शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मदन उन्नईचे पाणी रस्त्यावर

By admin | Updated: December 25, 2015 02:59 IST

मदन उन्नई धरणाच्या उजव्या कालव्याला कुठे तडा गेल्याने, कुठे गेट लिकेजमुळे तर काही ठिकाणी कालवा बुजल्याने पाणी वाट मिळेल तिकडे पळताना दिसते.

सदोष कालव्यांचा प्रताप : शेती राहतेय कोरडी, पाण्याचा अवव्ययआकोली : मदन उन्नई धरणाच्या उजव्या कालव्याला कुठे तडा गेल्याने, कुठे गेट लिकेजमुळे तर काही ठिकाणी कालवा बुजल्याने पाणी वाट मिळेल तिकडे पळताना दिसते. तीन दिवसांपासून तर कालव्याचे पाणी वर्धा-आर्वी रस्त्याचेच सिंचन करीत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. धरणामुळे शेतकरी समृद्ध होईल, कोरडवाहु शेतीला पाणी मिळून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल हा शासनाचा हेतू आहे; पण पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे नदी-नाले वाहत असताना शेती कोरडीच राहत असल्याचे दिसते. आकोली ते आंजी रोडवरील उत्तम पाटील यांच्या शेताजवळ मुख्य कालव्याला तडा गेल्याने अनेक ठिकाणावरून पाणी वाहत आहे. पाणी प्रवाहामुळे पाटील यांच्या शेतात तर नाला तयार आहे. कालव्यातून वाहुन जाणारे पाणी वाघाडी नदीत शिरत असल्याने नदीचा पाणी प्रवाह सुरू आहे.सुकळी (बाई) नजीक गुलाब पजई यांच्या शेतातून गत तीन दिवसांपासून अहोरात्र पाणी वाहत आहे. सदर पाणी वर्धा ते आर्वी मार्गावर येऊन रस्त्याच्या बाजूने काढलेल्या नालीने धामनदीत जात असल्याचे दिसते. कालव्यातील लिकेजमुळे सर्वत्र पाणीच-पाणी दिसून येत आहे. एकीकडे सिंचनाकरिता पुरेसे पाणी मिळत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड आहे. दुसरीकडे पाण्याचा बेसुमार अपव्यय होताना दिसत आहे; पण याची खंत ना शाखा अभियंत्याला आहे ना कालवा निरीक्षकाला. या प्रकारामुळे सिंचनाच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याचे दिसते.(वार्ताहर)शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्षमदन उन्नई धरणाच्या सदोष कालव्यांमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. शेतपिकांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून निर्माण करण्यात आलेल्या धरणाच्या पाण्याचा सदोष कालव्यांमुळे केवळ अवव्यय होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा तक्रारी केल्यात; पण निधी नसल्याचे कारण पूढे करून पाटबंधारे विभागाकडून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचेच दिसून येत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देत दुरूस्ती करणे गरजेचे आहे.पाटचऱ्या बुजल्यामदन उन्नई धरणाचे केवळ कालवेच सदोष नाही तर पाटचऱ्यांचीही दुरवस्था झाली आहे. पाटचऱ्या गाळ व झुडपांनी बुजल्याने सर्व शेतकऱ्यांना पाणीच मिळत नाही. हंगामापूर्वी या साफही केल्या जात नसल्याने पाण्याचा अपव्यय होतो.