शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

वन्य प्राण्यांनी केले कपाशीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:41 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देपाच एकरातील पीक तुडविल्याने शेतकरी हवालदिल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी मेटाकुटीस आला असून आता वन्यप्राणीही शेतकऱ्यांच्या जीवावर उठल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. डोळ्यात तेल टाकून रात्ररात्र शेतकरी शेतात जागून उभ्या पिकाचे संरक्षण करीत असल्याचे वास्तव आहे. याच पार्श्वभूमिवर रानडुक्कराच्या कळपाने खरांगणा (मो.) नजीकच्या दहेगाव (गोंडी) शिवारात पाच एकरातील कपाशी पिकाचे नुकसान केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वन विभागाने शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आहे.आर्वी तालुक्याच्या खरांगणा (मोरांगणा) येथील शेतकरी कीर्तीपाल, पुरुषोत्तम आणि दादारावजी चाफले यांच्या नावे खरांगणा (मोरांगणा) आणि दहेगाव (गोंडी) शिवारात शेती आहे. शेती हेच त्यांच्या उपजिवीकेचे मुख्य साधन आहे. त्या शेतीत चाफले यांनी कपाशीची लागवड केली. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकाची वाढही बऱ्यापैकी झाली. परिणामी, मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भरघोस उत्पन्न होईल अशी आशा असताना चाफले यांच्या शेतात रानडुकराच्या कळपाने घुसून उभ्या कपाशी पिकाची नासडी केली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वन्यप्राण्यांचा बंदोबस्त कराआधीच शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. कधी शेतात पाणी साचून तर कधी पाण्याने दडी मारल्याने नुकसान होते. या भागातही नित्याचाच असा प्रकार घडतो. रानडुकरांचा या भागात सातत्याने धुमाकुळ आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागात असलेल्या वन्य प्राण्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती