या अंकुरांना पाणी देत जगविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.हिंगणघाट परिसरात गज आठ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कपाशी लावण झाली. या भाग जवळपास ५० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांनी कापूस व सोयाबीनची पेरणी उकून घेतली. अशा पावसाचा पुढे फायदा होईल अशा आशेने मोठ्या प्रमाणात अर्थात ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. काही सोयाबीनला अंकुरही फुटले, रोपटे बाहेर आले. परंतु आता पाऊस नसल्याने वातावरण तापत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रोपट्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्यांच्या सोयाबीनचे बी-बियाणे अद्याप रोपट्यात रुपांतरीत व्हायचे आहेत त्यांचे बियाणे ही जमिनीत कोरडपणाने गुदमरून मरत आहे. शेतकरी आपले डोळे आभाळाकडे लावून बसले असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे.कापसाचे बियाणे लावल्यानंतर अचानकपणे उष्णतेत वाढ झाली आणि दमटपणा वाढला. दोन तीन दिवसात पावसाचे पुनरागमन झाल्यास दुबार पेरणीची परस्थिती टळेल. अन्यथा आर्थिक शेतकºयांना दुबार पेरणीच्या आर्थिक फटक्याची शक्यता आहे.बळीराजाला निसर्गाचा पहिला झटकानिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकरी आभाळाकडे डोके लावून बसले आहे. पावसाचे पुनरागमन सोडा एक थेंबही पडेल असे चित्र सध्या नसल्याचे दिसत आहे.पावसाची सुरुवात निर्धारीत वेळेआधी होणार असा अंदाज खरा ठरल्यानंतर पावसाने गत आठवड्यापुर्वी गर्जनेसह आगमन झाले. कुठे कुठे जबरदस्त पाऊसही झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. परंतु आता त्या करपण्याच्या मार्गावर आहे.शेतकरी मजुरांकडून पिकांना पाणीनारायणपूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने कपाशी पिकाला पाणी देत आहे. या माध्यमातून त्यांचा अंकुरलेली पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे. असा प्रयत्न करणे शेतकºयांकरिता आर्थिक अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती