शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कापूस उत्पादकांची लूट

By admin | Updated: January 24, 2015 22:58 IST

जिल्ह्यात सीसीआयचे कापूस संकलन केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होत आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांना

३,४०० ते ३,८०० रुपये क्विंटलने खरेदी वर्धा : जिल्ह्यात सीसीआयचे कापूस संकलन केंद्र बंद झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच फरफट होत आहे. शासकीय खरेदी बंद झाल्याने अडचणीत सापडलेल्या शेतकरी व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव अत्यल्प दरात कापूस विक्री करीत आहेत. जिल्ह्यातील काही बाजार समितीत शुक्रवारी ३ हजार ३०० तर ३ हजार ४०० रुपये क्विंटलच्या दरात कापूस व्यापाऱ्यांनी खरेदी केला. यामुळे कापूस उत्पाकांना मोठा आर्थिक फटका असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सीसीआयची कापूस खरेदी बंद होताच बाजारात व्यापाऱ्यांकडून अत्यल्प दरात कापूस खरेदी सुरू झाल्याने सीसीआय व कापूस व्यापारी यांच्यात मिलिभगत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. यंदाच्या हंगामात सीसीआय व पणन महासंघ यांच्यात सख्य झाले. दोन्ही एजन्सी शासनाच्या असताना पणन महासंघाला सीसीआचा सबएजन्ट म्हणून काम करावे लागले. ज्या ठिकाणी सीसीआयचे केंद्र नव्हते अशाच ठिकाणी पणन महासंघाचे केंद्र सुरू झाले. या केंद्रावर कापूस उत्पादक फिरकलेही नाही; मात्र सीसीआयच्या केंद्रावर मिळत असलेल्य हमीभावामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा कापूस या केंद्रावर नेला. अशात गत तीन चार दिवसांपासून जागेचे कारण काढत सीसीआयने कापूस खरेदी बंद केली. यामुळे व्यापाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. बाजारात आलेला शेतकरी सीसीआयची खरेदी बंद असल्याने आल्या पावली परत जावे लागत आहे. यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांकडून भाव कमी करीत कापूस खरेदी करीत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. शिवाय रोख रकमेचे कारण काढत व्यापारी आणखी दर पडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. यामुळे सीसीआयची खरेदी सुरू करण्याची मागणी आहे.(प्रतिनिधी)७शेतकऱ्यांवर आल्या पावली परत जाण्याची वेळ शेतकरी त्यांच्या परिसरात असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती वा इतर ठिकाणी असलेल्या सीसीआयच्या केंद्रावर कापूस घेवून गेल्यावर सीसीआयची खरेदी बंद करण्यात आल्याची माहिती दिली जाते. आधीच अडचणीत असलेला शेतकरी त्याचा असलेला कापूस घवून घरी परत आणण्यापेक्षा मिळेत त्या दरात तो विकण्याचा निर्णय घेत आहे. याचा लाभ व्यापाऱ्यांना होत असल्याचे चित्र आहे. सीसीआयला हवा नवा कापूस शेतकऱ्यांकडे असलेला कापूस हा दुसऱ्या वेचणीचा आहे. पहिल्या वेचणीचा कापूस शेतकऱ्यांकडून केव्हाच विकल्या गेला आहे. यामुळे बाजारात येत असलेला कापूस खरेदी करण्यास सीसीआय नकार देत आहे. सीसीआयचा हा नकार व्यापाऱ्यांच्या पथ्यावर पडत आहे. यामुळे सीसीआय व व्यापारी यांच्यात साटेलोटे असल्याचा प्रत्यय येत आहे.