शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देभाजी बाजारातील चित्र : जमावबंदी कायद्याचेही उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखण्यासोबतच गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्धेकरांकडून नियम पायदळी तुडविले जात असल्याचे शुक्रवारी भाजी बाजारात दिसून आले.देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या अनुषंगाने भाजी विक्रीच्या दुकानासमोर चुन्याने आखणीही करण्यात आली. याला ग्राहकांनीही प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी बाजार महादेवपुरा येथे हलविण्यात आला. तर स्वावलंबी मैदानावरील भाजी बाजार तेथेच आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी भरणाºया भाजी बाजारात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. शुक्रवारी महादेवपुºयातील भाजी बाजारात पदोपदी सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी होताना दिसली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि नागरिकांच्या झालेल्या गर्दीमुळे जमावबंदी कायद्याचेही येथे सर्रास उल्लंघन होत होते. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नागरिकांनी स्वत: जागरूक असण्यासोबतच काळजी घेणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने नागरिक आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यात नागरिकांनी दररोजच भाजी बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत.वर्ध्यात मात्र, नागरिकांकडून रस्त्यांवर अनावश्यक फिरणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे आदी कृत्य करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. कोरोनाला जिल्ह्यात प्रवेशबंदी करायची असेल तर नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे, असे सुज्ञ नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस