शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

जिल्हा रेशीम कार्यालयाच्या बेबंदशाहीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By admin | Updated: September 17, 2016 02:26 IST

जिल्हा रेशीम कार्यालयाकडे तुतीच्या बेण्याबाबत प्रस्ताव देवून सुध्दा याबाबतची कारवाई झाली नाही.

तीन महिन्यांपासून तुतीचे बेणे मिळाले नसल्याने खरीप हंगाम बुडालादेवळी : जिल्हा रेशीम कार्यालयाकडे तुतीच्या बेण्याबाबत प्रस्ताव देवून सुध्दा याबाबतची कारवाई झाली नाही. परिणामी तालुक्यातील काजळसरा व वाटखेडा येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आज-उद्या करता करता गत तीन महिन्यांपासून बेणे न मिळाल्याने या शेतकऱ्यांच्या जमिनी पडिक राहिल्या आहेत. या दिरंगाईला जिल्हा रेशीम कार्यालयाचे अधिकारी जबाबदार असल्याने त्यांनी कास्तकारांच्या खरीप हंगामाच्या पिकाची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे. तालुक्यातील मौजा काजळसरा व वाटखेडा येथील कास्तकारांनी जिल्हा रेशीम कार्यालयाचे सभासदत्व धारण करून तूती लागवडीचा प्रस्ताव सादर केला. कार्यालयाचे सभासद शुल्क सुध्दा भरण्यात आले; परंतु कास्तकारांना या वर्षीच्या खरीप हंगामात रेशीम कार्यालयाकडून तुतीचे बेणे प्राप्त झाले नाही. याबाबत वारंवार पाठपुरावा करून सुध्दा त्याची दखल घेतल्या गेली नाही. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देवून या कास्तकारांना धुडकावून लावले. तूती घेण्याच्या अपेक्षेने या खरीप हंगामात या शेतकऱ्यांनी कोणतेही पीक न घेतल्याने त्यांच्या जमिनी पडिक राहिल्या. यामध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीच्या भरवश्यावरच कुटुंबियांचा उदरनिर्वाह व मुलांचे शिक्षण अवलबूंन असल्याने या नुकसानीचा त्यांना फटका बसला. अधिकाऱ्यांची मुजोरी व हेकेखोरी या बाबीला कारणीभूत असल्याने वरिष्ठांनी याची दखल घेण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषिंवर कार्यवाही करीत खरीप हंगामाची भरपाई द्यावी अशी मागणी दिनेश धामंदे, पळसराम भगत, मनोज राऊत, चिंधू हाते, मोहनराव हुसनापूरे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत केली आहे. (प्रतिनिधी)