शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:42 IST

गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते.

ठळक मुद्देमेधा पाटकर : विश्व अहिंसा दिवसानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते. त्यांच्या सत्याग्रह चळवळीला आपण समजावून घेतले पाहिजे, असे विचार नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी गांधी विचार परिषदेचे निदेशक डॉ. भारत महोदय, वक्ता म्हणून मिलिंद बोकील, आश्रम अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ व ‘खरा तो एकची धर्म’ भजन व प्रार्थना म्हटल्यानंतर सूतमाळ, शाल, पुस्तक व चरखा देत भरत महोदय यांच्या हस्ते मेधा पाटकर व मिलिंद बोकील यांचा सन्मान करण्यात आला.मेधा पाटकर म्हणाल्या, सत्ता परिवर्तन अहिंसेच्या माध्यमातून झाले पाहिजे. अहिंसेलाच मूल्य माणून आपली विचारधारा बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. विकासाच्या नावावर बांधे बनविण्यात आले; पण याचा फायदा मात्र उद्योगपतींना होत आहे. कापूस उत्पादक आत्महत्या करीत असला तरी शेतकºयांपेक्षा धनदांडग्या उद्योगपतींचे हित सांभाळण्यात सरकार धन्यता मानत आहे. केंद्रीयकृत व्यवस्थेतील शोषण थांबवायचे असेल तर अहिंसेशिवाय पर्याय नसल्याचे पाटकर यांनी सांगितले.मिलिंद बोकील म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील मी कार्यकर्ता असून गांधी विचार माझ्यात रूजला. बापूंनी सत्याच्या प्रयोगातून आपल्या चुकांची कबुली दिली. देव दगडात नसून तो सत्यात असल्याचे गांधीजींनी दाखवून दिले. भरत महोदय यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर ‘जय जगत’ या प्रशांत गुजर यांच्या गीताने सांगता झाली.प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यकर्ता, शाळा महाविद्यालय, संस्था, गांधीवादी आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.