शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
6
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
7
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
8
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
9
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
10
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
11
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!
12
लोकशाहीचा गळा घोटण्याचा नवा ‘कायदेशीर’ मार्ग; याला हुकूमशाही म्हणायला हवी
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

पूर्वीच्या थकबाकी वसुलीचा लोड; तर आता मान्सून पूर्व कामांची डेडलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मान्सूनचे आगमन होताच वादळीवारा आणि पावसामुळे बहुधा विद्युत तारा तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसानच सोसावे लागते. हे नुकसान टाळता यावे या हेतूने पावसाळ्यापूर्वी विविध कामे महावितरण हाती घेत असून हीच कामे २० मे पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे पूर्वीच्या थकबाकी वसुलीमुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. अशातच आता मान्सूनपूर्व कामांची डेडलाईन देण्यात आल्याने पावसाळ्यापूर्वीची कामे पूर्ण करताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे. जिल्ह्यात सध्या भारनियमन लागू करण्यात आलेले नाही; पण हीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी विविध भागातील विद्युत पुरवठा काही तासांसाठी खंडित केला जात आहे. तसेच शहरी, ग्रामीण भागात देखभाल, दुरस्तीच्या कामासाठी सुध्दा अनेकदा तात्पुरता खंडीत केला जातो. 

चार महिन्यांत १८ कोटींची वसूली- कोटींची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणकडून वसुली पथके नेमण्यात आली. याच पथकांनी विशेष मोहीम शहरी व ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवून मागील चार महिन्यांत तब्बल १८ कोटींची थकबाकी वसूल केल्याचे वास्तव आहे. तशी नोंद महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयाने घेतली आहे.

वसुलीसाठी १३ पथके-  कोटींच्या थकबाकीने महावितरणच्या अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण वाढली आहे. थकबाकी वसुलीसाठी जिल्ह्यात किमान १३ पथके तयार करण्यात आली असून याच पथकांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात धडक वसुली मोहीम राबविली जात  आहे.  ग्राहकांना आवाहन केले जात आहे.

पथदिवे लावण्याचे काम- पावसाळा लागण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती गावात अंधार होऊ नये म्हणून पथदिवे लावण्याचे काम हाती घेतात. त्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाते. ते गावातील खांबावर दिवे लावून देतात.

पावसाळी कामे कोणती?- महावितरण मान्सूनपूर्व कामे हाती घेत असून या कामांदरम्यान विद्युत वाहिनीवर आलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडल्या जातात. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी विद्युत खांब वाकलेे असतील ते व्यवस्थित करण्यासह लोंबकळत असलेल्या विद्युत तारा व्यवस्थित केल्या जात असल्याचे सांगण्यात आले. ही कामे करताना खबरदारीचा उपाय म्हणून काही काळाकरिता त्या भागातील विद्युत पुरवठा खंडित केला जातो. शहरी व ग्रामीण भागात विद्युत रोहित्र त्यावरील भार पाहून बदलविण्याचे कामही केले जाते. वीज पडल्याने इन्सुलेटर उडतात. त्याचा आवश्यक स्टाॅक उपलब्ध करून ठेवावा लागतो.

निम्म्याहून अधिक भागातील कामे पूर्ण- मे महिन्यांच्या सुरुवातीलाच महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यात आली. जिल्ह्यातील १३ उपकेंद्रांपैकी निम्म्याहून अधिक भागात पावसाळापूर्वीची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही ठिकाणी युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत. २० मे पर्यंत जिल्ह्यातील विविध भागातील ही कामे पूर्ण करण्याचा मानस महावितरणचा आहे.

अन्यथा सोसावे लागते नुकसान- मान्सूनचे आगमन होताच वादळीवाऱ्यासह पाऊस होतो. अशातच विद्युत तारांवरील झाडांच्या फांद्या तुटून बहुधा विद्युत वाहिन्या तुटतात. त्यामुळे महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागते. त्यामुळे वेळीच मान्सूनपूर्व कामे पूर्ण होणे गरजेचे असल्याचे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

 

टॅग्स :electricityवीज