शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:42 IST

गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते.

ठळक मुद्देमेधा पाटकर : विश्व अहिंसा दिवसानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते. त्यांच्या सत्याग्रह चळवळीला आपण समजावून घेतले पाहिजे, असे विचार नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी गांधी विचार परिषदेचे निदेशक डॉ. भारत महोदय, वक्ता म्हणून मिलिंद बोकील, आश्रम अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ व ‘खरा तो एकची धर्म’ भजन व प्रार्थना म्हटल्यानंतर सूतमाळ, शाल, पुस्तक व चरखा देत भरत महोदय यांच्या हस्ते मेधा पाटकर व मिलिंद बोकील यांचा सन्मान करण्यात आला.मेधा पाटकर म्हणाल्या, सत्ता परिवर्तन अहिंसेच्या माध्यमातून झाले पाहिजे. अहिंसेलाच मूल्य माणून आपली विचारधारा बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. विकासाच्या नावावर बांधे बनविण्यात आले; पण याचा फायदा मात्र उद्योगपतींना होत आहे. कापूस उत्पादक आत्महत्या करीत असला तरी शेतकºयांपेक्षा धनदांडग्या उद्योगपतींचे हित सांभाळण्यात सरकार धन्यता मानत आहे. केंद्रीयकृत व्यवस्थेतील शोषण थांबवायचे असेल तर अहिंसेशिवाय पर्याय नसल्याचे पाटकर यांनी सांगितले.मिलिंद बोकील म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील मी कार्यकर्ता असून गांधी विचार माझ्यात रूजला. बापूंनी सत्याच्या प्रयोगातून आपल्या चुकांची कबुली दिली. देव दगडात नसून तो सत्यात असल्याचे गांधीजींनी दाखवून दिले. भरत महोदय यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर ‘जय जगत’ या प्रशांत गुजर यांच्या गीताने सांगता झाली.प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यकर्ता, शाळा महाविद्यालय, संस्था, गांधीवादी आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.