शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कांचनपूर, वाही गावात महाश्रमदानाचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:00 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केला गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा : वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.या श्रमदानात वैद्यकीय जनजागृती मंच, रेड क्रॉस सोसायटी, आर्वी, आदर्श कॉम्प्युटर क्लासेसच्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कांचनपूरच्या सरपंच राजश्री धारगावे आणि ग्रामसेवक बोबडे तसेच सुमेध भस्मे यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी मिळून अवघ्या तीन तासांमध्ये श्रमदानातून शेततळे तयार केले.यावेळी आदर्श कॉम्प्युटरच्या श्रुती पजई आणि आकांक्षा घोंगडे या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांसोबत शेततळ्यातच वाढदिवस साजरा केला. वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे आणि सदस्यांनी रोपवाटिका तसेच इतर जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांनी पारंपरिक बासरी आणि डफ वाजवून आलेल्या श्रमदात्यांचे स्वागत केले. कामानंतर श्रमदात्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद ही घेतला.वाही येथे राजू पावडे, गणेश गजकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय जनजागृती मंचाची चमू तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्वीच्या चमूने भेट देत जवळपास शंभर मीटर लांबीचा कांटूर बांध बनविला. गारपिटीच्या तडाख्याने उदध्वस्त झालेल्या या गावातील महिला पुरुष गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान करताना दिसले. त्यांनी जवळपास सीसीपीचे काम पूर्ण केलेले होते. गावात जवळपास शंभर टक्के शोषखड्डे झालेले असून, रोपवाटिकेमध्ये १ हजार ५०० झाडांची लागवड झालेली आहे. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून न राहता एकजुटीच्या ताकदीने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान करीत आहेत.यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरुण पावडे आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रभाकर राऊत, श्याम भेंडे, सचिन गरपाल, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार, यांच्यासह सदस्य तथा आदर्श कॉम्प्युटरचे मंगेश दिवटे आणि विद्यार्थी, पुलगाव येथून आलेले प्रवीण लोखंडे, प्रवीण होनाडे, अजय अराटे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोसकं फिरलं आता ह्या पाण्यासाठीतीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे ६०० असली तरी त्यांचे बळ ६ हजार लोकांचे असल्याचे येथे झालेल्या कामावरून दिसून आले. गावात दुष्काळ असतानाही गावकऱ्यांकडून होत असलेल्या कामांकडे कधी पाठ झाली नसल्याचे येथील कामांवरून दिसून आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा