शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

Maharashtra Election 2019 ; सहा पदव्युत्तर तर पाच अंडरग्रॅज्युएट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 6:00 AM

यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

ठळक मुद्देप्रमुख उमेदवारांची शैक्षणिक पात्रता : पंकज भोयर आचार्य तर समीर देशमुख अभियांत्रिकी पदवी प्राप्त

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासकीय कार्यालयात कारकुनाची नोकरी मिळविण्याकरिता बारावी उत्तीर्ण हवे; पण राजकारणात शिक्षणाची कोणतीही अट नसल्यानेच देशाचे वाटोळे होत असल्याची ओरड नेहमीच मतदारांकडून केली जाते.पण, यावर्षी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये पाच उमेदवार हे उच्च अंडरग्रॅज्युएट तर सहा उमेदवार हे पदव्युत्तर आहेत.यामध्ये वर्धा विधानसभा क्षेत्रातील डॉ. पंकज भोयर हे उच्चशिक्षित असून त्यांनी नागपूर विद्यापीठातून आचार्य पदवी तर देवळी विधानसभा क्षेत्रातील रणजित कांबळे यांनी न्यूयॉर्क (युएसए) मधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच समीर देशमुख हे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे.जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी विधानसभा मतदारसंघात नामांकन अर्जाच्या छाननीनंतर ५७ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरीय मान्यताप्राप्त पक्ष आणि मोठ्या प्रमाणात अपक्ष उमेदवारांचाही समावेश आहे. या सर्व उमेदवारांपैकी चारही मतदारसंघातील ११ प्रमुख उमेदवारांच्या शपथपत्रावरून शैक्षणिक पात्रतेचा आढावा घेतला आहे. यात वर्धा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे डॉ. पंकज भोयर, काँग्रेसचे शेखर शेंडे, देवळीतील काँग्रेसचे रणजित कांबळे, शिवसेनेचे समीर देशमुख, अपक्ष राजेश बकाने, हिंगणघाटमधील भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी. तर आर्वी मतदारसंघातील काँग्रेसचे अमर काळे व भाजपचे दादाराव केचे यांचा समावेश आहे. या प्रमुख उमेदवारांमध्ये सहा उमेदवार पदव्युत्तर असून त्यात डॉ. पंकज भोयर, रणजित कांबळे, समीर देशमुख, सुधीर कोठारी, राजू तिमांडे व दादाराव केचे यांचा समावेश आहे, तर उर्वरित पाच उमेदवार हे बारावी तसेच अंडरग्रॅज्युएट आहेत.उच्चशिक्षितांचा वाढतोय कलजिल्ह्यातील चारही मतदार संघातील प्रमुख उमेदवारांपैकी प्रत्येक मतदार संघातून एक ते दोन उमेदवार उच्चशिक्षित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता उच्चशिक्षितांचाही राजकारणाकडे कल वाढला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

टॅग्स :wardha-acवर्धाPankaj Bhoyarपंकज भोयर