शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीला समजणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 22:42 IST

गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते.

ठळक मुद्देमेधा पाटकर : विश्व अहिंसा दिवसानिमित्त कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : गांधीजींनी जीवनात कला, कौशल्य आदी गुणांना महत्त्वाचे मानले. ते सत्यावर चालणारे सत्याग्रही होते. त्यांच्या सत्याग्रह चळवळीला आपण समजावून घेतले पाहिजे, असे विचार नर्मदा बचाव आंदोलनच्या प्रणेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.विश्व अहिंसा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी गांधी विचार परिषदेचे निदेशक डॉ. भारत महोदय, वक्ता म्हणून मिलिंद बोकील, आश्रम अध्यक्ष जयवंत मठकर उपस्थित होते.आनंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो’ व ‘खरा तो एकची धर्म’ भजन व प्रार्थना म्हटल्यानंतर सूतमाळ, शाल, पुस्तक व चरखा देत भरत महोदय यांच्या हस्ते मेधा पाटकर व मिलिंद बोकील यांचा सन्मान करण्यात आला.मेधा पाटकर म्हणाल्या, सत्ता परिवर्तन अहिंसेच्या माध्यमातून झाले पाहिजे. अहिंसेलाच मूल्य माणून आपली विचारधारा बनविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. विकासाच्या नावावर बांधे बनविण्यात आले; पण याचा फायदा मात्र उद्योगपतींना होत आहे. कापूस उत्पादक आत्महत्या करीत असला तरी शेतकºयांपेक्षा धनदांडग्या उद्योगपतींचे हित सांभाळण्यात सरकार धन्यता मानत आहे. केंद्रीयकृत व्यवस्थेतील शोषण थांबवायचे असेल तर अहिंसेशिवाय पर्याय नसल्याचे पाटकर यांनी सांगितले.मिलिंद बोकील म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतील मी कार्यकर्ता असून गांधी विचार माझ्यात रूजला. बापूंनी सत्याच्या प्रयोगातून आपल्या चुकांची कबुली दिली. देव दगडात नसून तो सत्यात असल्याचे गांधीजींनी दाखवून दिले. भरत महोदय यांच्या अध्यक्षीय भाषणानंतर ‘जय जगत’ या प्रशांत गुजर यांच्या गीताने सांगता झाली.प्रास्ताविक जयवंत मठकर यांनी केले. संचालन करीत उपस्थितांचे आभार प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला कार्यकर्ता, शाळा महाविद्यालय, संस्था, गांधीवादी आदींसह पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.