शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

अल्प पर्जन्यमानातही लागवडीने व्यापले दीर्घ शिवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 05:00 IST

आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती.

आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मान्सून सुरु होऊन दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला तरीही जिल्ह्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले नाही. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ५१५.२७ मिलीमीटरच पाऊस पडला असून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. अल्पपर्जन्यमान असतानाही कृषी विभागाकडून जिल्ह्यात ४२ हजार ६९४ हेक्टरवर म्हणजेच एकूण नियोजनाच्या १० टक्के पेरण्या झाल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष परिस्थिती निराळी असून जिल्ह्यात सध्या तरी ५० टक्केच्या आसपास पेरण्या आटोपल्या आहे. पावसाचाही पत्ता नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबारी पेरणीचे संकट ओढविण्याची दाट शक्यता आहे.आठही तालुक्यांमध्ये ४ लाख ३७ हजार २२१ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु मान्सून अद्याप धडकला नसल्याने जिल्ह्यात सरासरी ४ लाख ११ हजार ९३७ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्या वर्षी २२ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ हजार ३९२.९४ मि.मी. तर सरासरी १७४.१२ मि.मी. पावसाची नोंद केली होती. एकूण पर्जन्यमानाच्या तुलनेत २०.८८ टक्के पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनीही पेरणीला गती दिली होती. परंतु यावर्षी केवळ ७.७२ टक्केच पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५१५.२७ मिलीमीटर तर सरासरी ६४.४१ मिलीमीटर पाऊस झाला आहे. अजूनही सर्वदूर माॅन्सून बरसला नसतानाही शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. यामध्ये कपाशीची लागवड सर्वाधिक असून आता आकाशाकडे नजरा लागल्या आहे.

कृषी विभागाच्या आवाहनाला शेतकऱ्यांचा खो...- या वर्षी पावसाने चांगलाच विलंब केल्याने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करण्यात आले आहे. सरासरी १०० मि.मी. पावसाची नोंद झाल्याशिवाय लागवड करु नका, असे सांगण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांनी या आवाहनाला खो देत लागवड केल्याने कृषी विभागही वैतागला आहे. आता शेतकऱ्यांना पेरणीपासून थांबविण्याकरिता कृषी विभागातील अधिकारी बांधावर जाणार असल्याचे सांगत आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती