ठळक मुद्देरत्नीबाई विद्यालयातर्फे रॅली : चारशेवर विद्यार्थ्यांचा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा निवडणूक अधिकारी वर्धा व रत्नीबाई विद्यालय वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदारांमध्ये मतदानाविषयी जागृती निर्माण व्हावी तसेच वर्धा जिल्ह्याने १०० टक्के मतदानाची पातळी गाठावी या उद्देशाने जनजागृती रॅली काढण्यात आली.रत्नीबाई विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीचे ४०० विद्यार्थी तसेच मुख्याध्यापक नागमोते, शिक्षण विस्तार अधिकारी विजय राजमलवार, केंद्रस्तरीय मतदान अधिकारी भाग क्र.२२०, सुहास जाधव, पर्यवेक्षक टेकाडे, शेषराव पाटील, अनुप इंगोले, सुरेंद्र लव्हाळे, मसराम, माथनकर, तुरक्याल, आधारसिंग पाटील, जुगनाके व इतर २२ शिक्षकांनी परिसरात मतदार जनजागृती रॅली काढून मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृती केली.