शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2019; राहुल गांधी यांच्या सभेत काँग्रेस उमेदवाराचे भाषण कुणी रोखले ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 20:20 IST

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही.

ठळक मुद्देसभेला उपस्थित महिलांची निराशापदाधिकारी, कार्यकर्त्यांत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्ध्यात आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. मात्र, या सभेला काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अ‍ॅड.चारूलता टोकस यांनी संबोधित केले नाही. चारूलता टोकस यांना जाहीर सभेत भाषण देण्यास काँग्रेसच्या कोणत्या नेत्यांनी रोखले, याची मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे. या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. राहुल गांधींनीही महिलांच्या उपस्थितीबाबत आपल्या भाषणात उल्लेख केला. परंतु, काँग्रेसच्या उमेदवार महिला असूनही या जाहीर सभेत त्या एक शब्दही न बोलल्याने महिलांचा हिरमोड झाला. या कसल्या शिक्षित उमेदवार, अशी प्रतिक्रिया या सभेतून परतणाऱ्या अनेक महिलांनी लोकमत प्रतिनिधीजवळ व्यक्त केली. चारूलता टोकस या गुडगाव (हरियाणा) येथे १९९१ पासून राहतात. संपूर्ण कुटुंब येथे स्थायिक झाले आहे. त्यांनी आपल्या निवडणूक शपथपत्रातही गुडगाव, मुंबई येथील बंगल्यांचा उल्लेख केला आहे. मात्र, कोल्हापूर (राव) या गावात शेती असल्याचे नमूद करीत येथील पत्ता त्यांनी दिला आहे. उमेदवार बाहेरचा असल्याने आधीच मतदारसंघात काँग्रेसला प्रचारात कमालीची अडचण जात आहे. त्यामुळे माहेरकडील जातीचा आधार घेत कार्यकर्ते प्रचारात आहेत. मात्र, उमेदवार राहतो कुठे, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेस नेत्यांना अजूनही देता आलेले नाही. राहुल गांधींच्या जाहीर सभेत काँग्रेसचे नेते मतदारांना याचे उत्तर देतील, अशी अपेक्षा होती. स्थानिक पातळीवरील नेत्यांमध्ये आमदार अमर काळे यांना भाषणाची संधी पक्षाकडून देण्यात आली. त्यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली. उमेदवाराच्या वास्तव्याबाबत त्यांनीही चकार शब्द काढला नाही. उमेदवार स्वत: जाहीर सभेला मार्गदर्शन करीत असतो, त्याशिवाय निवडणुकीची सभा होऊच शकत नाही. मात्र, उमेदवाराने जाहीर सभेला संबोधित न केलेली भारताच्या निवडणूक इतिहासातील ही पहिलीच जाहीर सभा असावी, असा आता प्रचार होऊ लागला आहे.

रणजित कांबळेंकडून दुखावलेले एकवटलेप्रभाराव यांच्यानंतर मागील १५ वर्षांपासून रणजित कांबळे यांच्याकडे अबाधित सत्ता आली. जिल्हा काँग्रेस कमिटीवर वर्चस्व प्रस्थापित केले. कांबळे यांनी जिल्ह्यातील सहकार गटाची वाताहात करून टाकली. ज्येष्ठ सहकार नेते व शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख यांनी जपलेली शेकडो माणसे या सहकार क्षेत्रात कार्यरत होती. सहकार गटाचा दबदबा संपविण्याचे काम गेल्या १५ वर्षांपासून रणजित कांबळे व त्यांचे समर्थक इमाने-इतबारे करीत आहे. आता त्यांचा हिशेब लावण्याची वेळ आली आहे, अशी भावना सहकार क्षेत्रातील अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचाच राग युवा नेते समीर देशमुख यांना असल्याने त्यांनी प्रचारातून पूर्णपणे माघार घेतली आहे. समीर देशमुखांचे खंदे समर्थक असलेले सुधीर पांगूळ यांनाही सहकार गटापासून तोडण्याचे काम कांबळे यांनीच केले, याची जाणीव या गटातील कार्यकर्त्यांना आहे. त्याचा सर्व हिशेब गोळा-बेरजेसह घेण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019