शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
3
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
7
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
8
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
9
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
10
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
11
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
12
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
13
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
14
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
15
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
16
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
17
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
18
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
19
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
20
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना

महादेवपुऱ्यात सोशल डिस्टन्सिंगचा ‘भाजीपाला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देभाजी बाजारातील चित्र : जमावबंदी कायद्याचेही उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग अर्थात सामाजिक अंतर राखण्यासोबतच गर्दी टाळण्याचे वेळोवेळी आवाहन केले जात आहे. मात्र, वर्धेकरांकडून नियम पायदळी तुडविले जात असल्याचे शुक्रवारी भाजी बाजारात दिसून आले.देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजाराच्या पूर्वीच्या ठिकाणी गर्दी होत असल्याने जिल्हा प्रशासनाने स्वावलंबी विद्यालयाचे मैदान आणि डॉ. आंबेडकर पुतळा परिसरात भाजी व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून दिली. सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या अनुषंगाने भाजी विक्रीच्या दुकानासमोर चुन्याने आखणीही करण्यात आली. याला ग्राहकांनीही प्रतिसाद दिला. सद्यस्थितीत डॉ. आंबेडकर पुतळा परिसरातील भाजी बाजार महादेवपुरा येथे हलविण्यात आला. तर स्वावलंबी मैदानावरील भाजी बाजार तेथेच आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी भरणाºया भाजी बाजारात प्रशासनाचे नियम पायदळी तुडविले जात आहेत. शुक्रवारी महादेवपुºयातील भाजी बाजारात पदोपदी सोशल डिस्टन्सिंगची ऐसीतैशी होताना दिसली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभी केलेली वाहने आणि नागरिकांच्या झालेल्या गर्दीमुळे जमावबंदी कायद्याचेही येथे सर्रास उल्लंघन होत होते. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता नागरिकांनी स्वत: जागरूक असण्यासोबतच काळजी घेणे गरजेचे आहे. वर्धा जिल्ह्यात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने नागरिक आपल्याला काही होत नाही, याच भ्रमात असल्याचे दिसून येते. इतर जिल्ह्यात नागरिकांनी दररोजच भाजी बाजारात गर्दी न करण्याचे आवाहन केले जात असून नागरिकही त्याला प्रतिसाद देत आहेत.वर्ध्यात मात्र, नागरिकांकडून रस्त्यांवर अनावश्यक फिरणे, मास्कचा वापर न करणे, गर्दी करणे आदी कृत्य करून प्रशासनाच्या आवाहनाला हरताळ फासण्याचे काम केले जात आहे. कोरोनाला जिल्ह्यात प्रवेशबंदी करायची असेल तर नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे, असे सुज्ञ नागरिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस