शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

मदन उन्नईचे विश्रामगृह रखडले

By admin | Updated: May 18, 2016 02:17 IST

पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे.

अधिकारी अनभिज्ञ : अनाठायी खर्च करून सोडले कंत्राटदाराने कामआकोली : पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मदन उन्नई धरणावर प्रस्तावित विभामगृहाचे बांधकाम अद्यापही रखडले आहे. अधिकारीच नसल्याने सात-आठ वर्षांपासून बांधकामाचा तिढा सुटलेला नाही. पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. मदन उन्नई प्रकल्पाला भेट देणारे लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्यासाठी येथे थांबण्याची सोय नव्हती. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन आमदार प्रमोद शेंडे यांच्या संकल्पनेतून विश्रामगृहाच्या निर्मितीला मूर्त स्वरूप आले. बांधकामाकरिता निधीही मंजूर करण्यात आला. नियोजित जागेचे मोठा गाजावाजा करून भूमिपूजन करण्यात आले. बांधकामालाही सुरूवात झाली होती; पण बांधकामाचे फाऊंडेशन (जोता) पूर्ण झाल्यानंतर काम पुढे सरकलेच नाही. बांधकामासाठी पाणी गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन विहिरीचे खोदकाम व बांधकाम नियोजित विश्रामगृहाच्या बाजूला करण्यात आले. या माध्यमातून सदर कामासाठी लाखो रुपयांचा आगाऊ खर्च करण्यात आला. असे असले तरी अद्यापही बांधकामाने गति घेतली नाही. संबंधित कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिल्यानंतर दुसऱ्या कंत्राटदाराला काम देणे क्रमप्राप्त होते; पण याबाबत अधिकाऱ्यांनी रूची दाखवली नाही. यामुळे आठ वर्षांपासून बांधकाम जैसे थे आहे. खोदकाम व बांधकाम यात आलेला खर्च तसेच विश्रामगृहाच्या बांधकामावर आतापर्यंत झालेला खर्च अनाठायी झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून झालेल्या खर्चाची वसुली होणार काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.(वार्ताहर)धरण होणार प्रकाशमानमदन उन्नई धरण परिसरात होत असलेल्या अवैध उत्खननाबाबत ‘लोकमत’ ने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. धरण परिसरात फेरफटका मारला असता धरणाच्या भिंतीवर साडे तीन फूट खोल व दोन ते अडीच फुट रुंद लांबच-लांब चर खोदल्याचे आढळून आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता पर्यटकांच्या दृष्टीने तसेच अवैध प्रकार टाळता यावे म्हणून पथदिवे बसविले जाणार असल्याचे सांगण्यात आले. धरण परिसरात अवैध उत्खनन करून मुरूम चोरी होत होती. यासाठीच तर चर खोदण्यात आली नाही ना, अशी शंका उपस्थित होत होती; पण पथदिवे लागणार असल्याने परिसरात चालणाऱ्या अवैध प्रकारांवर चाप बसणार असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला.