शहरं
Join us  
Trending Stories
1
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? UAE विरुद्ध खेळणार नसल्याची मोठी माहिती आली समोर
2
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
3
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
4
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
5
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
6
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
7
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
8
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
9
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
10
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
11
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
12
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
13
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
14
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
15
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
16
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
17
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
18
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
19
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
20
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?

‘महा-देव’ यात्रेची दिल्लीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:33 IST

सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन : अतिक्रमण धारकांना घरपट्टे द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. अतिक्रमण धारकांना घटपट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्या या सायकल यात्रेच्या माध्यमातून रेटल्या जाणार आहेत. या सायकल यात्रा दिल्ली येथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन निवेदनातील मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी अतिक्रमण धारक त्यांना साकडे घालणार आहेत.सेवाग्राम येथील बापूकुटी येथून सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या सायकल यात्रेची सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही सायकल यात्रा वर्धा शहरात दाखल झाली होती. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर ही ‘महा-देव’ सायकल यात्रा पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.सायकल यात्रेत सहभागी अतिक्रमण धारक व युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते वर्धा ते दिल्ली हे १ हजार ३०० किमीचे अंतर सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता पूर्ण करणार आहेत. अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात वर्धा ते नागपूर अशी ‘भु-देव’ पायी यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पूर्ण केल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांना सोबत घेवून ही ‘महा-देव’ याचा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.या सायकल यात्रेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशील ठाकरे, आमिन शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत. ते दिल्ली येथे अतिक्रमण धारकांच्या समस्या मांडणार आहेत.या आहेत मागण्याअतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावेअतिक्रमण धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावाशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत.होतकरू तरुण-तरुणांना रोजगार देण्यात यावा.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्या.निराधार, दिव्यांग व वयोवृद्ध शेतकºयांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन म्हणून द्यावी.महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.देशातील आमदार व खासदारांना देण्यात येणारे मानधन बंद करून त्यांची पेन्शन बंद करण्यात यावी. तसेच तात्काळ विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी.