शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

९ ते १५ ॲागस्टपर्यंत राज्यभर ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान; मविआला सहकार्य!

By रवींद्र चांदेकर | Updated: July 11, 2024 22:49 IST

सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानचे दोनदिवसीय अधिवेशन घेण्यात आले.

वर्धा: लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्यात मिळविलेले यश मर्यादित असले, तरी आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दगाबाजी व बेकायदेशीररीत्या लादलेले भाजप सरकार घालवून महाविकास आघाडीला संपूर्ण यश मिळवून देण्याचा निर्धार भारत जोडो अभियानच्या अधिवेशनात घेण्यात आला. त्यासाठी राज्यात ९ ते १५ ऑगस्टपर्यंत ‘नफरत छोडो-भारत जोडो’ अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.

सेवाग्राम येथे भारत जोडो अभियानचे दोनदिवसीय अधिवेशन घेण्यात आले. त्यात विविध ठराव आणि निर्णय घेण्यात आले. त्यात ९ ॲागस्टला मुंबईत ॲागस्ट क्रांती मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. स्वाभिमानी, समृद्ध, समतावादी व सहिष्णू महाराष्ट्र निर्मितीसीठी भारत जोडो अभियानची कटिबद्धता व्यक्त करण्यात आली. ‘केंद्र व राज्य सरकार हिसाब करो-जबाब दो’ अभियान राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला.

कर रूपाने व औद्योगिक उलाढालीत राज्याचा वाटा राज्याला मिळालाच पाहिजे. नवे प्रकल्प परराज्यात न जाऊ देता राज्याचा विकास करावा. शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांचा घसरलेला संयुक्त महाराष्ट्र पुन्हा सावरूया. भाजपाच्या अयोध्येतील परभवाने सांप्रदायिक धार बोथट होत असल्याने राज्यातही दलित, आदिवासी, ओबीसी व अल्पसंख्याकांना न्याय हवा, अशा मागण्याही अधिवेशनात करण्यात आल्या.

ओबीसीविरुद्ध मराठा लढाई राज्यासाठी घातक

राज्यात सुरू असलेली ओबीसीविरुद्ध मराठा लढाई ही भाजपाचा खेळ असल्याचा आरोप अधिवेशनात करण्यात आला. यावेळी अभियानच्या विभागीय समित्या गठित करण्यात आल्या. त्यात विदर्भ समन्वयक - अविनाश काकडे, रुबिना पटेल, प्रशांत ठाकरे, मराठवाडा- सुभाष लोमटे, दत्ता तुमवाड, कोकण- मुक्ता श्रीवास्तव, राजन इंदुलकर, पश्चिम महाराष्ट्र- मानव कांबळे, संदीप बर्वे, तर उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणून अविनाश पाटील, जालिंदर अडसुळे यांची निवड करण्यात आली. प्रदेश प्रशिक्षण समितीत राजू भिसे, प्रा. नूतन माळवी, निश्चय म्हात्रे, महाराष्ट्र समन्वयक म्हणून उल्का महाजन, ललित बाबर, संजय मंगला गोपाल यांची निवड झाल्याचे विदर्भ समन्वयक अविनाश काकडे यांनी सांगितले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडी