शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

Lok Sabha Election 2019; नियमित कर्ज भरणाऱ्यांवर अन्यायच झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:14 IST

राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले.

ठळक मुद्देपुलगाव ते चांदुर(रेल्वे) 4० किमी

देवकांत चिचाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनाचणगाव : राज्यसरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीत कर्ज थकीत ठेवणाऱ्यांना मोठी रक्कम माफ झाली. मात्र जे लोक प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरतात, त्यांच्यावर अन्यायच झाला. नियमित कर्ज भरणाऱ्यांना केवळ २५ हजारांचे अनुदान देण्यात आले. नियमित कर्ज भरणे हे पाप झाले, अशी भावना बसमधील प्रवासी शेतकऱ्यांनी मंगळवारी व्यक्त केली.पुलगाव बसस्थानकावरून लोकमतच्या प्रतिनिधीने वर्धा-जालना या बसमध्ये आपला प्रवास सुरू केला. यावेळी प्रवासादरम्यान अनेक प्रवाशांनी आपल्या व्यथा सांगितल्या. वर्धा ते पुलगाव रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. पुलगाव येथील येवढ्या मोठ्या गावात मागील दहा-पंधरा वर्षांपासून स्मशानभूमीचा प्रश्न सुटलेला नाही. पुलगाव येथील उड्डाण पुलाचा प्रश्नही प्रलंबित आहे. पुलगाव ते चांदुर (रेल्वे) या प्रवासादरम्यान किसना वरठी या धामणगाव तालुक्यातील शेतमजूराने सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले, अशी भावना व्यक्त केली. आमला विश्वेश्वर येथील नागरिकाने कर्जमाफीचा लाभ झाला. मात्र शेतकऱ्यांची संख्या फार कमी आहे. परंतु बऱ्याच जणांना फायदा झाला नाही, अशी माहिती दिली. काही महिला प्रवाशांनी निराधाराचे पैसे वेळेवर मिळत नसल्याचे सांगितले.सुविधांकडे दुर्लक्षसरकारने शहर व तालुक्याच्या गावात सुविधा दिल्या. मात्र खेड्यांकडे दुर्लक्ष आहे, असे सांगितले. पुलगाव, नाचणगाव, गुंजखेडा एकाच फिल्टर प्लॅन्टवर पाणी वितरण आहे. पाणी समस्या सध्या निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे नळही वेळेवर येत नाही, अशी माहिती दिली.पुलगाव रेल्वे स्थानकावर सर्व गाड्या थांबत नाही. अनेक गाड्या येथून निघून जातात. पुलगाव मोठे गाव आहे. रेल्वेला थांबा द्यायला हवा, अशीही मागणी प्रवाशांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019