शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

Lok Sabha Election 2019; शहरात सरासरी ६२ टक्के मतदारांनी बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 21:52 IST

तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

ठळक मुद्देखर्डीपुरा केंद्रावर रात्री ७ पर्यंत मतदारांच्या रांगा : नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाशहरातील खर्डीपुरा शाळा मतदान केंद्रावर रात्री ७ वाजतासुद्धा मतदारांची मोठी रांग होती. जवळजवळ ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. या केंद्रावर ७५ टक्के मतदान झाले. मशीनची गती संथ असल्यामुळे मतदानाला वेळ लागत होता. अनेक मतदार कंटाळले, थकले; पण मतदान करूनच बाहेर आले.शहरातील शिक्षित भागात असलेल्या बूथ क्र. ९५,९६,९७,९८,९९ वर मतदानाचा टक्का कमी झाला असून अशिक्षित भागातील म्हणजेच खर्डीपुरा भागातील ९१,९२,९३ आणि ९४ या बूथ क्रमाकांवर मतदान जास्त झाले. म्हणजेच या वेळेस अशिक्षित व कष्टकरी लोकांचा मतदान करण्याचा उत्साह जास्त, तर शिक्षित लोकांचा उत्साह कमी दिसून आला. शिक्षित भागातील बरेच कर्मचारी निवडणूक ड्युटीवर होते तर काहींनी मूळ गावी मतदान केले.तालुक्यातील ग्रामीण भागात बऱ्यापैकी मतदान झाले. एकूण सरासरी मतदान ६५ टक्के झाले. तुलनात्मकदृष्ट्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा मतदान काढण्याचा उत्साह जास्त दिसून आला. कारंजा तालुक्यात भाजपाचे ४ जि. प. सदस्य व सहा पंचायत समिती सदस्य असल्यामुळे तसेच पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाचे ताब्यात असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचारात बोलबोला जास्त दिसून आला.सावल येथील किशोर तुकाराम मानमोरे या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करून भारतीय लोकशाहीला महत्त्व दिले. भाजपा आणि कॉँग्रेस उमेदवार यांच्यातच काट्याची लढत झाली. भाजप उमेदवार रामदास तडस व कॉँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. कोण निवडून येणार हे २३ मे ला कळेल; पण तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जयपराजयाची गणिते मांडण्यात गुंग असल्याचे दिसून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019