शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

Maharashtra Election 2019 ; सात उमेदवारांचे नामांकनपत्र रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 06:00 IST

हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत.

ठळक मुद्देतीन मतदारसंघात प्रत्येकी दोन अर्ज बाद । हिंगणघाटात एक नामांकन रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदार संघात छाननीदरम्यान ७ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहेत. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हिंगणघाट मतदारसंघातील उमेदवार अतुल वांदिले यांच्यासह आर्वी, देवळी वर्धा मतदार संघातून प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज रद्द झाले आहेत. एकूण ५७ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान वैध ठरले आहेत.आर्वी मतदारसंघात एकूण १२ उमेदवारांनी नामांकनपत्र दाखल केले होते. छाननीदरम्यान बसपचे सुनील देशमुख व अपक्ष माधव देशमुख यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले. आर्वी मतदारसंघात आता १० उमेदवार रिंगणात आहेत. देवळी मतदार संघात २१ उमेदवारांचे नामांकन पत्र दाखल झाले होते. त्यापैकी २ उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान रद्द झाले. यामध्ये जय महाभारत पार्टीचे सुनील पाटील व भाजपचे दिनेश किसना शिरभाते यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. आता येथे १९ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत.हिंगणघाट मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. येथे १८ उमेदवार मैदानात राहिले आहेत. वर्धा विधानसभा मतदारसंघात १३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. येथे बसपचे मोहन राईकवार, बळीराज पार्टीचे कैलास भोसे यांचे उमेदवारी अर्ज रद्द झाले आहे. येथे आता १० उमेदवार मैदानात आहेत. ७ ऑक्टोबर ही अर्ज मागे घेण्याची अखेरची दिनांक असून त्यानंतर मतदार संघातील लढती व उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार आहे. शनिवारी छाननी झाल्यानंतर रविवारी ६ ऑक्टोबरला सुटी आल्याने प्रशासनाकडे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार नाही. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतरच राजकीय लढतीचे चित्र स्पष्ट होईल.मनसे उमेदवाराचा अर्ज रद्द झाल्याने खळबळहिंगणघाट - हिंगणघाट विधानसभा मतदारसंघासाठी १८ उमेदवारांच्या नामांकन अर्जाच्या छाननीत मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांचा उमेदवारी अर्ज बाद होऊन १७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत १८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यापैकी मनसेचे उमेदवार अतुल वांदिले यांनी उमेदवारी अर्जासोबत नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. ही बाब निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या निदर्शनास आणून शनिवारी अर्जाच्या छाननीपूर्वी सादर करण्याची सूचना दिली होती. परंतु अर्जांच्या छाननीपर्यंत वांदिले यांनी नोटरी केलेले शपथपत्र सादर केले नाही. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत रद्द ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांनी दिली. आता उमेदवारी अर्ज वैध ठरलेल्या १७ उमेदवारांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राजू तिमांडे, अपक्ष अ‍ॅड. सुधीर कोठारी, बसपचे विलास नानाजी टेंभरे, संभाजी ब्रिगेडचे प्रशांत देशमुख, वंचित आघाडीचे डॉ. उमेश सोमाजी वावरे, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे दमडू वारलू मडावी, लोकजागर पाटीर्चे मनीष पांडुरंग नांदे, अपक्ष मंदा रमेश ठवरे, श्याम इडपवार, मनीष भीमराव कांबळे, प्रशांत रामचंद्र पवार यांचा समावेश आहे. शनिवारी छाननीनंतर एकूण १७ उमेदवार मैदानात आहेत. सोमवारी, ७ ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच लढतीचे चित्र स्पष्ट होईल.सर्वाधिक उमेदवार देवळीतसर्वाधिक १९ उमेदवारी अर्ज देवळी मतदारसंघात छाननीनंतर शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे येथे सर्वाधिक उमेदवार रिंगणात राहण्याची शक्यता आहे. एका ईव्हीएम मशिनवर १६ उमेदवारांचे चिन्ह दिले जाऊ शकतात. उमेदवारांचा आकडा वाढल्यास दुसरी ईव्हीएम मशीन द्यावी लागेल. त्यामुळे छाननीनंतरच या बाबीचे नियोजन प्रशासन करेल. सद्यस्थितीत वर्धा व आर्वीत सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी १० तर देवळीत १९ व हिंगणघाटमध्ये १८ उमेदवार मैदानात आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे, यावर्षी हिंगणघाट मतदारसंघात एका महिला उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे.

टॅग्स :hinganghat-acहिंगणघाट