शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

निम्न वर्धा प्रकल्पाची वाट खडतर

By admin | Updated: August 1, 2016 00:36 IST

गत काही वर्षांपासून पर्यटन विकासाकरिता खोऱ्याने पैसा येत आहे. तो खर्चही केला जाताना दिसतो; ....

रस्त्यावर केवळ चिखल आणि डबके : सार्वजनिक बांधकामसह प्रकल्प विभागाचाही कानाडोळा वर्धा : गत काही वर्षांपासून पर्यटन विकासाकरिता खोऱ्याने पैसा येत आहे. तो खर्चही केला जाताना दिसतो; पण पर्यटन स्थळांचा विकास झपाट्याने होताना दिसतच नाही. जिल्ह्यातील प्रकल्पही पर्यटनस्थळापेक्षा कमी नाहीत. असे असताना त्या प्रकल्पांकडे जाणाऱ्या मार्गांची अत्यंत दयनिय अवस्था असल्याचे निम्न वर्धा प्रकल्पाला दिलेल्या भेटीत दिसून आले. निम्न वर्धा प्रकल्पाची वाट सामान्य पर्यटक, नागरिकांकरिता अत्यंत खडतर झाल्याचेच दिसून आले. केवळ खड्डे, डबके आणि चिखलाचे साम्राज्यच दिसून आले. मग, धरणापर्यंत पोहोचणार तरी कसे, असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पुलगाव ते आर्वी मार्गावरील आर्वी तालुक्यातील धनोडी (बहाद्दरपूर) येथे वर्धा नदीवर निम्न वर्धा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. तब्बल २०-२२ वर्षांनी मूर्त रूपात आलेल्या या प्रकल्पाबाबत नागरिकांत बरीच उत्सुकता होती. या प्रकल्पाला ‘वरूड बगाजी सागर’ असे नावही देण्यात आले; पण तेथील परिसर विकासाकरिता अद्याप कुठलीही पावले उचलण्यात आली नाही. २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला असताना प्रकल्प पूर्ण झालेला नाही. कालव्याची कामे अद्यापही बाकी आहेत. प्रकल्पातून निघालेल्या मुख्य डाव्या कालव्याचे अद्याप अस्तरीकरणही करण्यात आलेले नाही. पूढे काही भागात कालव्याचे काम पूर्ण झाले; पण त्यातही गैरप्रकार झाल्याच्याच तक्रारी पूढे येत आहे. किमान प्रकल्पाने मूर्त रूप घेतल्यानंतर परिसर विकासाकडे लक्ष देत पर्यटक, नागरिकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करता आले असते; पण तसे झाले नाही. प्रकल्प आणि कालव्यांच्या कामांत रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम तसेच पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्षच करण्यात आले. दोन वर्षांपूर्वी सुस्थितीत असलेल्या आर्वी रोड ते मंगरूळ (दस्तगीर) या रस्त्यावर आज केवळ चिखलाचेच साम्राज्य आहे. जागोजागी खड्डे असल्याने वाहन धारकांना तारेवरची कसरत करावी लागते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी) पुलावरचे सिमेंटही गेले वाहून निम्न वर्धा प्रकल्पाच्या समोरून गेलेल्या रस्त्यावर वर्धा नदीवर जुना पूल आहे. प्रकल्पानंतरही आर्वी रोड ते मंगरूळ हा रस्ता बंद होऊ नये म्हणून तो पूल जैसे थे ठेवण्यात आला आहे; पण त्या पुलाची अद्याप उंचीही वाढविण्यात आली नाही की डागडुजीही करण्यात आलेली नाही. परिणामी, प्रकल्पाची दारे उघडल्यानंतर वाहणाऱ्या पाण्यामुळे पुलावरील सिमेंट वाहून गेले आहे. पुलावर अनेक ठिकाणी सिमेंटची परत वाहून गेल्याने खड्डे पडले आहेत. या पुलावर कठडे लावणे गरजेचे असताना त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. परिणामी, पुलावर थोडेही पाणी असले की, सदर मार्गावरील रहदारी पूर्णत: ठप्प होते. यामुळे सार्वजनिक बांधकाम आणि पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष देत सदर पुलाची उंची वाढविणे आणि रस्ता दुरूस्ती करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.