शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Lok Sabha Election 2019; रणरणत उन्ह; कार्यकर्त्यांनी घ्यावी काळजी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:38 IST

वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे.

ठळक मुद्देसूर्य आग ओकतोय अन् प्रचाराचा पाराही चढलाय : डॉक्टरांचा सल्ला : पाणी प्या, बाहेरचे खाणे टाळा

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात रणसंग्राम तापत असताना सूर्यही आग ओकायला लागला आहे. तरी सर्व मतदारांपर्यंत अल्पकालावधीत पोहोचण्याकरिता नेत्यांसह कार्यकर्ते दिवसरात्र पळत आहे. सध्यात वर्ध्यातील तापमान चाळीशीपार गेल्याने येत्या दिवसात ते आणखीच वाढण्याची आहे. त्यामुळे प्रचारासोबतच आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांना प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.वर्धा लोकसभा मतदार संघात वर्धा जिल्ह्यातील आर्वी, देवळी, हिंगणघाट, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील धामणगांव (रेल्वे) व मोर्शी अशा सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. लोकसभा क्षेत्राचा तब्बल ६ हजार ३२३ चौरस किलोमीटर इतक आवाका आहे. तसेच २३४ किलोमीटरच्या परिघात हा मतदार संघ येत असून यामध्ये यावर्षीच्या मतदार नोंदणीनुसार १७ लाख ४२ हजार ४५० मतदार आहे.निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांचे तीन, नोंदणीकृत राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षांचे सात तर अपक्ष म्हणून चार उमेदवार रिंगणात आहे. येत्या ११ एप्रिल रोजी मतदान होणार असून उमेदवारांना प्रचाराकरिता केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळाल्याने उमेदवारांनी प्रचार यंत्रणा सक्रीय केल्याचे दिसते. कार्यकर्तेही कामाला लागले आहे. या दरम्यान नेत्यांच्या सभाही होत आहेत. आता केवळ पाच दिवस प्रचारासाठी शिल्लक राहिल्याने कार्यकर्ते व पदाधिकारी तपत्या उन्हाची तमा न बाळगता आपला उमेदवार इतर उमेदवारांच्या तुलनेत कसा वेगळा आहे, हे पटवून देताना दिसत आहेत.सोबतच सूर्याचा पाराही दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी या तापत्या उन्हापासून आपल्या प्रकृतीचाही बचाव करण्याची गरज आहे. प्रकृती जर सांभाळली नाही तर येत्या दिवसात उमेदवारांना सूर्यनारायणाच्या कोपालाही समोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काळजी घेतलेली बरी.तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यताविदर्भातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. विदर्भातील उष्णतेची ही लाट तीव्र होऊन ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.तसेच याच दिवसांमध्ये गारपीटाचीही शक्यता वर्तविण्यात आली असून वातावरणातील बदलाचा परिणाम प्रचारावरही पडण्याची शक्यता आहे. होणाऱ्या प्रचारसभा, गावागावातील प्रचार यावरच उष्णेतेसह गारपीटाचाही परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यातील नागरिकांना दुष्काळाच्या झळाही सासाव्या लागत आहेत.हे कराल तर वाचाल?1. पुरेसे पाणी घ्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिक्कट रंगाचे सैल कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री व पादत्राणे वापरा,उन्हा जाताना टोपी/ हॅट खाली ओलसर कपडा ठेवा.2. घराला ओलसर पडदे,पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा, पहाटेच्यावेळी आणि सायंकाळी जास्तीत जास्त प्रचार कामे आटोपावी, दुपारी घराबाहेर पडणे टाळावे,3. प्रचाराला जात असताना उन्हात कष्टाची कामे करणे टाळावी, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठे ऊ नये, मद्य, चहा, कॉफी व सॉप्ट ड्रिंक्स टाळा, खुप प्रथिन युक्त अन्न आणि शिळे अन्न खाणे टाळा.

टॅग्स :TemperatureतापमानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक