शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या हद्दीत नसताना भरमसाठ कर आकारणी

By admin | Updated: February 5, 2015 23:14 IST

रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर

वर्धा : रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर परिषदेमध्येही येत नाही व ग्रामपंचायतीकडेही येत नाही़ यामुळे या वॉर्डाचा अद्यापही विकास झाला नाही़ असे असले तरी नगर परिषदेद्वारे नागरिकांना ३ ते ९ हजार रुपयांची पाणी कराची देयके देण्यात आलीत़ या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष असून याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ वर्धा नगर परिषद आणि सिंदी मेघे ग्रामपंचायत या दोन्ही स्वराज्य संस्था तुकाराम वॉर्ड त्यांच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत आहे़ यामुळे समस्या कुणाला सांगाव्या, असा प्रश्न नागरिकांना त्रस्त करीत आहे़ संपूर्ण वर्धा शहरात नुतनीकरण सुरू असून ग्रा़पं़ अंतर्गत अनेक भागांचाही विकास सुरू आहे; पण या भागात कुठल्याही प्रकारची विकास कामे करण्यात आलेली नाही़ या भागातील नाल्या, रस्ते यांची दुरूस्ती अद्याप करण्यात आलेली नाही़ १५ ते १६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या, रस्ते आहेत़ त्यांची दुरवस्था झाली असून नाल्या फुटल्यात़ यामुळे पावसाळ्यात सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरते व नागरिकांची धावपळ होते़ काही ठिकाणी सांडपाणी तुंबलेल्या नाल्या व कचऱ्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या; पण उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ नागरिकांनी जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदन सादर केले़ यावर नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेशाला तिलांजली दिली़ उलट पालिकेने एका कुटुंबाला प्रतिवर्ष ३ हजार रुपये प्रमाणे पाणीकर आकारला़ २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ या तीन वर्षांकरिता प्रत्येक कुटुंबाला ९ हजार रुपयांचे देयक देण्यात आले़ या भरमसाठ पाणी कर वसुलीच्या धोरणाविरूद्ध नागरिकांनी एल्गार पुकारला आहे़ सोमवारी (दि़२) लोकशाही दिनात तक्रार करीत पालिकेने आकारलेला कर कमी करून पूर्वीप्रमाणे वार्षिक ८५० रुपये करावा, १५ वर्षांपासून हद्दपार केलेला हा भाग पुर्ववत पालिकेत समाविष्ट करावा, विक्री झालेल्या घरांचे फेरफार करावे, नाल्या व रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, सार्वजनिक शौचालय पाडून उद्यान तयार करावे, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी विठ्ठल राऊत, वर्धमान माळोदे, दीपक अंबुलकर, रमेश फिरके, असटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)