शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2019; १७.४२ लाख मतदार बजावणार आज हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 21:57 IST

निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नोंदविणार आहेत.

ठळक मुद्देपोलिंग चमू रवाना : १५ हजार नवमतदारांचे प्रथम मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : निवडणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया होय. ही प्रक्रिया लोकसभा निवडणुकीचे औचित्य साधून गुरूवार ११ एप्रिलला पार पडणार आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून ते गुरूवारी प्रत्यक्ष मतदान करून आपले मत नोंदविणार आहेत. विशेष म्हणजे यंदा १५ हजार २७२ नवमतदार असून ते पहिल्यांदाच राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहेत. बुधवारी वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रातील तालुकास्थळावरून निवडणूक साहित्य घेऊन पोलिंग चमू नियोजित ठिकाणी रवाना झाल्या.वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी तर अमरावती जिल्ह्यातील धामणगाव व मोर्शी ही एकूण सहा विधानसभा मतदार क्षेत्र आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण १५ लाख २७ हजार ८९८ मतदार होते. तर यंदाच्या वेळी मतदार जागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात आल्याने ही संख्या २ लाख १४ हजार ५५२ ने वाढली आहे. विशेष म्हणजे यंदा १८ ते १९ वयोगटातील १५ हजार २७२ तर वयाचे शतक पार केलेले ९८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. वर्धा लोकसभा क्षेत्रात एकूण १७ लाख ४२ हजार ४५० मतदार असून त्यात ८ लाख ९३ हजार ७३० पुरुष, ८ लाख ४८ हजार ७०१ स्त्री तर १९ इतर मतदार आहेत. प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधाएकूण २०२६ मतदार केंद्रांवरून गुरूवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. या केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.आवश्यक माहिती जाणून घेत निवडणूक विभागाने १ हजार २२५ ठिकाणी व्हीलचेअर ठेवण्याचे नियोजन केले आहे. याचा लाभ दिव्यांग बांधवांना होणार आहे.जऊरवाड्याला पोलिंग चमू दुपारी पोहोचलीवर्धा-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आणि वर्धा जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या जऊरवाडा (खुर्द) येथे लोकसभा निवडणूक मतदानाच्या अनुषंगाने बुधवारी तालुका स्थळावरून निघालेली पोलिंग चमू दुपारी ३ वाजताच्या सुमारास पोहोचली. तेथे दिव्यांग व इतर मतदारांसाठी सर्व सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.प्रत्येक केंद्रावर राहणार दोन स्वयंसेवकवृद्ध, दिव्यांग अशा मतदारांना मतदान करताना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक मतदार केंद्रावर दोन स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्धा लोकसभा मतदार क्षेत्रात एकूण २०२६ मतदार केंद्र असून १४ ते १७ वयोगटातील स्काऊट गाइडचे स्वयंसेवक गुरूवारी सेवा देणार आहेत.मतदान प्रक्रियेसाठीची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. शिवाय मतदान केंद्रांवर दिव्यांग बांधवांसाठी विशेष सोई-सूविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरूवारी प्रत्येक मतदाराने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदानाचा हक्क बजावावा.- विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019