शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

प्रियदर्शिनीचे वर्धा जिल्ह्याशी अनेक ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:08 IST

‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.

ठळक मुद्देइंदिरा गांधी जयंती विशेष : महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या अनेकदा घेतल्या भेटी

आॅनलाईन लोकमतवर्धा : ‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. आणीबाणीचा काळ असो वा सत्ता उपभोगण्याची वेळ असो, त्या वर्धेत आल्याचेच दिसून आले आहे. येथील सेवाग्राम आश्रम आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम इंदिरा गांधींकरिता नेहमी उर्जेचे स्त्रोतच राहिला आहे.इंदिराजींना दिली पवनारने संजीवनीइंदिरा गांधी व संजय गांधी यांचा पराभव झाल्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले. या काळात इंदिरा गांधी एकट्या पडल्या होत्या. त्यांनी वर्धा येथून पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे यांची भेट घेतली व येथून सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचे निश्चित केले. त्यानंतर काँग्रेसला देशात प्रचंड मोठा जनाधार मिळाला. सत्ता जात-येत असते; पण आपले पाय जमिनीवर कायम असावे लागतात, असा उल्लेख इंदिरा गांधी जयंतीच्या पुर्वसंध्येला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वर्धा येथे केला.विनोबांकडून इंदिराजींना अनेकदा मार्गदर्शनआचार्य विनोबा भावे यांनी इंदिरा गांधींना सत्तेवर असताना व नसतानाही अनेकदा मार्गदर्शन केले. इंदिरा गांधींनी १९७५ ते ७७ या काळात लागू केलेल्या आणीबाणीलाही विनोबांनी अनुशासन पर्व, असे सांगून त्यांचे समर्थन केले. इंदिरा गांधीजींच्या अडचणींच्या काळात त्या नेहमीच सेवाग्राम व पवनार आश्रमला भेट देत होत्या. त्यांनी वर्धा जिल्ह्याशी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.सेवाग्राम आश्रमात वृक्षारोपण आणि संदेशसेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात येत त्यांनी अनेकवेळा सभा घेतल्या. येथे आल्यानंतर त्यांनी १४ आॅक्टोबर १९७२ रोजी वृक्षारोपण केले. त्यांनी लावलेले बेलाचे वृक्ष आज इतरांना फळ देणारे ठरत आहे. हा बेल वृक्ष आश्रम परिसरात असून त्यावरील पाटी सर्वांना इंदिरा गांधी यांची आठवण करून देणारी ठरत असल्याचे आश्रम प्रतिष्ठान सांगत आहे.केळीचा घड भेटइंदिराजी नागपूरवरून पवनारकडे येताना सेलू येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करताना ८० किलो वजनाचा केळीचा घड भेट दिला. यावेळी खजिनदार सीताराम केसरी हजर होते. इंदिराजींनी ‘इंदिरा दिल्ली मे क्या कर रही है ये आप गाँव मे देख सकेंगे’, असा उल्लेख केला. त्यावेळी दिल्लीत कृष्णधवल टेलीव्हीजन सुरू झाले होते.