शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:20 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही.

ठळक मुद्देसभेला उपस्थित महिलांची निराशापदाधिकारी, कार्यकर्त्यांत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. चारूलता टोकस यांना जाहीर सभेत भाषण देण्यास काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी रोखले, याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. राहुल गांधींनीही महिलांच्या उपस्थितीबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. परंतु, काँग्रेसच्या उमेदवार महिला असूनही या जाहीर सभेत त्या एक शब्दही न बोलल्याने महिलांचा हिरमोड झाला. या कसल्या शिक्षित उमेदवार, अशी प्रतिक्रिया या सभेतून परतणाऱ्या अनेक महिलांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. चारूलता टोकस या गुडगाव (हरियाणा) येथे १९९१ पासून राहतात. संपूर्ण कुटुंब येथे स्थायिक झाले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रातही गुडगाव, मुंबई येथील बंगल्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, कोल्हापूर (राव) या गावात शेती असल्याचे नमूद करीत येथील पत्ता त्यांनी दिला आहे. उमेदवार बाहेरचा असल्याने आधीच मतदारसंघात काँग्रेसला प्रचारात कमालीची अडचण जात आहे. त्यामुळे माहेरकडील जातीचा आधार घेत कार्यकर्ते प्रचारात आहेत. मात्र, उमेदवार राहतो कुठे, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेत्यांना अजूनही देता आलेले नाही. राहुल गांधींच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते मतदारांना याचे उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये आमदार अमर काळे यांना भाषणाची संधी पक्षाकडून देण्यात आली. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. उमेदवाराच्या वास्तव्याबाबत त्यांनीही चकार शब्द काढला नाही. उमेदवार स्वत: जाहीर सभेला मार्गदर्शन करीत असतो, त्याशिवाय निवडणुकीची सभा होऊच शकत नाही. मात्र, उमेदवाराने जाहीर सभेला संबोधित न केलेली भारताच्या निवडणूक इतिहासातील ही पहिलीच जाहीर सभा असावी, असा आता प्रचार होऊ लागला आहे.

रणजित कांबळेंकडून दुखावलेले एकवटलेप्रभाराव यांच्यानंतर मागील १५ वर्षांपासून रणजित कांबळे यांच्याकडे अबाधित सत्ता आली. जिल्हा काँग्रेस कमिटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. कांबळे यांनी जिल्ह्यातील सहकार गटाची वाताहात करून टाकली. ज्येष्ठ सहकार नेते व शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख यांनी जपलेली शेकडो माणसे या सहकार क्षेत्रात कार्यरत होती. सहकार गटाचा दबदबा संपविण्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रणजित कांबळे व त्यांचे समर्थक इमाने-इतबारे करीत आहे. आता त्यांचा हिशेब लावण्याची वेळ आली आहे, अशी भावना सहकार क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचाच राग युवा नेते समीर देशमुख यांना असल्याने त्यांनी प्रचारातून पूर्णपणे माघार घेतली आहे. समीर देशमुखांचे खंदे समर्थक असलेले सुधीर पांगूळ यांनाही सहकार गटापासून तोडण्याचे काम कांबळे यांनीच केले, याची जाणीव या गटातील कार्यकर्त्यांना आहे. त्याचा सर्व हिशेब गोळा-बेरजेसह घेण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019