शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

पाईपलाईन दुरूस्तीला प्राधिकरणचा खो

By admin | Updated: October 7, 2015 00:55 IST

शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सहा महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष : दररोज हजारो लिटर पाणी जाते वाहूनआर्वी : शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाईपलाईन फुटणे, व्हॉल्व्ह लिक होणे या समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. एलआयसी कॉलनीतील पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्या; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहरातील बसस्थानकाजवळ असलेला व्हॉल्व्ह लिक आहे. यातून दररोज पाणी वाहून जते. शिवाय सहा महिन्यांपासून एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली आहे. यातून सहा महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत संबंधित विभागाला वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या; पण अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शहरात जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील जाजूवाडी परिसरात प्राधिकरण विभागाचे फिल्टर प्लॅन्ट आहे; पण यातूनही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कन्नमवारनगर, एलआयसी कॉलनी, सरस्वती कॉलनी या भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बसस्थानकानजीकच्या नाल्यातून गेली आहे. यातील व्हॉल लिक आहे. यामुळे पाणी वाहून जाते. शिवाय पांडुरंग महाराज मंदिरासमोरील सिमेंटच्या व्हॉलमधूनही दररोज सकाळ -सायंकाळ पाणी वाहून जाते. यामुळे परिसराला डबक्याचे स्वरूप आले आहे. रात्रीच्या सुमारास पाण्याची उंच धार सतत वाहत असते. एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाण्याची पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या स्थितीत आहे. याबाबत त्यांनी सहा महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला लेखी व मौखिक तक्रार केली. यानंतरही अनेकदा लेखी तक्रारी केल्यात; पण अद्यापही पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली नाही. पाणी वाहून जात असल्याने परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. नळ सोडल्यानंतर दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने सहा महिन्यांच्या हिशेब केल्यास लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेत पाण्याची बचत करण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. याबाबत जनजागृतीही केली जात आहे; पण शहरात संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच पाण्याचा अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणने दखल न घेतल्याने दरोज रोडवर पाणी साचते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचाही अभावशहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनची दुरवस्था झाली आहे. व्हॉल्व्ह लिक असून पाईपलाईन फुटलेली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण जीवन प्राधिकरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. शहरातील पाईपलाईन आणि व्हॉलच्या दुरूस्तीबाबत जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथे केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दुरूस्ती कामांकडे दुर्लक्ष का, अशी विचारणा केली असता प्रतिक्रीया देण्यासही नकारच देण्यात आला. यामुळे पाणी असेच वाया जाणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.