शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मध्य प्रदेशातूनही येते दारूची 'खेप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:39 IST

गांधी - विनोबांच्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' ठरला फुसका

रवींद्र चांदेकर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' फुसका ठरला आहे. दारूबंदी नावालाच उरली असून, वर्धा जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून दारूची 'खेप' जिल्ह्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला आश्रम तयार करून तेथे वास्तव्य केले. याच आश्रमातून अनेक चळवळींचा जन्म झाला. आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथे आश्रम स्थापन करून भुदान चळवळ राबविली. परिणामी, वर्धा जिल्ह्याला देशात वेगळी ओळख प्राप्त झाली. त्यामुळेच शासनाने १९७४ पासून जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. त्याला आता ५१ वर्षे लोटली आहेत. मात्र, ही दारूबंदी फसवी निघाल्याचे दिसून येत आहे. शासनाने महसूल वाढीसाठी राज्यात दारू विक्रीचे परवाने दिले. बीअर शॉपींना परवानगी दिली. सध्या राज्यात जवळपास २० हजारांच्यावर परवानाधारक आहेत. यात रेस्टॉरंट, 'बार'चा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत गावठी हातभट्टीची दारूही गाळली जाते. पोलिसांच्या छाप्यांवरून ही बाब सिद्ध होते. वर्धा जिल्ह्यातही शेत, नदी, नाले, गाव, आदी ठिकाणी हातभट्ट्या पेटतात. जिल्ह्याशेजारील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, आदी जिल्ह्यांतून दारूची खेप जिल्ह्यात पोहोचते. 

हॉटेलात दारू पिण्यास मनाईचे फलकजिल्ह्यात येणारी दारू रोखण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. नंतर पोलिसांवर ही जबाबदारी येते. मात्र, त्यांच्या कारवाया नाममात्र असल्याचे दिसून येते. दारू विक्रेत्यांवर 'वर्दी'चा वचक दिसून येत नाही. 'वर्दी'तील काही चेहरेच दारूचे 'दर्दी' असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ एक फोन केल्यास दारू विक्रेते थेट घरपोच सेवा देतात. काही हॉटेलमध्ये तर दारूबंदी असतानाही चक्क 'येथे दारू पिण्यास मनाई आहे', असे फलक लागलेले दिसून येतात

खासदारांचे शाह यांना साकडे५१ वर्षे उलटूनही दारूबंदी केवळ कागदावरच असून, जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे साकडे नुकतेच खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घातले. खासदारांनी जिल्ह्यात पानटपरीपासून, घराघरांतून दारूविक्री केली जात असल्याचे त्यांना सांगितले.

पालकमंत्र्यांनीही वेधले लक्षजिल्ह्यात दारूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाचे रासायनिक परीक्षण जलदगतीने व्हावे म्हणून जिल्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळा निर्माण करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दहा वर्षांत ५० हजार आरोपी निर्दोष...१० वर्षात २०१४ ते २०२४ पर्यंत जिल्ह्यात दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ३४० गुन्ह्यांचा निकाल लागला. ६७४ प्रकरणांत गुन्हा सिद्ध झाला. ५० हजार ६६६ गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटले. यावरून दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :wardha-acवर्धा