शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

सीमोल्लंघन करून होतोय मनमर्जीने वाळूचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:25 IST

मागील चार ते पाच वर्षांपासून अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदीला पूर गेले नसल्याने नदीपात्रात वाळूचा साठा झाला नाही. अशाही स्थितीत शासनाकडून महसूलाच्या हव्यासापोटी वाळू घाटांचा लिलाव करतात.

ठळक मुद्देघाटधारकांची बनवाबनवी : वर्धा नदीपात्रात धुडगूस

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील चार ते पाच वर्षांपासून अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदीला पूर गेले नसल्याने नदीपात्रात वाळूचा साठा झाला नाही. अशाही स्थितीत शासनाकडून महसूलाच्या हव्यासापोटी वाळू घाटांचा लिलाव करतात. त्यातही घाटधारक आपली शक्कल लढवित ‘हम करे सो कायदा’ अशा अविर्भावात अधिकाऱ्यांशी घरोबा मांडून नियमबाह्य वाळू उपसा करतात. यात ते आपली हद्द सोडून दुसºयाच्या हद्दीतही शिरुन वाळूचोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात धुडगूस चालविल्याचे दिसून येत आहे.वर्धा नदीचे पात्र वर्धा आणि अमरावती जिल्ह्याची सीमा असल्यामुळे या नदीपात्रावर दोन्ही जिल्ह्याचा अधिकार आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या नदीपात्रातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया राबविली जाते. त्यात घाटधारक आपल्या कल्पकतेचा वापर करुन या घाटाकरिता कोट्यवधीची रोकड मोजतात. त्यानंतर मात्र नियमबाह्यरित्या आपल्यापरिणे वाळू उपसा करायला सुरुवात करतात. वाळू घाटांची सध्याची स्थिती बघितल्यास कुठेही सलग वाळू नाही. त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने पाण्यामध्ये रेती शोधून उपसा करतात. महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेखचे भूकमापक यांच्या उपस्थितीत एकदा सिमांकन झाल्यावर पुन्हा ते वाळूघाटाच्या सिमांकनाकडे लक्ष देत नाही. पात्रातील रेती सर्वत्र सारखीच असल्याने कुठे खोदकाम केले, याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असून घाटधारक वाहत्या गंगेत हात धुऊन घेत आहे. सोबतच स्थानिक प्रशासनाचेही हात ओले होत असल्याने जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.बनावट रॉयल्टीचा भरणावाळूघाटात रॉयल्टी पासेस वितरित करताना एका संदेशावर तीन-चार ट्रीप मारून वाळूचा अवैध उपसा करतात. हिंगणघाट तालुक्यातील पारडी घाटातून हिंगणघाट शहरात वाळूची टाकयची असल्यास पारडीपासून हिंगणघाटचे अंतर २३ कि.मी. असताना घाटधारक पारडीपासून हिंगणघाटपर्यंतची रॉयल्टी किंवा एसएमएस न करता तो पारडी ते आजी, खरांगणा, कारंजा, सेलू किंवा आर्वी अशा दुरच्या गावाचे नाव टाकून वाळूची वाहतुकीसाठी जास्त वेळ मिळवितो.ग्रा.पं. कराचाही चुराडाहद्द सोडून वाळूघाटाचा उपसा करताना ग्रामपंचायत पावतीचा बोगस कारभार केल्या जात असल्याची ओरड होत आहे. किती रुपयाचा लिलाव करायचा त्याची मोघम किंमत सांगून काही सरपंच व ग्रामसेवकांना मॅनेज करतात. त्यामुळे शासनाचा गौणखनिज महसुलासोबतच ग्रामपंचायतचा कर बुडविण्याचा प्रकार सुरु आहे.नियमावली बासनातसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे वाळूघाटात ड्रोनच्या सहाय्याने सीमांकन केल्याची नोंद, घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ता परवानगी तसेच पाण्यातील बोट व पोकलँड यावर बंदी यासारख्या ५७ नियमांची यादीच जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात ही नियमावली अंमलात आणली जात नसल्याने घाटधारकांचं चांगभल आहे.आरटीओचीही डोळेझाकमहसूल व वन अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये केवळ दोन ब्रासचीच रॉयल्टी परवानगी आहे. असे असताना ५ ते ६ ब्रॉसचे मोठे डंपर भरुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. परंतु, त्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :sandवाळू