शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सीमोल्लंघन करून होतोय मनमर्जीने वाळूचा उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 22:25 IST

मागील चार ते पाच वर्षांपासून अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदीला पूर गेले नसल्याने नदीपात्रात वाळूचा साठा झाला नाही. अशाही स्थितीत शासनाकडून महसूलाच्या हव्यासापोटी वाळू घाटांचा लिलाव करतात.

ठळक मुद्देघाटधारकांची बनवाबनवी : वर्धा नदीपात्रात धुडगूस

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील चार ते पाच वर्षांपासून अल्प पर्जन्यमान झाल्यामुळे वर्धा जिल्ह्यातील नदीला पूर गेले नसल्याने नदीपात्रात वाळूचा साठा झाला नाही. अशाही स्थितीत शासनाकडून महसूलाच्या हव्यासापोटी वाळू घाटांचा लिलाव करतात. त्यातही घाटधारक आपली शक्कल लढवित ‘हम करे सो कायदा’ अशा अविर्भावात अधिकाऱ्यांशी घरोबा मांडून नियमबाह्य वाळू उपसा करतात. यात ते आपली हद्द सोडून दुसºयाच्या हद्दीतही शिरुन वाळूचोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात धुडगूस चालविल्याचे दिसून येत आहे.वर्धा नदीचे पात्र वर्धा आणि अमरावती जिल्ह्याची सीमा असल्यामुळे या नदीपात्रावर दोन्ही जिल्ह्याचा अधिकार आहे. दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या नदीपात्रातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया राबविली जाते. त्यात घाटधारक आपल्या कल्पकतेचा वापर करुन या घाटाकरिता कोट्यवधीची रोकड मोजतात. त्यानंतर मात्र नियमबाह्यरित्या आपल्यापरिणे वाळू उपसा करायला सुरुवात करतात. वाळू घाटांची सध्याची स्थिती बघितल्यास कुठेही सलग वाळू नाही. त्यामुळे यंत्राच्या सहाय्याने पाण्यामध्ये रेती शोधून उपसा करतात. महसूल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेखचे भूकमापक यांच्या उपस्थितीत एकदा सिमांकन झाल्यावर पुन्हा ते वाळूघाटाच्या सिमांकनाकडे लक्ष देत नाही. पात्रातील रेती सर्वत्र सारखीच असल्याने कुठे खोदकाम केले, याचा अंदाजही येत नाही. त्यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत असून घाटधारक वाहत्या गंगेत हात धुऊन घेत आहे. सोबतच स्थानिक प्रशासनाचेही हात ओले होत असल्याने जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे.बनावट रॉयल्टीचा भरणावाळूघाटात रॉयल्टी पासेस वितरित करताना एका संदेशावर तीन-चार ट्रीप मारून वाळूचा अवैध उपसा करतात. हिंगणघाट तालुक्यातील पारडी घाटातून हिंगणघाट शहरात वाळूची टाकयची असल्यास पारडीपासून हिंगणघाटचे अंतर २३ कि.मी. असताना घाटधारक पारडीपासून हिंगणघाटपर्यंतची रॉयल्टी किंवा एसएमएस न करता तो पारडी ते आजी, खरांगणा, कारंजा, सेलू किंवा आर्वी अशा दुरच्या गावाचे नाव टाकून वाळूची वाहतुकीसाठी जास्त वेळ मिळवितो.ग्रा.पं. कराचाही चुराडाहद्द सोडून वाळूघाटाचा उपसा करताना ग्रामपंचायत पावतीचा बोगस कारभार केल्या जात असल्याची ओरड होत आहे. किती रुपयाचा लिलाव करायचा त्याची मोघम किंमत सांगून काही सरपंच व ग्रामसेवकांना मॅनेज करतात. त्यामुळे शासनाचा गौणखनिज महसुलासोबतच ग्रामपंचायतचा कर बुडविण्याचा प्रकार सुरु आहे.नियमावली बासनातसर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे वाळूघाटात ड्रोनच्या सहाय्याने सीमांकन केल्याची नोंद, घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे, रस्ता परवानगी तसेच पाण्यातील बोट व पोकलँड यावर बंदी यासारख्या ५७ नियमांची यादीच जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात ही नियमावली अंमलात आणली जात नसल्याने घाटधारकांचं चांगभल आहे.आरटीओचीही डोळेझाकमहसूल व वन अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये केवळ दोन ब्रासचीच रॉयल्टी परवानगी आहे. असे असताना ५ ते ६ ब्रॉसचे मोठे डंपर भरुन वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. परंतु, त्याकडे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :sandवाळू