शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मध्य प्रदेशातूनही येते दारूची 'खेप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:39 IST

गांधी - विनोबांच्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' ठरला फुसका

रवींद्र चांदेकर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' फुसका ठरला आहे. दारूबंदी नावालाच उरली असून, वर्धा जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून दारूची 'खेप' जिल्ह्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला आश्रम तयार करून तेथे वास्तव्य केले. याच आश्रमातून अनेक चळवळींचा जन्म झाला. आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथे आश्रम स्थापन करून भुदान चळवळ राबविली. परिणामी, वर्धा जिल्ह्याला देशात वेगळी ओळख प्राप्त झाली. त्यामुळेच शासनाने १९७४ पासून जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. त्याला आता ५१ वर्षे लोटली आहेत. मात्र, ही दारूबंदी फसवी निघाल्याचे दिसून येत आहे. शासनाने महसूल वाढीसाठी राज्यात दारू विक्रीचे परवाने दिले. बीअर शॉपींना परवानगी दिली. सध्या राज्यात जवळपास २० हजारांच्यावर परवानाधारक आहेत. यात रेस्टॉरंट, 'बार'चा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत गावठी हातभट्टीची दारूही गाळली जाते. पोलिसांच्या छाप्यांवरून ही बाब सिद्ध होते. वर्धा जिल्ह्यातही शेत, नदी, नाले, गाव, आदी ठिकाणी हातभट्ट्या पेटतात. जिल्ह्याशेजारील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, आदी जिल्ह्यांतून दारूची खेप जिल्ह्यात पोहोचते. 

हॉटेलात दारू पिण्यास मनाईचे फलकजिल्ह्यात येणारी दारू रोखण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. नंतर पोलिसांवर ही जबाबदारी येते. मात्र, त्यांच्या कारवाया नाममात्र असल्याचे दिसून येते. दारू विक्रेत्यांवर 'वर्दी'चा वचक दिसून येत नाही. 'वर्दी'तील काही चेहरेच दारूचे 'दर्दी' असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ एक फोन केल्यास दारू विक्रेते थेट घरपोच सेवा देतात. काही हॉटेलमध्ये तर दारूबंदी असतानाही चक्क 'येथे दारू पिण्यास मनाई आहे', असे फलक लागलेले दिसून येतात

खासदारांचे शाह यांना साकडे५१ वर्षे उलटूनही दारूबंदी केवळ कागदावरच असून, जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे साकडे नुकतेच खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घातले. खासदारांनी जिल्ह्यात पानटपरीपासून, घराघरांतून दारूविक्री केली जात असल्याचे त्यांना सांगितले.

पालकमंत्र्यांनीही वेधले लक्षजिल्ह्यात दारूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाचे रासायनिक परीक्षण जलदगतीने व्हावे म्हणून जिल्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळा निर्माण करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दहा वर्षांत ५० हजार आरोपी निर्दोष...१० वर्षात २०१४ ते २०२४ पर्यंत जिल्ह्यात दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ३४० गुन्ह्यांचा निकाल लागला. ६७४ प्रकरणांत गुन्हा सिद्ध झाला. ५० हजार ६६६ गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटले. यावरून दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :wardha-acवर्धा