शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात मध्य प्रदेशातूनही येते दारूची 'खेप'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 13:39 IST

गांधी - विनोबांच्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' ठरला फुसका

रवींद्र चांदेकर लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या कर्मभूमीत दारूबंदीचा 'बार' फुसका ठरला आहे. दारूबंदी नावालाच उरली असून, वर्धा जिल्ह्यात थेट मध्य प्रदेशातून दारूची 'खेप' जिल्ह्यात येत आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात सेवाग्रामला आश्रम तयार करून तेथे वास्तव्य केले. याच आश्रमातून अनेक चळवळींचा जन्म झाला. आचार्य विनोबा भावे यांनी पवनार येथे आश्रम स्थापन करून भुदान चळवळ राबविली. परिणामी, वर्धा जिल्ह्याला देशात वेगळी ओळख प्राप्त झाली. त्यामुळेच शासनाने १९७४ पासून जिल्ह्यात दारूबंदी घोषित केली. त्याला आता ५१ वर्षे लोटली आहेत. मात्र, ही दारूबंदी फसवी निघाल्याचे दिसून येत आहे. शासनाने महसूल वाढीसाठी राज्यात दारू विक्रीचे परवाने दिले. बीअर शॉपींना परवानगी दिली. सध्या राज्यात जवळपास २० हजारांच्यावर परवानाधारक आहेत. यात रेस्टॉरंट, 'बार'चा समावेश आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांत गावठी हातभट्टीची दारूही गाळली जाते. पोलिसांच्या छाप्यांवरून ही बाब सिद्ध होते. वर्धा जिल्ह्यातही शेत, नदी, नाले, गाव, आदी ठिकाणी हातभट्ट्या पेटतात. जिल्ह्याशेजारील नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर, आदी जिल्ह्यांतून दारूची खेप जिल्ह्यात पोहोचते. 

हॉटेलात दारू पिण्यास मनाईचे फलकजिल्ह्यात येणारी दारू रोखण्याची पहिली जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागावर आहे. नंतर पोलिसांवर ही जबाबदारी येते. मात्र, त्यांच्या कारवाया नाममात्र असल्याचे दिसून येते. दारू विक्रेत्यांवर 'वर्दी'चा वचक दिसून येत नाही. 'वर्दी'तील काही चेहरेच दारूचे 'दर्दी' असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक ठिकाणी केवळ एक फोन केल्यास दारू विक्रेते थेट घरपोच सेवा देतात. काही हॉटेलमध्ये तर दारूबंदी असतानाही चक्क 'येथे दारू पिण्यास मनाई आहे', असे फलक लागलेले दिसून येतात

खासदारांचे शाह यांना साकडे५१ वर्षे उलटूनही दारूबंदी केवळ कागदावरच असून, जिल्ह्यात दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे साकडे नुकतेच खासदार अमर काळे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना घातले. खासदारांनी जिल्ह्यात पानटपरीपासून, घराघरांतून दारूविक्री केली जात असल्याचे त्यांना सांगितले.

पालकमंत्र्यांनीही वेधले लक्षजिल्ह्यात दारूबंदी प्रभावीपणे राबविण्यासाठी जप्त केलेल्या मुद्देमालाचे रासायनिक परीक्षण जलदगतीने व्हावे म्हणून जिल्ह्यात न्यायवैद्यक प्रयोगशाळा निर्माण करावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

दहा वर्षांत ५० हजार आरोपी निर्दोष...१० वर्षात २०१४ ते २०२४ पर्यंत जिल्ह्यात दारूबंदीचे ९३ हजार ५५४ गुन्हे दाखल करण्यात आले. ५१ हजार ३४० गुन्ह्यांचा निकाल लागला. ६७४ प्रकरणांत गुन्हा सिद्ध झाला. ५० हजार ६६६ गुन्ह्यांत आरोपी निर्दोष सुटले. यावरून दोषसिद्धीचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते.

टॅग्स :wardha-acवर्धा