शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

शहरातील प्रमुख मार्गाला खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 21:26 IST

शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.

ठळक मुद्देदुरुस्तीकडे डोळेझाक : वाहनचालकांच्या जीविताला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील वर्दळीच्या प्रमुख मार्गावर पडलेले खोल खड्डे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांकरिता जीवघेणे ठरत आहेत. मात्र दुरुस्तीकडे डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सुरेश पट्टेवार यांनी केला आहे.प्रमुख मार्गावर राधिका उपाहारगृह परिसरासह अन्य ठिकाणी कित्येक दिवसांपासून खड्डे पडले असून सळाखीही उघड्या पडल्या आहेत. रहदारीकरिता त्या धोक्याच्या ठरत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. हे खड्डे चुकविताना वाहनचालकांना अपघाताला सामोरे लावे लागणार आहे. असे असताना दुरुस्तीच्या दृष्टीने प्रशासन उदासीन आहे. प्रशासनातील अतिमहत्वाचे लोक या सार्वजनिक रस्त्यावरून कधीच ये-जा करीत नाही की, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे, असा संतप्त सवाल वाहनचालकांतून केला जात आहे.मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्याबाबत शासन-प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. मात्र कानाडोळा केला जात असल्याचेही पट्टेवार यांनी म्हटले आहे.शहरातील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर पडलेल्या खोल खड्डयांमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. शाळा कॉलेज सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने व निष्पाप वाहन चालकांच्या जीवावर उठलेले खोल खड्डे त्वरित बुजविण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पट्टेवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.हे आहेत शहरातील खड्ड्यांचे परिसरशहरातील केसरीमल कन्या शाळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आदिती मेडिकल, राधिका उपाहारगृह, लोकमत कार्यालय, आरती चित्रपटगृह परिसर, यादव कॅन्टीन, इंगोले चौक यासह अन्य परिसरात कित्येक दिवसांपासून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे संपूर्ण परिसर वर्दळीचे आहेत. तरीदेखील प्रशासनाकडून खड्डे बुजविण्यात चालढकल केली जात आहे. एखादा अपघात झाल्यानंतरच उपाययोजना करायच्या का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.