शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

मदन उन्नईचे पाणी रस्त्यावर

By admin | Updated: December 25, 2015 02:59 IST

मदन उन्नई धरणाच्या उजव्या कालव्याला कुठे तडा गेल्याने, कुठे गेट लिकेजमुळे तर काही ठिकाणी कालवा बुजल्याने पाणी वाट मिळेल तिकडे पळताना दिसते.

सदोष कालव्यांचा प्रताप : शेती राहतेय कोरडी, पाण्याचा अवव्ययआकोली : मदन उन्नई धरणाच्या उजव्या कालव्याला कुठे तडा गेल्याने, कुठे गेट लिकेजमुळे तर काही ठिकाणी कालवा बुजल्याने पाणी वाट मिळेल तिकडे पळताना दिसते. तीन दिवसांपासून तर कालव्याचे पाणी वर्धा-आर्वी रस्त्याचेच सिंचन करीत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. धरणामुळे शेतकरी समृद्ध होईल, कोरडवाहु शेतीला पाणी मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल हा शासनाचा हेतू आहे; पण पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नदी-नाले वाहत असताना शेती कोरडीच राहत असल्याचे दिसते. आकोली ते आंजी रोडवरील उत्तम पाटील यांच्या शेताजवळ मुख्य कालव्याला तडा गेल्याने अनेक ठिकाणावरून पाणी वाहत आहे. पाणी प्रवाहामुळे पाटील यांच्या शेतात तर नाला तयार आहे. कालव्यातून वाहुन जाणारे पाणी वाघाडी नदीत शिरत असल्याने नदीचा पाणी प्रवाह सुरू आहे.सुकळी (बाई) नजीक गुलाब पजई यांच्या शेतातून गत तीन दिवसांपासून अहोरात्र पाणी वाहत आहे. सदर पाणी वर्धा ते आर्वी मार्गावर येऊन रस्त्याच्या बाजूने काढलेल्या नालीने धामनदीत जात असल्याचे दिसते. कालव्यातील लिकेजमुळे सर्वत्र पाणीच-पाणी दिसून येत आहे. एकीकडे सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. दुसरीकडे पाण्याचा बेसुमार अपव्यय होताना दिसत आहे; पण याची खंत ना शाखा अभियंत्याला आहे ना कालवा निरीक्षकाला. या प्रकारामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसते.(वार्ताहर)शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षमदन उन्नई धरणाच्या सदोष कालव्यांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. शेतपिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून निर्माण करण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा सदोष कालव्यांमुळे केवळ अवव्यय होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्यात; पण निधी नसल्याचे कारण पूढे करून पाटबंधारे विभागाकडून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे आहे.पाटचऱ्या बुजल्यामदन उन्नई धरणाचे केवळ कालवेच सदोष नाही तर पाटचऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. पाटचऱ्या गाळ व झुडपांनी बुजल्याने सर्व शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. हंगामापूर्वी या साफही केल्या जात नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो.