शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील प्रमुख मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:26 IST

शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीकडे डोळेझाक : वाहनचालकांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.प्रमुख मार्गावर राधिका उपाहारगृह परिसरासह अन्य ठिकाणी कित्येक दिवसांपासून खड्डे पडले असून सळाखीही उघड्या पडल्या आहेत. रहदारीकरिता त्या धोक्याच्या ठरत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना अपघाताला सामोरे लावे लागणार आहे. असे असताना दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासन उदासीन आहे. प्रशासनातील अतिमहत्वाचे लोक या सार्वजनिक रस्त्यावरून कधीच ये-जा करीत नाही की, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांतून केला जात आहे.मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याबाबत शासन-प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र कानाडोळा केला जात असल्याचेही पट्टेवार यांनी म्हटले आहे.शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खोल खड्डयांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. शाळा कॉलेज सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने व निष्पाप वाहन चालकांच्या जीवावर उठलेले खोल खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पट्टेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.हे आहेत शहरातील खड्ड्यांचे परिसरशहरातील केसरीमल कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदिती मेडिकल, राधिका उपाहारगृह, लोकमत कार्यालय, आरती चित्रपटगृह परिसर, यादव कॅन्टीन, इंगोले चौक यासह अन्य परिसरात कित्येक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे संपूर्ण परिसर वर्दळीचे आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात चालढकल केली जात आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करायच्या का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.