शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

१४ हजार शेतकºयांना महावितरणची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:37 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते.

ठळक मुद्देजागृतीसाठी मेळावे : ६३,५९५ शेतकरी थकबाकीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. परिणामी, शेतकरी महावितरणचे थकबाकीदार होतात. या शेतकऱ्यांकरिता महावितरणद्वारे कृषी संजीवनी योजना राबविली अयूप नोव्हेंबर २०१७ पर्यंत १४ हजार ७७६ शेतकºयांनी लाभ घेतला आहे.महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा उपलब्ध होतो. पिकांचे ओलित करताना कृषी पंप चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची देयके येतात. काही शेतकरी ही रक्कम प्रत्येक महिन्यात अदा करण्याची क्षमता ठेवतात तर काहींना ते शक्य होत नाही. परिणामी, ते वर्षानुवर्षे महावितरणचे देयक अदा करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या रकमा थकित राहतात. वर्धा जिल्ह्यात २०१७ पर्यंत तब्बल ६३ हजार ५९५ शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे महावितरणचे ९१ कोटी ९२ लाख रुपयांचे देयक थकलेले आहे. शेतकऱ्यांनी ही रक्कम अदा करावी म्हणून महावितरणकडून अनेक योजना राबविल्या जातात; पण पिकांची स्थिती पाहता ती रक्कम अदा करणे शक्य होत नाही. मग, ते शेतकरी इच्छा नसतानाही थकबाकीदार होतात. अशा शेतकऱ्यांकरिता महावितरणकडून कृषी संजीवनी योजना राबविली जाते. २०१७ मध्येही थकबाकीदार शेतकºयांकरिता ही योजना राबविण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत नोंदणी करणे गरजेचे होते. नोंदणी केल्यानंतर थकित देयकाच्या रकमेवरील व्याज माफ करून हप्ते पाडून दिले जातात. शिवाय या योजनेत सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक तिमाहीत नियमित देयक आणि कृषी संजीवनी योजनेचे हप्ते भरणे अनिवार्य केले आहे.जिल्ह्यातील १४ हजार ७७६ शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून थकित असलेल्या देयकाच्या रकमेपोटी पहिला हप्ता म्हणून २ कोटी ३२ लाख रुपये महावितरणला प्राप्त झाले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून गावोगावी मेळावे घेण्यात आले. जागृतीसाठी वाहनांद्वारे ग्रामस्थांना माहितीही देण्यात आली. असे असले तरी सर्व शेतकरी या योजनेत सहभागी झाले नाही. आता सदर योजनेची मुदत वाढवून थकबाकीदार शेतकºयांना पुन्हा एक संधी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.अखंडित वीज पुरवठ्यासाठी बिल भरणे गरजेचेकृषी पंपाकरिता वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांना थ्री-फेजचा वीज पुरवठा द्यावा लागतो. यात शेतकºयांना अधिक देयक येत असल्याने ती रक्कम अदा करणे शेतकºयांकडून शक्य होत नाही. असे असले तरी अखंडित वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना देयक अदा करणे गरजेचे आहे. यात कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांना मदतगार ठरत आहे; पण काहीच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे उर्वरित थकित देयकांकरिता महावितरणला कठोर पावलेच उचलावी लागणार असल्याचे दिसते.शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेत थकबाकी अदा करणे गरजेचे होते. या योजनेच्या माध्यमातून हे शक्य झाले असते. जिल्ह्यातील १४ हजार शेतकºयांनी योजनेत सहभाग घेत २.३२ कोटींची देयके अदा केली आहेत. ही योजना शेतकºयांच्याच फायद्यासाठी राबविण्यात आली.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.