शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

१४ हजार शेतकºयांना महावितरणची संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 23:37 IST

शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते.

ठळक मुद्देजागृतीसाठी मेळावे : ६३,५९५ शेतकरी थकबाकीदार

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांना सिंचनाकरिता थ्री-फेजचा विद्युत पुरवठा केला जातो. शेतातील विहिरींवर, बोअरवर कृषी पंप लावून शेतकरी पिकांचे ओलित करतात. सध्याच्या स्थितीत अनेक आर्थिक अडचणी येत असल्याने शेतकºयांना वीज देयक अदा करणे शक्य नसते. परिणामी, शेतकरी महावितरणचे थकबाकीदार होतात. या शेतकऱ्यांकरिता महावितरणद्वारे कृषी संजीवनी योजना राबविली अयूप नोव्हेंबर २०१७ पर्यंत १४ हजार ७७६ शेतकºयांनी लाभ घेतला आहे.महावितरणकडून शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज पुरवठा उपलब्ध होतो. पिकांचे ओलित करताना कृषी पंप चालविले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या रकमेची देयके येतात. काही शेतकरी ही रक्कम प्रत्येक महिन्यात अदा करण्याची क्षमता ठेवतात तर काहींना ते शक्य होत नाही. परिणामी, ते वर्षानुवर्षे महावितरणचे देयक अदा करू शकत नाहीत. यामुळे त्यांच्यावर मोठ्या रकमा थकित राहतात. वर्धा जिल्ह्यात २०१७ पर्यंत तब्बल ६३ हजार ५९५ शेतकरी थकबाकीदार आहेत. या शेतकऱ्यांकडे महावितरणचे ९१ कोटी ९२ लाख रुपयांचे देयक थकलेले आहे. शेतकऱ्यांनी ही रक्कम अदा करावी म्हणून महावितरणकडून अनेक योजना राबविल्या जातात; पण पिकांची स्थिती पाहता ती रक्कम अदा करणे शक्य होत नाही. मग, ते शेतकरी इच्छा नसतानाही थकबाकीदार होतात. अशा शेतकऱ्यांकरिता महावितरणकडून कृषी संजीवनी योजना राबविली जाते. २०१७ मध्येही थकबाकीदार शेतकºयांकरिता ही योजना राबविण्यात आली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत नोंदणी करणे गरजेचे होते. नोंदणी केल्यानंतर थकित देयकाच्या रकमेवरील व्याज माफ करून हप्ते पाडून दिले जातात. शिवाय या योजनेत सहभाग घेतल्यानंतर प्रत्येक तिमाहीत नियमित देयक आणि कृषी संजीवनी योजनेचे हप्ते भरणे अनिवार्य केले आहे.जिल्ह्यातील १४ हजार ७७६ शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून थकित असलेल्या देयकाच्या रकमेपोटी पहिला हप्ता म्हणून २ कोटी ३२ लाख रुपये महावितरणला प्राप्त झाले आहेत. ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे म्हणून गावोगावी मेळावे घेण्यात आले. जागृतीसाठी वाहनांद्वारे ग्रामस्थांना माहितीही देण्यात आली. असे असले तरी सर्व शेतकरी या योजनेत सहभागी झाले नाही. आता सदर योजनेची मुदत वाढवून थकबाकीदार शेतकºयांना पुन्हा एक संधी देण्यासाठी प्रयत्न होत असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.अखंडित वीज पुरवठ्यासाठी बिल भरणे गरजेचेकृषी पंपाकरिता वीज पुरवठा करताना शेतकऱ्यांना थ्री-फेजचा वीज पुरवठा द्यावा लागतो. यात शेतकºयांना अधिक देयक येत असल्याने ती रक्कम अदा करणे शेतकºयांकडून शक्य होत नाही. असे असले तरी अखंडित वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना देयक अदा करणे गरजेचे आहे. यात कृषी संजीवनी योजना शेतकऱ्यांना मदतगार ठरत आहे; पण काहीच शेतकºयांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यामुळे उर्वरित थकित देयकांकरिता महावितरणला कठोर पावलेच उचलावी लागणार असल्याचे दिसते.शेतकºयांनी कृषी संजवनी योजनेचा लाभ घेत थकबाकी अदा करणे गरजेचे होते. या योजनेच्या माध्यमातून हे शक्य झाले असते. जिल्ह्यातील १४ हजार शेतकºयांनी योजनेत सहभाग घेत २.३२ कोटींची देयके अदा केली आहेत. ही योजना शेतकºयांच्याच फायद्यासाठी राबविण्यात आली.- सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता, महावितरण, वर्धा.