शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

कांचनपूर, वाही गावात महाश्रमदानाचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:00 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केला गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा : वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.या श्रमदानात वैद्यकीय जनजागृती मंच, रेड क्रॉस सोसायटी, आर्वी, आदर्श कॉम्प्युटर क्लासेसच्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कांचनपूरच्या सरपंच राजश्री धारगावे आणि ग्रामसेवक बोबडे तसेच सुमेध भस्मे यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी मिळून अवघ्या तीन तासांमध्ये श्रमदानातून शेततळे तयार केले.यावेळी आदर्श कॉम्प्युटरच्या श्रुती पजई आणि आकांक्षा घोंगडे या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांसोबत शेततळ्यातच वाढदिवस साजरा केला. वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे आणि सदस्यांनी रोपवाटिका तसेच इतर जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांनी पारंपरिक बासरी आणि डफ वाजवून आलेल्या श्रमदात्यांचे स्वागत केले. कामानंतर श्रमदात्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद ही घेतला.वाही येथे राजू पावडे, गणेश गजकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय जनजागृती मंचाची चमू तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्वीच्या चमूने भेट देत जवळपास शंभर मीटर लांबीचा कांटूर बांध बनविला. गारपिटीच्या तडाख्याने उदध्वस्त झालेल्या या गावातील महिला पुरुष गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान करताना दिसले. त्यांनी जवळपास सीसीपीचे काम पूर्ण केलेले होते. गावात जवळपास शंभर टक्के शोषखड्डे झालेले असून, रोपवाटिकेमध्ये १ हजार ५०० झाडांची लागवड झालेली आहे. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून न राहता एकजुटीच्या ताकदीने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान करीत आहेत.यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरुण पावडे आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रभाकर राऊत, श्याम भेंडे, सचिन गरपाल, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार, यांच्यासह सदस्य तथा आदर्श कॉम्प्युटरचे मंगेश दिवटे आणि विद्यार्थी, पुलगाव येथून आलेले प्रवीण लोखंडे, प्रवीण होनाडे, अजय अराटे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोसकं फिरलं आता ह्या पाण्यासाठीतीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे ६०० असली तरी त्यांचे बळ ६ हजार लोकांचे असल्याचे येथे झालेल्या कामावरून दिसून आले. गावात दुष्काळ असतानाही गावकऱ्यांकडून होत असलेल्या कामांकडे कधी पाठ झाली नसल्याचे येथील कामांवरून दिसून आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा