शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

कांचनपूर, वाही गावात महाश्रमदानाचे तुफान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:00 IST

जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांनी केला गावकऱ्यांसोबत वाढदिवस साजरा : वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात वॉटर कप स्पर्धेदरम्यान विविध सामाजिक संघटनांकडून महाश्रमदानाचे तुफान येत आहे. रविवारी आर्वी तालुक्यातील कांचनपूर आणि वाही या गावांमध्ये वर्धेतील अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत श्रमदान केले.या श्रमदानात वैद्यकीय जनजागृती मंच, रेड क्रॉस सोसायटी, आर्वी, आदर्श कॉम्प्युटर क्लासेसच्या जवळपास ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कांचनपूरच्या सरपंच राजश्री धारगावे आणि ग्रामसेवक बोबडे तसेच सुमेध भस्मे यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी मिळून अवघ्या तीन तासांमध्ये श्रमदानातून शेततळे तयार केले.यावेळी आदर्श कॉम्प्युटरच्या श्रुती पजई आणि आकांक्षा घोंगडे या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांसोबत शेततळ्यातच वाढदिवस साजरा केला. वैद्यकीय जनजागृती मंचाचे अध्यक्ष डॉ सचिन पावडे आणि सदस्यांनी रोपवाटिका तसेच इतर जलसंधारणाच्या कामाची पाहणी केली. गावातील नागरिकांनी पारंपरिक बासरी आणि डफ वाजवून आलेल्या श्रमदात्यांचे स्वागत केले. कामानंतर श्रमदात्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद ही घेतला.वाही येथे राजू पावडे, गणेश गजकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय जनजागृती मंचाची चमू तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटी, आर्वीच्या चमूने भेट देत जवळपास शंभर मीटर लांबीचा कांटूर बांध बनविला. गारपिटीच्या तडाख्याने उदध्वस्त झालेल्या या गावातील महिला पुरुष गावाजवळच्या टेकडीवर श्रमदान करताना दिसले. त्यांनी जवळपास सीसीपीचे काम पूर्ण केलेले होते. गावात जवळपास शंभर टक्के शोषखड्डे झालेले असून, रोपवाटिकेमध्ये १ हजार ५०० झाडांची लागवड झालेली आहे. गावात पाण्याचा दुष्काळ असतानाही हे गावकरी मात्र कुणावरही अवलंबून न राहता एकजुटीच्या ताकदीने दुष्काळाशी दोन हात करीत दररोज सकाळी श्रमदान करीत आहेत.यावेळी रेड क्रॉस सोसायटीचे डॉ. अरुण पावडे आणि त्यांचे सहकारी वैद्यकीय जनजागृती मंचाचे प्रभाकर राऊत, श्याम भेंडे, सचिन गरपाल, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, आशिष पड्डलवार, यांच्यासह सदस्य तथा आदर्श कॉम्प्युटरचे मंगेश दिवटे आणि विद्यार्थी, पुलगाव येथून आलेले प्रवीण लोखंडे, प्रवीण होनाडे, अजय अराटे आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोसकं फिरलं आता ह्या पाण्यासाठीतीनही गाव मिळून लोकसंख्या अंदाजे ६०० असली तरी त्यांचे बळ ६ हजार लोकांचे असल्याचे येथे झालेल्या कामावरून दिसून आले. गावात दुष्काळ असतानाही गावकऱ्यांकडून होत असलेल्या कामांकडे कधी पाठ झाली नसल्याचे येथील कामांवरून दिसून आले.

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा