शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

अल्प पर्जन्यमानातही लागवडीने व्यापले दीर्घ शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मान्सून सुरु होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५१५.२७ मिलीमीटरच पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. अल्पपर्जन्यमान असतानाही कृषी विभागाकडून जिल्ह्यात ४२ हजार ६९४ हेक्टरवर म्हणजेच एकूण नियोजनाच्या १० टक्के पेरण्या झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष परिस्थिती निराळी असून जिल्ह्यात सध्या तरी ५० टक्केच्या आसपास पेरण्या आटोपल्या आहे. पावसाचाही पत्ता नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबारी पेरणीचे संकट ओढविण्याची दाट शक्यता आहे.आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती. परंतु यावर्षी केवळ ७.७२ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५१५.२७ मिलीमीटर तर सरासरी ६४.४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अजूनही सर्वदूर माॅन्सून बरसला नसतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये कपाशीची लागवड सर्वाधिक असून आता आकाशाकडे नजरा लागल्या आहे.

कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा खो...- या वर्षी पावसाने चांगलाच विलंब केल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे. सरासरी १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय लागवड करु नका, असे सांगण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी या आवाहनाला खो देत लागवड केल्याने कृषी विभागही वैतागला आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपासून थांबविण्याकरिता कृषी विभागातील अधिकारी बांधावर जाणार असल्याचे सांगत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती