शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

१४ हजार शेतकºयांना महावितरणची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:37 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते.

ठळक मुद्देजागृतीसाठी मेळावे : ६३,५९५ शेतकरी थकबाकीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. परिणामी, शेतकरी महावितरणचे थकबाकीदार होतात. या शेतकऱ्यांकरिता महावितरणद्वारे कृषी संजीवनी योजना राबविली अयूप नोव्हेंबर २०१७ पर्यंत १४ हजार ७७६ शेतकºयांनी लाभ घेतला आहे.महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा उपलब्ध होतो. पिकांचे ओलित करताना कृषी पंप चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची देयके येतात. काही शेतकरी ही रक्कम प्रत्येक महिन्यात अदा करण्याची क्षमता ठेवतात तर काहींना ते शक्य होत नाही. परिणामी, ते वर्षानुवर्षे महावितरणचे देयक अदा करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या रकमा थकित राहतात. वर्धा जिल्ह्यात २०१७ पर्यंत तब्बल ६३ हजार ५९५ शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे महावितरणचे ९१ कोटी ९२ लाख रुपयांचे देयक थकलेले आहे. शेतकऱ्यांनी ही रक्कम अदा करावी म्हणून महावितरणकडून अनेक योजना राबविल्या जातात; पण पिकांची स्थिती पाहता ती रक्कम अदा करणे शक्य होत नाही. मग, ते शेतकरी इच्छा नसतानाही थकबाकीदार होतात. अशा शेतकऱ्यांकरिता महावितरणकडून कृषी संजीवनी योजना राबविली जाते. २०१७ मध्येही थकबाकीदार शेतकºयांकरिता ही योजना राबविण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत नोंदणी करणे गरजेचे होते. नोंदणी केल्यानंतर थकित देयकाच्या रकमेवरील व्याज माफ करून हप्ते पाडून दिले जातात. शिवाय या योजनेत सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक तिमाहीत नियमित देयक आणि कृषी संजीवनी योजनेचे हप्ते भरणे अनिवार्य केले आहे.जिल्ह्यातील १४ हजार ७७६ शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून थकित असलेल्या देयकाच्या रकमेपोटी पहिला हप्ता म्हणून २ कोटी ३२ लाख रुपये महावितरणला प्राप्त झाले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून गावोगावी मेळावे घेण्यात आले. जागृतीसाठी वाहनांद्वारे ग्रामस्थांना माहितीही देण्यात आली. असे असले तरी सर्व शेतकरी या योजनेत सहभागी झाले नाही. आता सदर योजनेची मुदत वाढवून थकबाकीदार शेतकºयांना पुन्हा एक संधी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.अखंडित वीज पुरवठ्यासाठी बिल भरणे गरजेचेकृषी पंपाकरिता वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांना थ्री-फेजचा वीज पुरवठा द्यावा लागतो. यात शेतकºयांना अधिक देयक येत असल्याने ती रक्कम अदा करणे शेतकºयांकडून शक्य होत नाही. असे असले तरी अखंडित वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना देयक अदा करणे गरजेचे आहे. यात कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांना मदतगार ठरत आहे; पण काहीच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे उर्वरित थकित देयकांकरिता महावितरणला कठोर पावलेच उचलावी लागणार असल्याचे दिसते.शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेत थकबाकी अदा करणे गरजेचे होते. या योजनेच्या माध्यमातून हे शक्य झाले असते. जिल्ह्यातील १४ हजार शेतकºयांनी योजनेत सहभाग घेत २.३२ कोटींची देयके अदा केली आहेत. ही योजना शेतकºयांच्याच फायद्यासाठी राबविण्यात आली.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.