शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शेळीपालनातून उजळल्या जीवनवाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 22:10 IST

सतीश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ...

ठळक मुद्देजिद्द, चिकाटीच यशाचे गमक : स्वयंसाहाय्यता बचत गटातून मिळाली उभारी

सतीश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ओळखून समाजात तिलाही चार भिंतीबाहेर आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना खऱ्या अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून बळ मिळाले. परिणामी, आज गावागावातील महिला सक्षम होऊन स्वत: जोरावर आपला संसार ऐटीत हाकताना दिसून येत आहे. यात अल्लीपूरच्या महिलांचाही समावेश असून त्यांनी स्वयंरोजगारातून माध्यमातून आपल्या समृद्ध जीवनाची वाट धरली आले.येथील विद्या वाघमारे या महिलेचे जीवन बचत गटामुळे संमृद्ध झाले आहे. पती-पत्नी दोघेही दुसऱ्याच्या कामाला जाऊन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी विद्या वाघमारे यांनी प्रज्ञा शील स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला. या मध्ये पंधरा महिला सदस्या असून दरमहा प्रत्येकी १०० रुपये गोळा करायला सुरुवात केली. सहा महिन्यापर्यंत हा बचत गट सुरळीत चालल्याने बचत गटाला स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळाले. यातून बचत गटाच्या महिलांनी आपापला स्वयंरोजगार सुरु करुन परिवाराला हातभार लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. विद्या वाघमारे यांनी त्याच पैशातून दोन शेळ्या घेतल्या. वर्षभरातच उत्पन्न दुप्पट झाल्याने गटाच्या माध्यमातूनही शेळीपालन व्यवसायाला चालना मिळाली. पैशाची आवकही वाढू लागल्याने त्यांची ही भरभराटी पाहून उमेद अभियान अंतर्गत विद्या वाघमारे यांची पशुसखी म्हणून गावातून निवड करण्यात आली. पशुसखी म्हणून कार्य करीत असताना वेगवेगळे पशुखाद्य, औषधी व खते तयार करून ते पशुपालकांना माफक दरात उपलब्ध करुन देत आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळत असल्याने त्यांच्या कष्टमय जीवनाचे फलीत झाले आहे. त्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून घेतलेली ही झेप इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.महिलांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष असतो. तेव्हा खचून न जाता परिस्थितीशी झगडण्यासाठी आपण तयार असलो की, आपल्याला आपोआपच मार्ग सापडायला लागतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याची मोठी चळचळ उभी राहिली असून त्यातून महिलांनी आपले आयुष्य सुखकर करावे.- विद्या वाघमारे, अल्लीपूर.

टॅग्स :Womenमहिला