शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
3
विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
4
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
5
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
6
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
7
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
9
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
10
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
11
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
12
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
13
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
14
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
15
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?
16
बापमाणूस! ४ वर्षे जमा केली १०-१० रुपयांची नाणी; चहावाल्याने लेकीचं स्वप्न केलं पूर्ण, घेतली स्कूटी
17
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
18
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
20
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?

Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:20 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही.

ठळक मुद्देसभेला उपस्थित महिलांची निराशापदाधिकारी, कार्यकर्त्यांत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. चारूलता टोकस यांना जाहीर सभेत भाषण देण्यास काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी रोखले, याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. राहुल गांधींनीही महिलांच्या उपस्थितीबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. परंतु, काँग्रेसच्या उमेदवार महिला असूनही या जाहीर सभेत त्या एक शब्दही न बोलल्याने महिलांचा हिरमोड झाला. या कसल्या शिक्षित उमेदवार, अशी प्रतिक्रिया या सभेतून परतणाऱ्या अनेक महिलांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. चारूलता टोकस या गुडगाव (हरियाणा) येथे १९९१ पासून राहतात. संपूर्ण कुटुंब येथे स्थायिक झाले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रातही गुडगाव, मुंबई येथील बंगल्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, कोल्हापूर (राव) या गावात शेती असल्याचे नमूद करीत येथील पत्ता त्यांनी दिला आहे. उमेदवार बाहेरचा असल्याने आधीच मतदारसंघात काँग्रेसला प्रचारात कमालीची अडचण जात आहे. त्यामुळे माहेरकडील जातीचा आधार घेत कार्यकर्ते प्रचारात आहेत. मात्र, उमेदवार राहतो कुठे, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेत्यांना अजूनही देता आलेले नाही. राहुल गांधींच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते मतदारांना याचे उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये आमदार अमर काळे यांना भाषणाची संधी पक्षाकडून देण्यात आली. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. उमेदवाराच्या वास्तव्याबाबत त्यांनीही चकार शब्द काढला नाही. उमेदवार स्वत: जाहीर सभेला मार्गदर्शन करीत असतो, त्याशिवाय निवडणुकीची सभा होऊच शकत नाही. मात्र, उमेदवाराने जाहीर सभेला संबोधित न केलेली भारताच्या निवडणूक इतिहासातील ही पहिलीच जाहीर सभा असावी, असा आता प्रचार होऊ लागला आहे.

रणजित कांबळेंकडून दुखावलेले एकवटलेप्रभाराव यांच्यानंतर मागील १५ वर्षांपासून रणजित कांबळे यांच्याकडे अबाधित सत्ता आली. जिल्हा काँग्रेस कमिटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. कांबळे यांनी जिल्ह्यातील सहकार गटाची वाताहात करून टाकली. ज्येष्ठ सहकार नेते व शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख यांनी जपलेली शेकडो माणसे या सहकार क्षेत्रात कार्यरत होती. सहकार गटाचा दबदबा संपविण्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रणजित कांबळे व त्यांचे समर्थक इमाने-इतबारे करीत आहे. आता त्यांचा हिशेब लावण्याची वेळ आली आहे, अशी भावना सहकार क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचाच राग युवा नेते समीर देशमुख यांना असल्याने त्यांनी प्रचारातून पूर्णपणे माघार घेतली आहे. समीर देशमुखांचे खंदे समर्थक असलेले सुधीर पांगूळ यांनाही सहकार गटापासून तोडण्याचे काम कांबळे यांनीच केले, याची जाणीव या गटातील कार्यकर्त्यांना आहे. त्याचा सर्व हिशेब गोळा-बेरजेसह घेण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019