शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

‘लॉकडाऊन इफेक्ट’; शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला मिळतोय मातीमोल दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 09:02 IST

Wardha news कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देटोमॅटो, वांगी, फूलकोबी, भेंडी यांसह भाजीपाल्याची अन्य पिके शहरातील व मोठ्या गावांतील आठवडी बाजार बंद असल्याने विकणे शक्य होत नसल्याने नाइलाजास्तव भाजीपाला फेकावा लागत आहे. एकंदरीत कोरोना संक्रमणाच्या काळात भाजीपाला उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरी भागासह गावखेड्यांतही थैमान घातले आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

विविध भाजीपाल्याला शहरासह ग्रामीण भागात मागणी असली तरी विक्री यंत्रणा कोलमडल्याने शेतकऱ्यांना शेतातील भाजीपाला फेकावा अथवा जनावरांना खायला घालावा लागतो. हीच अवस्था दुग्ध व्यवसायाची झाली आहे. परिसरातील तारासावंगा, साहूर, द्रुगवाडा, माणिकवाडा, वाडेगाव, जामगाव या गावांमधील शेतकरी कपाशी, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा या परंपरागत पिकांसोबत संत्रा व मोसंबीचे तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या पिकांचे उत्पादन घेतात. बहुतांश शेतकरी भाजीपाला कारंजा, आष्टी, अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात तसेच परिसरातील आठवडी बाजारात विकायला नेतात. मात्र, कोरोना संक्रमणकाळात पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, त्या तुलनेत उत्पन्न कमी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. भाजीपाल्याला शहरात मोठी मागणी असतानाही तो शहरात विक्रीसाठी पाठविणे शक्य होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

माझ्याकडे चार एकर शेती असून दोन एकरांत मी भेंडी, टोमॅटो व वांगी, इत्यादी भाजीपाल्याची लागवड दरवर्षी करतो; परंतु कोरोनाच्या संक्रमणकाळात बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने भाजीपाला जनावरांना खाण्यास द्यायची वेळ आली आहे. बराच भाजीपाला हा घरीच सडत आहे. असेच होत राहिले तर उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे.

- सूरज मोगरे, शेतकरी, वाडेगाव.

शासनाने भाजीपाल्याच्या ‘होम डिलिव्हरी’साठी सूट दिली असली तरी पूर्वीसारखी भाजीपाल्याची विक्री होत नाही. कोरोना संक्रमणकाळात भाजीपाला विक्रीतून रोजची रोजी निघणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे जगावे तरी कसे, घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- कुंदन लेंभाडे, भाजीपाला विक्रेता

टॅग्स :agricultureशेती