शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

कर्जमाफी योजना २००१ पासून लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:38 IST

नापिकी, अत्यल्प हमीभाव, कर्जाचा डोंगर यामुळे हतबल शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या रेट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करून कर्जमाफी दिली. यात २००९ ते २०१६ मधील थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंत कर्ज माफ झाले.

ठळक मुद्देसुधारित शासन निर्णय निर्गमित : शेडनेट, पॉलीहाऊस, इमूपालक शेतकऱ्यांनाही दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : नापिकी, अत्यल्प हमीभाव, कर्जाचा डोंगर यामुळे हतबल शेतकऱ्यांना राजकीय पक्षांच्या रेट्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू करून कर्जमाफी दिली. यात २००९ ते २०१६ मधील थकबाकीदार शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंत कर्ज माफ झाले. या निर्णयात शासनाने आता सुधारणा करीत २००१ ते २००९ पर्यंतच्या शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली आहे. २००१ ते १६ चे थकबाकीदार शेडनेट, पॉलीहाऊस व इमूपालक शेतकऱ्यांनाही दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे.शेतकरी संघटना, राजकीय पक्ष आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तथा वेळोवेळी झालेली आंदोलने लक्षात घेत आठमुठ्या धोरणाने का होईना कर्जमाफी योजनेवर अंमल केला. याचा शेतकऱ्यांना लाभही मिळाला; पण अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले. अनेक शेतकºयांच्या २००१ ते २००९ दरम्यानच्या कर्जाचे पुनर्गठण झाले होते. यातील कर्ज थकित झाले होते. अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकला नव्हता. या वंचित शेतकऱ्यांनी लाँग मार्च काढला. शिवाय सुकाणू समितीकडूनही सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी होत होती. ही ओरड लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत सुधारणा करून नवीन निर्णय जारी करण्यात आला आहे.नवीन शासन निर्णयानुसार एप्रिल २००१ ते मार्च २००९ पर्यंतच्या पीक, मध्यम मुदत कर्जाची ३० जून २०१६ रोजी थकित रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै २०१७ पर्यंत थकित रक्कम दीड लाखांपर्यंत माफ केली. यात अल्प, अत्यल्प भूधारक आदी विचार करण्यात आला नसून पूर्वीच्या निकषाप्रमाणे सरसकट माफी देण्यात आली आहे. १ एप्रिल ०१ ते ३१ मार्च ०९ पर्यंत वाटप पीक कर्जापैकी ३० जून २०१६ पूर्वी वा नंतर पुनर्गठन, फेरपुनर्गठन झालेल्या कर्जाचे ३१ जुलै १७ पर्यंत थकीत व उर्वरित दीड लाखांपर्यंतचे हप्ते माफीत समाविष्ट केलेत. शिवाय १ एप्रिल ०१ ते ३१ मार्च १६ पर्यंत इमूपालन, शेडनेट, पॉलीहाऊस यासाठी मध्यम मुदत कर्ज घेतलेल्या व ३० जून १६ रोजी थकित रकमेतून परतफेड केलेली रक्कम वगळून ३१ जुलै १७ पर्यंतची दीड लाखांपर्यंतची रक्कम माफ केली आहे. यातही थकबाकीदार शेतकऱ्यांचा अल्प, अत्यल्प भूधारक हा विचार न करता सरसकट प्रती कुटूंब १.५० लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली आहे.नापिकी व योग्य हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना २००१ पासून अनेकदा कर्जाचे पुनर्गठण करून घ्यावे लागले. अशा शेतकºयांचाही नवीन शासन निर्णयात विचार करण्यात आलेला आहे. यात २००१ ते १०१६ पर्यंतच्या पीक कर्जाचे पुनर्गठण, फेरपुनर्गठण, मध्यम मुदत कर्जाची थकित रक्कम तथा यापूर्वी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने पात्र कर्जखाती, रक्कम अशी सर्व थकीत रक्कम दीड लाखांपर्यंत ३० जून २०१८ पर्यंत भरल्यास त्यांनाही प्रती कुटूंब १.५० लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे. यात केवळ एक अट टाकण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने २००८ व राज्य शासनाने २००९ मध्ये कर्जमाफी दिली होती. या योजनेचा २००१ ते २००९ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला नसल्याचे संबंधित बँकेकडून घोषणापत्र घेणे बंधनकारक केले आहे. या निर्णयामुळे वंचितांना कर्जमाफी मिळणार आहे.योजनेतील निकष कायमचछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी २८ जून २०१७ व त्यानंतर वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील निकष कायम ठेवण्यात आले आहेत. यामुळे सुधारित निर्णयानुसार कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावयाचा असल्यास शेतकऱ्यांना निकषांची पूर्तता ही करावीच लागणार आहे. असे असले तरी कर्ज माफ होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्धा जिल्ह्यातील वंचित शेतकºयांनाही याचा लाभ मिळणार आहे.हंगामापर्यंत मिळावी कर्जमाफी२००१ ते २०१६ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना शासनाने सुधारित निर्णयातून दिला तर दिला; पण ही कर्जमाफी नवीन खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मिळावी, अशी अपेक्षा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेणे तथा जोमाने शेती करणे सुलभ होणार आहे. असे असले तरी निकष तेच असल्याने इतक्या लवकर कर्जमाफीचा लाभ मिळणे शक्य नसल्याचेच दिससते.