शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
6
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
9
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
10
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
11
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
12
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
13
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
14
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
15
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
16
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
17
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
18
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
19
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
20
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
Daily Top 2Weekly Top 5

‘महा-देव’ यात्रेची दिल्लीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:33 IST

सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन : अतिक्रमण धारकांना घरपट्टे द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. अतिक्रमण धारकांना घटपट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्या या सायकल यात्रेच्या माध्यमातून रेटल्या जाणार आहेत. या सायकल यात्रा दिल्ली येथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन निवेदनातील मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी अतिक्रमण धारक त्यांना साकडे घालणार आहेत.सेवाग्राम येथील बापूकुटी येथून सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या सायकल यात्रेची सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही सायकल यात्रा वर्धा शहरात दाखल झाली होती. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर ही ‘महा-देव’ सायकल यात्रा पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.सायकल यात्रेत सहभागी अतिक्रमण धारक व युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते वर्धा ते दिल्ली हे १ हजार ३०० किमीचे अंतर सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता पूर्ण करणार आहेत. अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात वर्धा ते नागपूर अशी ‘भु-देव’ पायी यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पूर्ण केल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांना सोबत घेवून ही ‘महा-देव’ याचा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.या सायकल यात्रेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशील ठाकरे, आमिन शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत. ते दिल्ली येथे अतिक्रमण धारकांच्या समस्या मांडणार आहेत.या आहेत मागण्याअतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावेअतिक्रमण धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावाशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत.होतकरू तरुण-तरुणांना रोजगार देण्यात यावा.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्या.निराधार, दिव्यांग व वयोवृद्ध शेतकºयांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन म्हणून द्यावी.महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.देशातील आमदार व खासदारांना देण्यात येणारे मानधन बंद करून त्यांची पेन्शन बंद करण्यात यावी. तसेच तात्काळ विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी.