शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

शेळीपालनातून उजळल्या जीवनवाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 22:10 IST

सतीश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ...

ठळक मुद्देजिद्द, चिकाटीच यशाचे गमक : स्वयंसाहाय्यता बचत गटातून मिळाली उभारी

सतीश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ओळखून समाजात तिलाही चार भिंतीबाहेर आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना खऱ्या अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून बळ मिळाले. परिणामी, आज गावागावातील महिला सक्षम होऊन स्वत: जोरावर आपला संसार ऐटीत हाकताना दिसून येत आहे. यात अल्लीपूरच्या महिलांचाही समावेश असून त्यांनी स्वयंरोजगारातून माध्यमातून आपल्या समृद्ध जीवनाची वाट धरली आले.येथील विद्या वाघमारे या महिलेचे जीवन बचत गटामुळे संमृद्ध झाले आहे. पती-पत्नी दोघेही दुसऱ्याच्या कामाला जाऊन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी विद्या वाघमारे यांनी प्रज्ञा शील स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला. या मध्ये पंधरा महिला सदस्या असून दरमहा प्रत्येकी १०० रुपये गोळा करायला सुरुवात केली. सहा महिन्यापर्यंत हा बचत गट सुरळीत चालल्याने बचत गटाला स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळाले. यातून बचत गटाच्या महिलांनी आपापला स्वयंरोजगार सुरु करुन परिवाराला हातभार लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. विद्या वाघमारे यांनी त्याच पैशातून दोन शेळ्या घेतल्या. वर्षभरातच उत्पन्न दुप्पट झाल्याने गटाच्या माध्यमातूनही शेळीपालन व्यवसायाला चालना मिळाली. पैशाची आवकही वाढू लागल्याने त्यांची ही भरभराटी पाहून उमेद अभियान अंतर्गत विद्या वाघमारे यांची पशुसखी म्हणून गावातून निवड करण्यात आली. पशुसखी म्हणून कार्य करीत असताना वेगवेगळे पशुखाद्य, औषधी व खते तयार करून ते पशुपालकांना माफक दरात उपलब्ध करुन देत आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळत असल्याने त्यांच्या कष्टमय जीवनाचे फलीत झाले आहे. त्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून घेतलेली ही झेप इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.महिलांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष असतो. तेव्हा खचून न जाता परिस्थितीशी झगडण्यासाठी आपण तयार असलो की, आपल्याला आपोआपच मार्ग सापडायला लागतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याची मोठी चळचळ उभी राहिली असून त्यातून महिलांनी आपले आयुष्य सुखकर करावे.- विद्या वाघमारे, अल्लीपूर.

टॅग्स :Womenमहिला