शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती संदर्भातील 58 तक्रारी प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 05:00 IST

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ५३ हजार ६७३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करून त्याची अंमबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील तब्बल ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली असली, तरी अजूनही ५८ तक्रारी प्रलंबित आहेत.महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांची कर्ज खाते बँकांकडून अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी ५४ हजार ८४४ कर्जबाजारी शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर ५३ हजार ६७३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. तर याच योजनेसंदर्भात २ हजार २०५ तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार १४७ तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून सध्या स्थितीत ५८ तक्रारी प्रलंबित आहेत. यातील १३ तक्रारी जिल्हा पातळीवर, तर ४५ तक्रारी तालुकास्तरावर प्रलंबित आहेत. या तक्रारींचाही वेळीच निपटारा होणार असल्याचे सांगण्यात आले. एकूणच ही योजना शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे. 

३,९८२ शेतकऱ्यांचे काय?योजना जाहीर होताच जिल्ह्यातील ५८ हजार ८२६ शेतकऱ्यांचे कर्ज खाते बँकांनी अपलोड केले. त्यानंतर ५४,८४४ खाते योजनेचा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले. आतापर्यंत आधारप्रमाणीत केलेल्या ५३,६७३ पैकी ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला. पण बँकांनी अपलोड केलेल्या उर्वरित ३,९८२ शेतकऱ्यांचे पुढे काय? हा प्रश्न कायम आहे.

काय म्हणतात शेतकरी

युती सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या तुलनेत महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली कर्जमुक्ती योजना पारदर्शी आहे. ही योजना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली आहे.- नंदराज वैद्य, शेतकरी.

शासनाने कर्जमाफी देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव दिला पाहिजे. कारण खत, बियाणे आदींचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा वेळी हमीभाव हा शेतकऱ्यांना दिलासाच देईल.- दिवाकर महाजन, शेतकरी.

२,२०५ शेतकऱ्यांच्या तक्रारी

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेशी संदर्भात जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांच्या आतापर्यंत २ हजार २०५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी ८६८ तक्रारींचा निपटारा जिल्हा पातळीवर, तर १ हजार २७९ तक्रारींचा निपटारा तालुकास्तरावर करण्यात आला आहे.

५२,७२६ शेतकऱ्यांना मिळाले ४६५.७७ कोटी-    महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जिल्ह्यातील आधार प्रमाणीकरण केलेल्या ५२ हजार ७२६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल ४६५.७७ कोटींची रक्कम वळती करण्यात आली आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज