शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:37 IST

सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसिंचनाकडे शेतकऱ्यांची धाव : भारनियमनाने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून शेतात उगविलेले अंकूर वाचिण्याकरिता सध्या अनेक प्रयोग केले जात आहे. कुठे फवाऱ्याच्या माध्यमातून अंकुरलेल्या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. तर कुठे मजुरांच्या सहायाने या अंकुरांना पाणी देत जगविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.हिंगणघाट परिसरात गज आठ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कपाशी लावण झाली. या भाग जवळपास ५० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांनी कापूस व सोयाबीनची पेरणी उकून घेतली. अशा पावसाचा पुढे फायदा होईल अशा आशेने मोठ्या प्रमाणात अर्थात ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. काही सोयाबीनला अंकुरही फुटले, रोपटे बाहेर आले. परंतु आता पाऊस नसल्याने वातावरण तापत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रोपट्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्यांच्या सोयाबीनचे बी-बियाणे अद्याप रोपट्यात रुपांतरीत व्हायचे आहेत त्यांचे बियाणे ही जमिनीत कोरडपणाने गुदमरून मरत आहे. शेतकरी आपले डोळे आभाळाकडे लावून बसले असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे.कापसाचे बियाणे लावल्यानंतर अचानकपणे उष्णतेत वाढ झाली आणि दमटपणा वाढला. दोन तीन दिवसात पावसाचे पुनरागमन झाल्यास दुबार पेरणीची परस्थिती टळेल. अन्यथा आर्थिक शेतकºयांना दुबार पेरणीच्या आर्थिक फटक्याची शक्यता आहे.बळीराजाला निसर्गाचा पहिला झटकानिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकरी आभाळाकडे डोके लावून बसले आहे. पावसाचे पुनरागमन सोडा एक थेंबही पडेल असे चित्र सध्या नसल्याचे दिसत आहे.पावसाची सुरुवात निर्धारीत वेळेआधी होणार असा अंदाज खरा ठरल्यानंतर पावसाने गत आठवड्यापुर्वी गर्जनेसह आगमन झाले. कुठे कुठे जबरदस्त पाऊसही झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. परंतु आता त्या करपण्याच्या मार्गावर आहे.शेतकरी मजुरांकडून पिकांना पाणीनारायणपूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने कपाशी पिकाला पाणी देत आहे. या माध्यमातून त्यांचा अंकुरलेली पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे. असा प्रयत्न करणे शेतकºयांकरिता आर्थिक अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती