शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
2
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
3
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
4
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
5
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
6
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
7
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
8
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
9
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
10
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
11
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
12
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
13
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
14
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
15
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
16
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
17
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
18
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
19
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
20
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन

‘महा-देव’ यात्रेची दिल्लीकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 22:33 IST

सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली.

ठळक मुद्देयुवा परिवर्तन की आवाजचे आंदोलन : अतिक्रमण धारकांना घरपट्टे द्यावे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा/सेवाग्राम : सेवाग्राम बापूकुटी येथून युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात सोमवारी काढण्यात आलेली ‘महा-देव’ सायकल यात्रा वर्धा शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाली. अतिक्रमण धारकांना घटपट्टे देण्यात यावे यासह विविध मागण्या या सायकल यात्रेच्या माध्यमातून रेटल्या जाणार आहेत. या सायकल यात्रा दिल्ली येथे पोहोचल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन निवेदनातील मागण्या पूर्णत्त्वास काढण्यासाठी अतिक्रमण धारक त्यांना साकडे घालणार आहेत.सेवाग्राम येथील बापूकुटी येथून सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास या सायकल यात्रेची सुरूवात झाली. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही सायकल यात्रा वर्धा शहरात दाखल झाली होती. शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर ही ‘महा-देव’ सायकल यात्रा पुढील प्रवासाकरिता रवाना झाली.सायकल यात्रेत सहभागी अतिक्रमण धारक व युवा परिवर्तन की आवाजचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते वर्धा ते दिल्ली हे १ हजार ३०० किमीचे अंतर सध्या सर्वत्र सुरू असलेल्या पावसाची तमा न बाळगता पूर्ण करणार आहेत. अतिक्रमण धारकांना जमिनीचे कायमस्वरूपी घरपट्टे देण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी युवा परिवर्तन की आवाजच्या नेतृत्त्वात वर्धा ते नागपूर अशी ‘भु-देव’ पायी यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना सदर प्रकरणी तात्काळ योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु, बऱ्याच दिवसांचा कालावधी लोटूनही मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन न पूर्ण केल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाºया कुटुंबियांना सोबत घेवून ही ‘महा-देव’ याचा काढण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.या सायकल यात्रेत युवा परिवर्तन की आवाजचे संस्थापक निहाल पांडे यांच्या नेतृत्त्वात पलाश उमाटे, अक्षय बाळसराफ, सोनु दाते, समीर गिरी, सौरभ मोकाडे, आदित्य भेंडे, शैलेश कडू, सुरेश ठाकरे, नितेश जुमडे, सुशील ठाकरे, आमिन शेख, अरुण चौधरी, उमेश सोनटक्के, मयुर नेहारे, गौरव वानखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने अतिक्रमण धारक सहभागी झाले आहेत. ते दिल्ली येथे अतिक्रमण धारकांच्या समस्या मांडणार आहेत.या आहेत मागण्याअतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देण्यात यावेअतिक्रमण धारकांना घरकुल योजनेचा लाभ द्यावाशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने योग्य पावले उचलावीत.होतकरू तरुण-तरुणांना रोजगार देण्यात यावा.पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना कराव्या.निराधार, दिव्यांग व वयोवृद्ध शेतकºयांना मासिक ३ हजार रुपये पेन्शन म्हणून द्यावी.महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असून बलात्कार करणाºयांना फाशीची शिक्षा देण्यात यावी.देशातील आमदार व खासदारांना देण्यात येणारे मानधन बंद करून त्यांची पेन्शन बंद करण्यात यावी. तसेच तात्काळ विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी.