शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

वन्य प्राण्यांनी केले कपाशीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:41 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाच एकरातील पीक तुडविल्याने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमिवर रानडुक्कराच्या कळपाने खरांगणा (मो.) नजीकच्या दहेगाव (गोंडी) शिवारात पाच एकरातील कपाशी पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) येथील शेतकरी कीर्तीपाल, पुरुषोत्तम आणि दादारावजी चाफले यांच्या नावे खरांगणा (मोरांगणा) आणि दहेगाव (गोंडी) शिवारात शेती आहे. शेती हेच त्यांच्या उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. त्या शेतीत चाफले यांनी कपाशीची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परिणामी, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भरघोस उत्पन्न होईल अशी आशा असताना चाफले यांच्या शेतात रानडुकराच्या कळपाने घुसून उभ्या कपाशी पिकाची नासडी केली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराआधीच शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. कधी शेतात पाणी साचून तर कधी पाण्याने दडी मारल्याने नुकसान होते. या भागातही नित्याचाच असा प्रकार घडतो. रानडुकरांचा या भागात सातत्याने धुमाकुळ आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात असलेल्या वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती