शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Lok Sabha Election 2019; ५५ वर्ष काँग्रेसने सामान्यांना एप्रिल फूल बनविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 21:42 IST

गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये सामान्य गरिबांचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गती वाढवित ती सामान्यापर्यंत नेली. काँग्रेसने म्हटले गरीबी हटवू; पण गरिबी हटली नाही. या देशातल्या सामान्यांना काँग्रेसने एप्रिल फूल बनविले आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस : आर्वी येथील जाहीरसभेत केली टीका

लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गेल्या पाच वर्षामध्ये देशामध्ये सामान्य गरिबांचा विकास व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाची गती वाढवित ती सामान्यापर्यंत नेली. काँग्रेसने म्हटले गरीबी हटवू; पण गरिबी हटली नाही. या देशातल्या सामान्यांना काँग्रेसने एप्रिल फूल बनविले आहे. ही देशाच्या आत्मियतेची लढाई आहे. त्यामुळे देश कुणाच्या हाती द्यावा यासाठीची ही लढाई आहे. सामान्य माणसाचे हित सोडून स्वहीत जपण्याचे काम गेली अनेक वर्ष काँग्रेसने केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्वी येथील जाहीर सभेतून केली.आर्वी येथील गांधी चौकात लोकसभेचे भाजप व शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला.मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ही निवडणुक देशाचं भविष्य घडविणारी आहे; हे भविष्य कुणाच्या हाती द्यावे हे आपल्याला ठरवायचे आहे. गेल्या पाच वर्षात भाजपाने विकासाचा झंझावात देशात व महाराष्ट्रात सुरू केला. महाराष्ट्रात ३२ हजार कोटी रूपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला दिले. त्यापैकी ४६० कोटी रूपये एकट्या वर्धा जिल्ह्याला दिले आहे. कॉँग्रेसने १० वर्षात ५२ हजार कोटी रूपये दिले. ६ हजार रूपये शेतकऱ्यांना देणे ही सुरुवात आहे. तिजोरीत पैसा येत आहे. देशात परिवर्तन करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. खोटं बोलण्याचे काम कॉँग्रेस करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.विदर्भाचा सुपूत्र म्हणून मी शेतकऱ्यांच्या पाठिशी कायम उभा आहे. महाराष्ट्रात २५ हजार एकरावर सुक्ष्म सिंचन योजना लोअर वर्धावर सुरू असून ही योजना शेतकऱ्याचे भविष्य बदलविणारीच आहे. महाराष्ट्रामध्ये खºया अर्थाने विकासाची कामे खेचून आणली. आर्वी मतदार संघामध्ये पुढील काळात विविध योजनाच्या माध्यमातून विकास करण्याचेही यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. व्यासपीठावर सुधीर दिवे, माजी आमदार दादाराव केचे, खासदार रामदास तडस, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, शहागडकर, रिपाइंचे नेते विजय आगलावे, नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस