शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पाईपलाईन दुरूस्तीला प्राधिकरणचा खो

By admin | Updated: October 7, 2015 00:55 IST

शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सहा महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष : दररोज हजारो लिटर पाणी जाते वाहूनआर्वी : शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाईपलाईन फुटणे, व्हॉल्व्ह लिक होणे या समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. एलआयसी कॉलनीतील पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्या; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहरातील बसस्थानकाजवळ असलेला व्हॉल्व्ह लिक आहे. यातून दररोज पाणी वाहून जते. शिवाय सहा महिन्यांपासून एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली आहे. यातून सहा महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत संबंधित विभागाला वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या; पण अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शहरात जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील जाजूवाडी परिसरात प्राधिकरण विभागाचे फिल्टर प्लॅन्ट आहे; पण यातूनही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कन्नमवारनगर, एलआयसी कॉलनी, सरस्वती कॉलनी या भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बसस्थानकानजीकच्या नाल्यातून गेली आहे. यातील व्हॉल लिक आहे. यामुळे पाणी वाहून जाते. शिवाय पांडुरंग महाराज मंदिरासमोरील सिमेंटच्या व्हॉलमधूनही दररोज सकाळ -सायंकाळ पाणी वाहून जाते. यामुळे परिसराला डबक्याचे स्वरूप आले आहे. रात्रीच्या सुमारास पाण्याची उंच धार सतत वाहत असते. एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाण्याची पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या स्थितीत आहे. याबाबत त्यांनी सहा महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला लेखी व मौखिक तक्रार केली. यानंतरही अनेकदा लेखी तक्रारी केल्यात; पण अद्यापही पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली नाही. पाणी वाहून जात असल्याने परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. नळ सोडल्यानंतर दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने सहा महिन्यांच्या हिशेब केल्यास लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेत पाण्याची बचत करण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. याबाबत जनजागृतीही केली जात आहे; पण शहरात संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच पाण्याचा अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणने दखल न घेतल्याने दरोज रोडवर पाणी साचते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचाही अभावशहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनची दुरवस्था झाली आहे. व्हॉल्व्ह लिक असून पाईपलाईन फुटलेली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण जीवन प्राधिकरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. शहरातील पाईपलाईन आणि व्हॉलच्या दुरूस्तीबाबत जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथे केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दुरूस्ती कामांकडे दुर्लक्ष का, अशी विचारणा केली असता प्रतिक्रीया देण्यासही नकारच देण्यात आला. यामुळे पाणी असेच वाया जाणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.