शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
5
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
6
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
7
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
8
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
9
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
10
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
11
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
12
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
13
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
14
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
15
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
16
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
17
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
18
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
19
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू

महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देभाजी बाजारातील चित्र : जमावबंदी कायद्याचेही उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखण्यासोबतच गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्धेकरांकडून नियम पायदळी तुडविले जात असल्याचे शुक्रवारी भाजी बाजारात दिसून आले.देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या अनुषंगाने भाजी विक्रीच्या दुकानासमोर चुन्याने आखणीही करण्यात आली. याला ग्राहकांनीही प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी बाजार महादेवपुरा येथे हलविण्यात आला. तर स्वावलंबी मैदानावरील भाजी बाजार तेथेच आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी भरणाºया भाजी बाजारात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. शुक्रवारी महादेवपुºयातील भाजी बाजारात पदोपदी सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी होताना दिसली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि नागरिकांच्या झालेल्या गर्दीमुळे जमावबंदी कायद्याचेही येथे सर्रास उल्लंघन होत होते. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नागरिकांनी स्वत: जागरूक असण्यासोबतच काळजी घेणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने नागरिक आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यात नागरिकांनी दररोजच भाजी बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत.वर्ध्यात मात्र, नागरिकांकडून रस्त्यांवर अनावश्यक फिरणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे आदी कृत्य करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. कोरोनाला जिल्ह्यात प्रवेशबंदी करायची असेल तर नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे, असे सुज्ञ नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस