शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

पीक जगविण्यासाठी अनेक प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 23:37 IST

सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देसिंचनाकडे शेतकऱ्यांची धाव : भारनियमनाने असंतोष

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : सध्या पावसाने दडी मारली आहे. यात शेतातील अंकुरे करपण्याच्या मार्गावर आली आहे. जर येत्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावली तरच शेतातील पिके वाचू शकतील अशी स्थिती निर्माण झाली आहे. या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून शेतात उगविलेले अंकूर वाचिण्याकरिता सध्या अनेक प्रयोग केले जात आहे. कुठे फवाऱ्याच्या माध्यमातून अंकुरलेल्या पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न होत आहे. तर कुठे मजुरांच्या सहायाने या अंकुरांना पाणी देत जगविण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू आहे.हिंगणघाट परिसरात गज आठ दिवसांत मोठ्या प्रमाणावर कपाशी लावण झाली. या भाग जवळपास ५० टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. आठ दहा दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे अनेक शेतकºयांनी कापूस व सोयाबीनची पेरणी उकून घेतली. अशा पावसाचा पुढे फायदा होईल अशा आशेने मोठ्या प्रमाणात अर्थात ६० ते ७० टक्के शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. काही सोयाबीनला अंकुरही फुटले, रोपटे बाहेर आले. परंतु आता पाऊस नसल्याने वातावरण तापत आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रोपट्यांच्या वाढीवर परिणाम होत आहे. ज्यांच्या सोयाबीनचे बी-बियाणे अद्याप रोपट्यात रुपांतरीत व्हायचे आहेत त्यांचे बियाणे ही जमिनीत कोरडपणाने गुदमरून मरत आहे. शेतकरी आपले डोळे आभाळाकडे लावून बसले असून पावसाची प्रतीक्षा कायम आहे.कापसाचे बियाणे लावल्यानंतर अचानकपणे उष्णतेत वाढ झाली आणि दमटपणा वाढला. दोन तीन दिवसात पावसाचे पुनरागमन झाल्यास दुबार पेरणीची परस्थिती टळेल. अन्यथा आर्थिक शेतकºयांना दुबार पेरणीच्या आर्थिक फटक्याची शक्यता आहे.बळीराजाला निसर्गाचा पहिला झटकानिसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोरडवाहू शेतकरी आभाळाकडे डोके लावून बसले आहे. पावसाचे पुनरागमन सोडा एक थेंबही पडेल असे चित्र सध्या नसल्याचे दिसत आहे.पावसाची सुरुवात निर्धारीत वेळेआधी होणार असा अंदाज खरा ठरल्यानंतर पावसाने गत आठवड्यापुर्वी गर्जनेसह आगमन झाले. कुठे कुठे जबरदस्त पाऊसही झाला. यामुळे शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या. परंतु आता त्या करपण्याच्या मार्गावर आहे.शेतकरी मजुरांकडून पिकांना पाणीनारायणपूर परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी मजुरांच्या हाताने कपाशी पिकाला पाणी देत आहे. या माध्यमातून त्यांचा अंकुरलेली पिके जगविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून आले आहे. असा प्रयत्न करणे शेतकºयांकरिता आर्थिक अडचणीचे ठरत आहे.

टॅग्स :agricultureशेती