शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

९ ते १५ ॲागस्टपर्यंत राज्यभर ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान; मविआला सहकार्य!

By रवींद्र चांदेकर | Updated: July 11, 2024 22:49 IST

सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानचे दोनदिवसीय अधिवेशन घेण्यात आले.

वर्धा: लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यात मिळविलेले यश मर्यादित असले, तरी आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दगाबाजी व बेकायदेशीररीत्या लादलेले भाजप सरकार घालवून महाविकास आघाडीला संपूर्ण यश मिळवून देण्याचा निर्धार भारत जोडो अभियानच्या अधिवेशनात घेण्यात आला. त्यासाठी राज्यात ९ ते १५ ऑगस्टपर्यंत ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानचे दोनदिवसीय अधिवेशन घेण्यात आले. त्यात विविध ठराव आणि निर्णय घेण्यात आले. त्यात ९ ॲागस्टला मुंबईत ॲागस्ट क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. स्वाभिमानी, समृद्ध, समतावादी व सहिष्णू महाराष्ट्र निर्मितीसीठी भारत जोडो अभियानची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली. ‘केंद्र व राज्य सरकार हिसाब करो-जबाब दो’ अभियान राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कर रूपाने व औद्योगिक उलाढालीत राज्याचा वाटा राज्याला मिळालाच पाहिजे. नवे प्रकल्प परराज्यात न जाऊ देता राज्याचा विकास करावा. शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचा घसरलेला संयुक्त महाराष्ट्र पुन्हा सावरूया. भाजपाच्या अयोध्येतील परभवाने सांप्रदायिक धार बोथट होत असल्याने राज्यातही दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याकांना न्याय हवा, अशा मागण्याही अधिवेशनात करण्यात आल्या.

ओबीसीविरुद्ध मराठा लढाई राज्यासाठी घातक

राज्यात सुरू असलेली ओबीसीविरुद्ध मराठा लढाई ही भाजपाचा खेळ असल्याचा आरोप अधिवेशनात करण्यात आला. यावेळी अभियानच्या विभागीय समित्या गठित करण्यात आल्या. त्यात विदर्भ समन्वयक - अविनाश काकडे, रुबिना पटेल, प्रशांत ठाकरे, मराठवाडा- सुभाष लोमटे, दत्ता तुमवाड, कोकण- मुक्ता श्रीवास्तव, राजन इंदुलकर, पश्चिम महाराष्ट्र- मानव कांबळे, संदीप बर्वे, तर उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून अविनाश पाटील, जालिंदर अडसुळे यांची निवड करण्यात आली. प्रदेश प्रशिक्षण समितीत राजू भिसे, प्रा. नूतन माळवी, निश्चय म्हात्रे, महाराष्ट्र समन्वयक म्हणून उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगला गोपाल यांची निवड झाल्याचे विदर्भ समन्वयक अविनाश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी