शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची लूट

By admin | Updated: July 20, 2015 02:11 IST

सध्या विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांची गरज पडत आहे. यात कागदपत्रे व अन्य कामांत मोठी लूट केली जात आहे. प्

प्रशासनाचे दुर्लक्ष : लाभासाठी वृद्धांनाही माराव्या लागतात चकरातळेगाव (श्या.पं.) : सध्या विद्यार्थी व शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांची गरज पडत आहे. यात कागदपत्रे व अन्य कामांत मोठी लूट केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. उत्पन्न, नॉन क्रिमीलेअर, जात, रहिवासी तसेच गॅप सर्टीफीकेट आदी प्रमाणपत्रांकरिता वेगवेगळी प्रकरणे तयार करावी लागतात. यासाठी प्रत्येक वेळी पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांच्याकडून जात तसेच रहिवासी दाखले घ्यावे लागतात. प्रत्येक दाखल्याच्या वेळी आर्थिक व्यवहार करावा लागत असून वेळही वाया जातो. यात होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पोलीस पाटील, सरपंच, तलाठी यांचे दाखले प्रत्येक प्रमाणपत्रासाठी आवश्यक असतात. तलाठी कार्यालयात पालक, पाल्यांची अधिक गर्दी दिसून येते. या ठिकाणीही दाखल्याचे ३० ते ४० रुपये घेतले जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. वास्तविक, हे दाखले नि:शुल्क देणे तलाठ्याचे काम आहे. हे सर्व दाखले घेऊन तहसील कार्यालयात अ‍ॅफेडेव्हीट करताना अर्जनवीस ९० ते १०० रुपये घेतो. सोबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरचे ११० रुपये द्यावे लागतात. यानंतर सेतू केंद्रामध्ये प्रत्येक प्रकरणाचे ३० ते ४० रुपये लागतात. एका प्रमाणपत्राला पालकांना ३०० ते ४०० रुपये खर्च येतो. शिवाय तहसील कार्यालयात ये-जा करण्यासाठी लागणारा खर्च वेगळाच! संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, राजीव गांधी आदी योजनेच्या लाभार्थ्यांना अनेक कामासाठी तलाठी व तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात. पैशाशिवाय कोणतेही काम होत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)