शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

प्रियदर्शिनीचे वर्धा जिल्ह्याशी अनेक ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 23:08 IST

‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.

ठळक मुद्देइंदिरा गांधी जयंती विशेष : महात्मा गांधी आणि विनोबा यांच्या अनेकदा घेतल्या भेटी

आॅनलाईन लोकमतवर्धा : ‘प्रियदर्शिनी’ या नावाने सर्वपरिचित असलेल्या इंदिरा गांधी यांचे वर्धा जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. आणीबाणीचा काळ असो वा सत्ता उपभोगण्याची वेळ असो, त्या वर्धेत आल्याचेच दिसून आले आहे. येथील सेवाग्राम आश्रम आणि भूदानाचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम इंदिरा गांधींकरिता नेहमी उर्जेचे स्त्रोतच राहिला आहे.इंदिराजींना दिली पवनारने संजीवनीइंदिरा गांधी व संजय गांधी यांचा पराभव झाल्यानंतर देशात जनता पक्षाचे सरकार आले. या काळात इंदिरा गांधी एकट्या पडल्या होत्या. त्यांनी वर्धा येथून पवनार आश्रमात आचार्य विनोबा भावे यांची भेट घेतली व येथून सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याचे निश्चित केले. त्यानंतर काँग्रेसला देशात प्रचंड मोठा जनाधार मिळाला. सत्ता जात-येत असते; पण आपले पाय जमिनीवर कायम असावे लागतात, असा उल्लेख इंदिरा गांधी जयंतीच्या पुर्वसंध्येला माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी वर्धा येथे केला.विनोबांकडून इंदिराजींना अनेकदा मार्गदर्शनआचार्य विनोबा भावे यांनी इंदिरा गांधींना सत्तेवर असताना व नसतानाही अनेकदा मार्गदर्शन केले. इंदिरा गांधींनी १९७५ ते ७७ या काळात लागू केलेल्या आणीबाणीलाही विनोबांनी अनुशासन पर्व, असे सांगून त्यांचे समर्थन केले. इंदिरा गांधीजींच्या अडचणींच्या काळात त्या नेहमीच सेवाग्राम व पवनार आश्रमला भेट देत होत्या. त्यांनी वर्धा जिल्ह्याशी आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.सेवाग्राम आश्रमात वृक्षारोपण आणि संदेशसेवाग्राम येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात येत त्यांनी अनेकवेळा सभा घेतल्या. येथे आल्यानंतर त्यांनी १४ आॅक्टोबर १९७२ रोजी वृक्षारोपण केले. त्यांनी लावलेले बेलाचे वृक्ष आज इतरांना फळ देणारे ठरत आहे. हा बेल वृक्ष आश्रम परिसरात असून त्यावरील पाटी सर्वांना इंदिरा गांधी यांची आठवण करून देणारी ठरत असल्याचे आश्रम प्रतिष्ठान सांगत आहे.केळीचा घड भेटइंदिराजी नागपूरवरून पवनारकडे येताना सेलू येथे कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत करताना ८० किलो वजनाचा केळीचा घड भेट दिला. यावेळी खजिनदार सीताराम केसरी हजर होते. इंदिराजींनी ‘इंदिरा दिल्ली मे क्या कर रही है ये आप गाँव मे देख सकेंगे’, असा उल्लेख केला. त्यावेळी दिल्लीत कृष्णधवल टेलीव्हीजन सुरू झाले होते.