शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पूर्वीच्या थकबाकी वसुलीचा लोड; तर आता मान्सून पूर्व कामांची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मान्सूनचे आगमन होताच वादळीवारा आणि पावसामुळे बहुधा विद्युत तारा तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसानच सोसावे लागते. हे नुकसान टाळता यावे या हेतूने पावसाळ्यापूर्वी विविध कामे महावितरण हाती घेत असून हीच कामे २० मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या थकबाकी वसुलीमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. अशातच आता मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

चार महिन्यांत १८ कोटींची वसूली- कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली पथके नेमण्यात आली. याच पथकांनी विशेष मोहीम शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून मागील चार महिन्यांत तब्बल १८ कोटींची थकबाकी वसूल केल्याचे वास्तव आहे. तशी नोंद महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने घेतली आहे.

वसुलीसाठी १३ पथके-  कोटींच्या थकबाकीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण वाढली आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात किमान १३ पथके तयार करण्यात आली असून याच पथकांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात धडक वसुली मोहीम राबविली जात  आहे.  ग्राहकांना आवाहन केले जात आहे.

पथदिवे लावण्याचे काम- पावसाळा लागण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती गावात अंधार होऊ नये म्हणून पथदिवे लावण्याचे काम हाती घेतात. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. ते गावातील खांबावर दिवे लावून देतात.

पावसाळी कामे कोणती?- महावितरण मान्सूनपूर्व कामे हाती घेत असून या कामांदरम्यान विद्युत वाहिनीवर आलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जातात. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी विद्युत खांब वाकलेे असतील ते व्यवस्थित करण्यासह लोंबकळत असलेल्या विद्युत तारा व्यवस्थित केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. ही कामे करताना खबरदारीचा उपाय म्हणून काही काळाकरिता त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. शहरी व ग्रामीण भागात विद्युत रोहित्र त्यावरील भार पाहून बदलविण्याचे कामही केले जाते. वीज पडल्याने इन्सुलेटर उडतात. त्याचा आवश्यक स्टाॅक उपलब्ध करून ठेवावा लागतो.

निम्म्याहून अधिक भागातील कामे पूर्ण- मे महिन्यांच्या सुरुवातीलाच महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. जिल्ह्यातील १३ उपकेंद्रांपैकी निम्म्याहून अधिक भागात पावसाळापूर्वीची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत. २० मे पर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील ही कामे पूर्ण करण्याचा मानस महावितरणचा आहे.

अन्यथा सोसावे लागते नुकसान- मान्सूनचे आगमन होताच वादळीवाऱ्यासह पाऊस होतो. अशातच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तुटून बहुधा विद्युत वाहिन्या तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे वेळीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :electricityवीज