शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तिजोरीला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते.

ठळक मुद्देकोरोनायन । पाणी देयकापोटी ६० लाखांची वसुली खोळंबली

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणााच्या वसुलीला मोठा फटका बसला. मागील दोन महिन्यांत ग्राहकांकडे तब्बल ६० लाखांची देयके थकली.शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी देयक प्रिंटिंग आणि वितरणाचा कंत्राट नागपूर येथील गणेश इंजिनिअरिंग या कंपनीला दिला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने वर्ध्यापूर्वी नागपुरात लॉकडाऊनसह संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली.त्यामुळे जीवन प्राधिकरणाची पाणी बिले प्रिंट होण्यात आणि पर्यायाने वितरणातही अडथळा निर्माण झाला. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्राधिकरणानेही वसुलीला या दोन महिन्यांच्या कालावधीत थांबा दिला.मजिप्राला दरमहा पाणीपुरवठ्याच्या देयकापोटी सरासरी ३० लाखांचा महसूल प्राप्त होतो. दोन महिने सर्व काही ठप्प असल्याने तब्बल ६० लाखांची वसुली थकली. लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता आणल्याने सुरू महिन्यापासून नियमित पाणी देयके वितरित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली.देयकासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावाकोरोना विषाणू संसर्गाचे सावट कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे देयकाकरिता कार्यालयात येणेच गरजेचे नाही. देयक भरणा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ऑनलॉईन प्रणाली आहे. या माध्यमातून ग्राहकांना पाणी देयक अदा करता येणार आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहनही प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत