शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

‘लॉकडाऊन इफेक्ट’; शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला मिळतोय मातीमोल दर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 09:02 IST

Wardha news कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

ठळक मुद्देटोमॅटो, वांगी, फूलकोबी, भेंडी यांसह भाजीपाल्याची अन्य पिके शहरातील व मोठ्या गावांतील आठवडी बाजार बंद असल्याने विकणे शक्य होत नसल्याने नाइलाजास्तव भाजीपाला फेकावा लागत आहे. एकंदरीत कोरोना संक्रमणाच्या काळात भाजीपाला उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा  : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने शहरी भागासह गावखेड्यांतही थैमान घातले आहे. कोरोना संक्रमण रोखण्यासाठी शासनाने घेतलेला संचारबंदी, जमावबंदीच्या निर्णय योग्य जरी असला तरी, या निर्णयाचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसला असून, त्यांना मातीमोल भावात भाजीपाला विकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.

विविध भाजीपाल्याला शहरासह ग्रामीण भागात मागणी असली तरी विक्री यंत्रणा कोलमडल्याने शेतकऱ्यांना शेतातील भाजीपाला फेकावा अथवा जनावरांना खायला घालावा लागतो. हीच अवस्था दुग्ध व्यवसायाची झाली आहे. परिसरातील तारासावंगा, साहूर, द्रुगवाडा, माणिकवाडा, वाडेगाव, जामगाव या गावांमधील शेतकरी कपाशी, सोयाबीन, भुईमूग, गहू, हरभरा या परंपरागत पिकांसोबत संत्रा व मोसंबीचे तसेच विविध प्रकारच्या भाजीपाल्याच्या पिकांचे उत्पादन घेतात. बहुतांश शेतकरी भाजीपाला कारंजा, आष्टी, अमरावती जिल्ह्यातील वरुड शहरात तसेच परिसरातील आठवडी बाजारात विकायला नेतात. मात्र, कोरोना संक्रमणकाळात पिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, त्या तुलनेत उत्पन्न कमी झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. भाजीपाल्याला शहरात मोठी मागणी असतानाही तो शहरात विक्रीसाठी पाठविणे शक्य होत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

माझ्याकडे चार एकर शेती असून दोन एकरांत मी भेंडी, टोमॅटो व वांगी, इत्यादी भाजीपाल्याची लागवड दरवर्षी करतो; परंतु कोरोनाच्या संक्रमणकाळात बाजारपेठ उपलब्ध होत नसल्याने भाजीपाला जनावरांना खाण्यास द्यायची वेळ आली आहे. बराच भाजीपाला हा घरीच सडत आहे. असेच होत राहिले तर उत्पादनासाठी लावलेला खर्चही निघणे कठीण होणार आहे.

- सूरज मोगरे, शेतकरी, वाडेगाव.

शासनाने भाजीपाल्याच्या ‘होम डिलिव्हरी’साठी सूट दिली असली तरी पूर्वीसारखी भाजीपाल्याची विक्री होत नाही. कोरोना संक्रमणकाळात भाजीपाला विक्रीतून रोजची रोजी निघणेदेखील कठीण झाले आहे. त्यामुळे जगावे तरी कसे, घरखर्च कसा चालवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

- कुंदन लेंभाडे, भाजीपाला विक्रेता

टॅग्स :agricultureशेती