शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तिजोरीला लॉकडाऊनचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते.

ठळक मुद्देकोरोनायन । पाणी देयकापोटी ६० लाखांची वसुली खोळंबली

सुहास घनोकार।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणााच्या वसुलीला मोठा फटका बसला. मागील दोन महिन्यांत ग्राहकांकडे तब्बल ६० लाखांची देयके थकली.शहरालगतच्या ११ ग्रामपंचायतींना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत नळयोजनेद्वारे सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होतो. या संपूर्ण ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात १ लाखावर ग्राहक संख्या आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. परिणामी, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. त्यामुळे मीटर रिडिंग घेण्याचे कामही ठप्प होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी देयक प्रिंटिंग आणि वितरणाचा कंत्राट नागपूर येथील गणेश इंजिनिअरिंग या कंपनीला दिला आहे. कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने वर्ध्यापूर्वी नागपुरात लॉकडाऊनसह संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात आली.त्यामुळे जीवन प्राधिकरणाची पाणी बिले प्रिंट होण्यात आणि पर्यायाने वितरणातही अडथळा निर्माण झाला. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शासन-प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून प्राधिकरणानेही वसुलीला या दोन महिन्यांच्या कालावधीत थांबा दिला.मजिप्राला दरमहा पाणीपुरवठ्याच्या देयकापोटी सरासरी ३० लाखांचा महसूल प्राप्त होतो. दोन महिने सर्व काही ठप्प असल्याने तब्बल ६० लाखांची वसुली थकली. लॉकडाऊनमध्ये शासनाने शिथिलता आणल्याने सुरू महिन्यापासून नियमित पाणी देयके वितरित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून देण्यात आली.देयकासाठी ऑनलाईन प्रणालीचा वापर करावाकोरोना विषाणू संसर्गाचे सावट कायम आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे देयकाकरिता कार्यालयात येणेच गरजेचे नाही. देयक भरणा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ऑनलॉईन प्रणाली आहे. या माध्यमातून ग्राहकांना पाणी देयक अदा करता येणार आहे. नागरिकांनी त्याचा वापर करावा, असे आवाहनही प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत