शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या हद्दीत नसताना भरमसाठ कर आकारणी

By admin | Updated: February 5, 2015 23:14 IST

रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर

वर्धा : रामनगर परिसरातील संत तुकाराम वॉर्ड पूर्वी वर्धेचा वॉर्ड क्रमांक १८ म्हणून गणला जात होता़ यातील काही भाग गत १५ ते १६ वर्षांपूर्वी नगर पालिकेने तोडून हद्दपार केला़ सध्या हा भाग नगर परिषदेमध्येही येत नाही व ग्रामपंचायतीकडेही येत नाही़ यामुळे या वॉर्डाचा अद्यापही विकास झाला नाही़ असे असले तरी नगर परिषदेद्वारे नागरिकांना ३ ते ९ हजार रुपयांची पाणी कराची देयके देण्यात आलीत़ या प्रकारामुळे नागरिकांत असंतोष असून याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ वर्धा नगर परिषद आणि सिंदी मेघे ग्रामपंचायत या दोन्ही स्वराज्य संस्था तुकाराम वॉर्ड त्यांच्या हद्दीत येत नसल्याचे सांगत आहे़ यामुळे समस्या कुणाला सांगाव्या, असा प्रश्न नागरिकांना त्रस्त करीत आहे़ संपूर्ण वर्धा शहरात नुतनीकरण सुरू असून ग्रा़पं़ अंतर्गत अनेक भागांचाही विकास सुरू आहे; पण या भागात कुठल्याही प्रकारची विकास कामे करण्यात आलेली नाही़ या भागातील नाल्या, रस्ते यांची दुरूस्ती अद्याप करण्यात आलेली नाही़ १५ ते १६ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नाल्या, रस्ते आहेत़ त्यांची दुरवस्था झाली असून नाल्या फुटल्यात़ यामुळे पावसाळ्यात सांडपाणी नागरिकांच्या घरात शिरते व नागरिकांची धावपळ होते़ काही ठिकाणी सांडपाणी तुंबलेल्या नाल्या व कचऱ्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव होत आहे. याबाबत नागरिकांनी पालिकेकडे अनेकदा तक्रारी केल्या; पण उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली़ नागरिकांनी जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांना निवेदन सादर केले़ यावर नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संयुक्त पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या; पण तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदेशाला तिलांजली दिली़ उलट पालिकेने एका कुटुंबाला प्रतिवर्ष ३ हजार रुपये प्रमाणे पाणीकर आकारला़ २०१२-१३, २०१३-१४ व २०१४-१५ या तीन वर्षांकरिता प्रत्येक कुटुंबाला ९ हजार रुपयांचे देयक देण्यात आले़ या भरमसाठ पाणी कर वसुलीच्या धोरणाविरूद्ध नागरिकांनी एल्गार पुकारला आहे़ सोमवारी (दि़२) लोकशाही दिनात तक्रार करीत पालिकेने आकारलेला कर कमी करून पूर्वीप्रमाणे वार्षिक ८५० रुपये करावा, १५ वर्षांपासून हद्दपार केलेला हा भाग पुर्ववत पालिकेत समाविष्ट करावा, विक्री झालेल्या घरांचे फेरफार करावे, नाल्या व रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, सार्वजनिक शौचालय पाडून उद्यान तयार करावे, अशी मागणी करण्यात आली़ यावेळी विठ्ठल राऊत, वर्धमान माळोदे, दीपक अंबुलकर, रमेश फिरके, असटकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते़(कार्यालय प्रतिनिधी)