शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:42 IST

गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते.

ठळक मुद्देमेधा पाटकर : विश्व अहिंसा दिवसानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते. त्यांच्या सत्याग्रह चळवळीला आपण समजावून घेतले पाहिजे, असे विचार नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी गांधी विचार परिषदेचे निदेशक डॉ. भारत महोदय, वक्ता म्हणून मिलिंद बोकील, आश्रम अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ व ‘खरा तो एकची धर्म’ भजन व प्रार्थना म्हटल्यानंतर सूतमाळ, शाल, पुस्तक व चरखा देत भरत महोदय यांच्या हस्ते मेधा पाटकर व मिलिंद बोकील यांचा सन्मान करण्यात आला.मेधा पाटकर म्हणाल्या, सत्ता परिवर्तन अहिंसेच्या माध्यमातून झाले पाहिजे. अहिंसेलाच मूल्य माणून आपली विचारधारा बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. विकासाच्या नावावर बांधे बनविण्यात आले; पण याचा फायदा मात्र उद्योगपतींना होत आहे. कापूस उत्पादक आत्महत्या करीत असला तरी शेतकºयांपेक्षा धनदांडग्या उद्योगपतींचे हित सांभाळण्यात सरकार धन्यता मानत आहे. केंद्रीयकृत व्यवस्थेतील शोषण थांबवायचे असेल तर अहिंसेशिवाय पर्याय नसल्याचे पाटकर यांनी सांगितले.मिलिंद बोकील म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील मी कार्यकर्ता असून गांधी विचार माझ्यात रूजला. बापूंनी सत्याच्या प्रयोगातून आपल्या चुकांची कबुली दिली. देव दगडात नसून तो सत्यात असल्याचे गांधीजींनी दाखवून दिले. भरत महोदय यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर ‘जय जगत’ या प्रशांत गुजर यांच्या गीताने सांगता झाली.प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यकर्ता, शाळा महाविद्यालय, संस्था, गांधीवादी आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.