शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

Maharashtra Election 2019 ; सात उमेदवारांचे नामांकनपत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत.

ठळक मुद्देतीन मतदारसंघात प्रत्येकी दोन अर्ज बाद । हिंगणघाटात एक नामांकन रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात छाननीदरम्यान ७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट मतदारसंघातील उमेदवार अतुल वांदिले यांच्यासह आर्वी, देवळी वर्धा मतदार संघातून प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. एकूण ५७ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान वैध ठरले आहेत.आर्वी मतदारसंघात एकूण १२ उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले होते. छाननीदरम्यान बसपचे सुनील देशमुख व अपक्ष माधव देशमुख यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले. आर्वी मतदारसंघात आता १० उमेदवार रिंगणात आहेत. देवळी मतदार संघात २१ उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी २ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान रद्द झाले. यामध्ये जय महाभारत पार्टीचे सुनील पाटील व भाजपचे दिनेश किसना शिरभाते यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आता येथे १९ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत. ७ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अखेरची दिनांक असून त्यानंतर मतदार संघातील लढती व उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारी छाननी झाल्यानंतर रविवारी ६ ऑक्टोबरला सुटी आल्याने प्रशासनाकडे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होईल.मनसे उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने खळबळहिंगणघाट - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी १८ उमेदवारांच्या नामांकन अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांनी उमेदवारी अर्जासोबत नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या निदर्शनास आणून शनिवारी अर्जाच्या छाननीपूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जांच्या छाननीपर्यंत वांदिले यांनी नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी दिली. आता उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १७ उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, बसपचे विलास नानाजी टेंभरे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे डॉ. उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दमडू वारलू मडावी, लोकजागर पाटीर्चे मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. शनिवारी छाननीनंतर एकूण १७ उमेदवार मैदानात आहेत. सोमवारी, ७ ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.सर्वाधिक उमेदवार देवळीतसर्वाधिक १९ उमेदवारी अर्ज देवळी मतदारसंघात छाननीनंतर शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येथे सर्वाधिक उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. एका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांचे चिन्ह दिले जाऊ शकतात. उमेदवारांचा आकडा वाढल्यास दुसरी ईव्हीएम मशीन द्यावी लागेल. त्यामुळे छाननीनंतरच या बाबीचे नियोजन प्रशासन करेल. सद्यस्थितीत वर्धा व आर्वीत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी १० तर देवळीत १९ व हिंगणघाटमध्ये १८ उमेदवार मैदानात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षी हिंगणघाट मतदारसंघात एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :hinganghat-acहिंगणघाट