शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लॉकडाऊनने बदलले व्यवसायाचे संदर्भ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच हिरावल्याने अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला.

ठळक मुद्देपाणी पुरीच्या गाडीतून फळ तर निंबू सरबताच्या गाडीवर होतेय मास्कविक्री

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आले. दरम्यान, सर्वच व्यवसाय ठप्प पडले होते. या काळात अनेकांनी पारंपरिक व्यवसाय बदलले. पाणीपुरी विकत असलेल्या गाडीतून चक्क फळांची विक्री सुरूञकेली, तर काहींनी लस्सी, निंबू सरबताच्या गाडीवरून मास्क विक्री सुरू केली आहे.कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यांपासून तीन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व काही ठप्प होते. हातावर आणून पोट भरणाऱ्यांची कोरोना इष्टापत्तीने रोजी रोटीच हिरावल्याने अनेक कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. शहरात शेकडोवर पाणीपुरी, दाबेली, नुडल्स, मंच्युरियन आणि इतर खाद्यपदार्थ, शीतपेय विक्रेते आहेत. सकाळी आणि सायंकाळी हे विक्रेते हातगाडीच्या माध्यमातून दररोज पाणीपुरी व इतर खाद्यपदार्थांची विक्री करतात. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा दिली. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली. पाणीपुरी व जंक फूड विक्रीच्या हातगाड्या सायंकाळनंतरच लागतात. वेळेच्या मर्यादेमुळे आणि खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यांवर शौकिनांची सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत उसळत असलेली गर्दी पाहता कोरोना संक्रमणाचा धोका उद्भवू शकतो, हे लक्षात घेऊन प्रशासनाने या व्यवसायावरही बंदी घातली.कोरोनाचा संकटकाळ कधी संपेल, हे आज कुणालाही सांगणे अवघड आहे. त्यामुळे अनेकांनी पारंपरिक व्यवसाय बदलले. आज शहरात एकेकाळी पाणीपुरी विकणाºया युवकांनी फळविक्रीचा तर निंबू सरबत विकणाऱ्यांनी मागणी लक्षात घेऊन मास्कविक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. लॉकडाऊनपूर्वी व्यवसाय करणाºयांनी अनलॉक सुरू होत असताना आपले व्यवसाय बदलल्याचे चित्र आहे.डेकोरेशन व्यावसायिक विकतोय भाजीपालामार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने लग्नसराईच्या हंगामाचे असतात. यावेळी कोरोना विषाणू संसर्गामुळे लग्न व इतर समारंभांवर बंदी घालण्यात आली. याचाच परिणाम, सजावट साहित्याचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांपुढेही मोठे संकट आर्थिक उभे ठाकले. कुटुंबाच्या उपजीविकेकरिता अनेकांनी भाजी आणि फळविक्रीचा व्यवसाय स्वीकारला आहे. एका डेकोरेशन व्यावसायिक युवक शहरातील विविध भागात फिरत हातगाडीवरून भाजीपाल्याची विक्री करीत आहे.