शहरं
Join us  
Trending Stories
1
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
3
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
4
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
5
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
6
देशभरात इन्व्हेस्टमेंट स्कॅमचे जाळे; सहा महिन्यांत 30 हजार लोकांची फसवणूक, ₹1500 कोटी लुटले
7
पश्चिम सीमेवर भारताचे तिन्ही सैन्य दल पाकिस्तानची झोप उडवणार; NOTAM जारी, १२ दिवस काय घडणार?
8
LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन
9
Shocking: पोट दुखतंय म्हणून मुलाला दवाखान्यात नेलं; मेडिकल रिपोर्ट पाहून आई-वडील हादरले!
10
Rohit Sharma Century: रोहितचा मोठा धमाका! सिडनीच्या मैदानात साजरं केलं शतकांचं 'अर्धशतक'
11
VIDEO: तरूणी बनली 'स्पायडर वूमन'! कशाचाही आधार न घेता झपाझप भिंतींवर चढली अन्...
12
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
13
SBI ठरली 'वर्ल्ड्स बेस्ट कन्झुमर बँक'; दोन मोठ्या पुरस्कांनी सन्मान, पाहा कोणी दिला?
14
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
15
'या' देशाचा झेंडा आहे जगातील सगळ्यात जुना ध्वज! गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलंय नाव
16
छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षल हिंसाचार; बीजापूरमध्ये दोन ग्रामस्थांची निर्घृण हत्या, परिसरात दहशत
17
IND vs AUS : हिटमॅन रोहितचा आणखी एक हिट शो! सचिन तेंडुलकरनंतर असा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय
18
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
19
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
20
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...

महात्मा गांधींची विचार दृष्टी जगासाठी प्रासंगिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:41 IST

महत्मा गांधी यांची विचार दृष्टी भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे. गांधीजींच्या सभ्यता विषयक विचारांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि रामराज्य एकसमान आहेत. मनुष्य विरोधी सभ्यतेच्या विरोधात उभे असणारे गांधी एकमेव होत असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देरजनीशकुमार शुक्ल : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात त्रीदिवसीय राष्ट्रीय परिसंवाद

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महत्मा गांधी यांची विचार दृष्टी भारतच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रासंगिक आहे. गांधीजींच्या सभ्यता विषयक विचारांचे मूल्यांकन होणे आवश्यक आहे. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि रामराज्य एकसमान आहेत. मनुष्य विरोधी सभ्यतेच्या विरोधात उभे असणारे गांधी एकमेव होत असे विचार महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रा. रजनीशकुमार शुक्ल यांनी व्यक्त केले.भारतीय इतिहास अनुसंधान परिषद, नवी दिल्ली आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ाांधी आणि त्यांची समसामयिक प्रासंगिकता : समाज, संस्कृती आणि स्वराज या विषयावर महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त तीन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनपर कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर प्रा. रामजी सिंह, प्रा. सतीशचंद्र मित्तल, डॉ. बालमुकुंद पाण्डेय, प्रा. कुमार रतनम्, प्रा. अरविंद जामखेडकर आदींची उपस्थिती होती.प्रा. रामजी सिंह म्हणाले की, गांधीजी संपूर्ण विश्वाचे आहेत. त्यांची १५० वी जयंती साजरी करणे हा आपला धर्म आहे. आज संपूर्ण विश्व गांधीजीच्या विचाराकडे बघत आहे. त्यांच्या प्रासंगिकतेला कोणी विरोध करू शकत नाही. गांधीजीनी आध्यात्मिक अभियांत्रिकी सोबत सामाजिक अभियात्रिकीची जोड दिली होती. व्यक्तिच्या विकासाकरिता त्यांनी एकादश व्रत दिले. तर समस्त समाजाच्या विकासासाठी १८ कार्यक्रम दिलेत. गांधीजीच्या सात्विक दृष्टीने समाज निर्माण करण्यासाठी आम्हाला विचार केला पाहिजे असेही ते म्हणाले.प्रा. कुमार रतनम् म्हणाले की, गांधी जीवन, विचार आणि तत्वज्ञान आहे. ते राष्ट्रभाषेचा विचार करत रामराज्य स्थापनेची कल्पना करतात. गांधी आर्थिक विचारांचे परिचायक आहे. गांधीजीच्या विचारांची पुनर्स्थापना करण्याची वेळ आता आली आहे असे ते म्हणाले. गांधीजीचे भारतीय परिस्थिती सोबत तादात्म्य दिसते. दैहिक तापांपासून परावृत्त होऊन जगण्याचा विचार त्यांचे तत्वज्ञान सांगते. गांधीजीकडे सात्विक शक्ती असून त्यांचे स्वराज्या पासून तर खादीपर्यंतचे विचार आजही प्रासंगिक आहेत, असे डॉ. बालमुकुंद पांडेय यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. विनोदकुमार यांनी केले तर आभार कुलसचिव प्रा.कृष्णकुमार सिंह यांनी मानले. याप्रसंगी माजी कुलगुरू प्रा. जी. गोपीनाथन, के. एम. मालती, अनंतराम त्रिपाठी, जवाहर कर्नावट, हेमचंद्र वैद्य, हितेंद्र पटेल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.शांतीकरिता त्यांचे विचार व एकात्मता प्रासंगिक - अरविंद जामखेडकरदक्षिण अफ्रीकेच्या स्वातंत्र्याकरिता गांधीजी प्रेरणेचे स्त्रोत बनले. शांततेकरिता त्यांचे विचार व एकात्मता प्रासंगिक आहे, असे यावेळी भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. अरविंद जामखेडकर यांनी सांगितले. त्यांनी गांधीजींच्या विषयी उपस्थितांना माहिती दिली.चार तत्त्व गांधी विचाराचा महत्त्वाचा आधार - सतीशचंद्र मित्तलसत्य, अहिंसा, परस्पर प्रेम आणि आध्यात्मिकता हे चार महत्वपूर्ण तत्व गांधी विचाराचा महत्वाचा आधार आहे, असे याप्रसंगी प्रा. सतीशचंद्र मित्तल यांनी स्पष्ट केले.शिवाय त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचार हे कसे आजही प्रेरक आहेत याची माहिती दिली.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीRajnish Kumarरजनीश कुमार