शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

बोंडअळीचे पंचनामे १० दिवसात करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 22:05 IST

यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

ठळक मुद्देमोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने होणार पडताळणी

आॅनलाईन लोकमतआर्वी : यंदाच्या खरीपात बी.टी. वाणावर बोंडअळीने आक्रमण केल्याने कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर महसूल व वनविभागाचे उपसचिव सु.ह. उमराणीकर यांनी आदेश काढून दहा दिवसात या बोंडअळीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.पंचनामे करण्याकरिता आवश्यक कालावधी कमी असल्याने फोटो जीपीएस मोबाईल अ‍ॅपच्या सहाय्याने काढण्याचे आदेशात नमूद केले आहे. या पद्धतीने पंचनामे होणार असल्याने यात किती नुकसानग्रस्त शेतकरी पात्र ठरतात हे महत्त्वाचे ठरणार आहे.कपाशीवरील बोंडअळीच्या हल्ल्याचा थेट परिणाम कपाशी उत्पादनावर झाला. यात झालेल्या नुकसानीची पडताळणी मोबाईल अ‍ॅपद्वारे करण्यात येणार असल्याने या संबंधीत विभागाच्या कर्मचाºयांना हा अ‍ॅप आधी त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड करावा लागणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद होणार आहे.यातही महसूल विभागाच्या सातबारात संबंधीत शेतकऱ्यांच्या कपाशी पिकाची नोंद सातबारात असणे गरजेचे असल्याचे आदेशात नमूद आहे. यात सातबारे ‘अपडेट’ नसतील तर त्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळणार अथवा नाही असा प्रश्न आहे. पंचनाम्यात नुकसानीची टक्केवारी ३३ च्यावर असने आवश्यक आहे. यात आर्वी उपविभागात तीनही तालुके ३३ टक्क्यांच्या वर असल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीवर नांगर फिरविल्याने त्यांचा सर्व्हे होणार कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेकांनी फिरविले नांगरबोंडअळीच्या हल्ल्यामुळे त्रस्त झालेल्या अनेक शेतकºयांनी त्यांच्या शेतातील कपाशीवर नांगर चालविला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात आल्यास त्यांना याचा फायदा होईल अथवा नाही, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.