शहरं
Join us  
Trending Stories
1
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
2
Shiv Sena MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
3
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
4
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
5
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
6
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
7
Uddhav- Raj Thackeray PC: थोड्याच वेळात उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा होणार; पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष
8
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
9
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
10
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
11
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
12
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
13
शेतकरी ते नोकरदार... बँकिंगपासून सोशल मीडियापर्यंत 'हे' ८ नियम १ जानेवारीपासून बदलणार
14
शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या युतीत सहभागी होणार?; बैठकीतील इनसाइड स्टोरी समोर
15
नमो भारत ट्रेनमधील 'तो' अश्लील चाळा पडणार महागात! तरुण-तरुणीवर FIR; किती शिक्षा होणार?
16
अगदी बाबाची कॉपी! वडिलांसारखीच हँडसम आहेत हृतिकची मुलं, हृदान-हृहानचे डान्स मूव्ह्ज पाहून चाहते प्रेमात
17
सुधीर मुनंगटीवार यांनी घेतली CM देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले, नाराजी दूर होणार?
18
अमेरिकेत 'एपस्टीन फाइल्स'चा महास्फोट! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 'तसले' गंभीर आरोप; रिपोर्टने खळबळ
19
इंडिगोची 'दादागिरी' आता चालणार नाही; सरकारने दोन नवीन विमान कंपन्यांना दाखवला हिरवा कंदील
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ सुरुच, आज किती आहे १० ग्रॅम सोन्याचा लेटेस्ट रेट?
Daily Top 2Weekly Top 5

पाईपलाईन दुरूस्तीला प्राधिकरणचा खो

By admin | Updated: October 7, 2015 00:55 IST

शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे.

सहा महिन्यांपासून तक्रारीकडे दुर्लक्ष : दररोज हजारो लिटर पाणी जाते वाहूनआर्वी : शहराला जीवन प्राधिकरण विभागामार्फत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो; पण देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाईपलाईन फुटणे, व्हॉल्व्ह लिक होणे या समस्या नित्याच्याच झाल्या आहेत. एलआयसी कॉलनीतील पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या अवस्थेत आहे. याबाबत तक्रारी करण्यात आल्या; पण अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याचे दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहरातील बसस्थानकाजवळ असलेला व्हॉल्व्ह लिक आहे. यातून दररोज पाणी वाहून जते. शिवाय सहा महिन्यांपासून एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन फुटली आहे. यातून सहा महिन्यांत लाखो लिटर पाणी वाया गेले. याबाबत संबंधित विभागाला वारंवार लेखी तक्रारी देण्यात आल्या; पण अद्यापही दखल घेण्यात आली नाही. शहरात जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणी पुरवठा केला जातो. शहरातील जाजूवाडी परिसरात प्राधिकरण विभागाचे फिल्टर प्लॅन्ट आहे; पण यातूनही दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील कन्नमवारनगर, एलआयसी कॉलनी, सरस्वती कॉलनी या भागाला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन बसस्थानकानजीकच्या नाल्यातून गेली आहे. यातील व्हॉल लिक आहे. यामुळे पाणी वाहून जाते. शिवाय पांडुरंग महाराज मंदिरासमोरील सिमेंटच्या व्हॉलमधूनही दररोज सकाळ -सायंकाळ पाणी वाहून जाते. यामुळे परिसराला डबक्याचे स्वरूप आले आहे. रात्रीच्या सुमारास पाण्याची उंच धार सतत वाहत असते. एलआयसी कॉलनी येथील श्यामराव गुल्हाणे यांच्या घरासमोरील पाण्याची पाईपलाईन गत सहा महिन्यांपासून फुटलेल्या स्थितीत आहे. याबाबत त्यांनी सहा महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला लेखी व मौखिक तक्रार केली. यानंतरही अनेकदा लेखी तक्रारी केल्यात; पण अद्यापही पाईपलाईनची दुरूस्ती करण्यात आली नाही. पाणी वाहून जात असल्याने परिसरात अनेक ठिकाणी पाण्याचे डबके साचले आहे. नळ सोडल्यानंतर दररोज हजारो लिटर पाणी वाहून जात असल्याने सहा महिन्यांच्या हिशेब केल्यास लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याचे दिसते. भविष्यातील पाणीटंचाई लक्षात घेत पाण्याची बचत करण्याचा संदेश सर्वत्र दिला जातो. याबाबत जनजागृतीही केली जात आहे; पण शहरात संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळेच पाण्याचा अपव्यय होत आहे. जीवन प्राधिकरणने दखल न घेतल्याने दरोज रोडवर पाणी साचते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत दुरूस्तीची कामे हाती घ्यावीत, अशी मागणीही नागरिकांकडून करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांचाही अभावशहरात अनेक ठिकाणी जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनची दुरवस्था झाली आहे. व्हॉल्व्ह लिक असून पाईपलाईन फुटलेली आहे. याबाबत नागरिकांकडून तक्रारी केल्या जातात; पण जीवन प्राधिकरण कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचे सांगून दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या प्रकारामुळे दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे. शहरातील पाईपलाईन आणि व्हॉलच्या दुरूस्तीबाबत जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात संपर्क साधला असता तेथे केवळ एकच कर्मचारी कार्यरत असल्याचे सांगण्यात आले. दुरूस्ती कामांकडे दुर्लक्ष का, अशी विचारणा केली असता प्रतिक्रीया देण्यासही नकारच देण्यात आला. यामुळे पाणी असेच वाया जाणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.