जगातील पहिले प्राकृतिक विद्यापीठ : आर्थिक अडचण आणि नियोजनाचा अभावदिलीप चव्हाण सेवाग्राममहात्मा गांधी यांच्या विचारसरणीतून सेवाग्राम येथे जगातील पहिले प्राकृतिक चिकित्सालय असलेले ‘जीवन विद्यापीठ’ साकारण्याचा संकल्प केला होता; परंतु हे विद्यापीठ आता पूर्णत्वास जाते अथवा नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. समितीकडे असलेली आर्थिक अडचण व नियोजनाच्या अभावामुळे या विद्यापीठाचे काम रखडले आहे. यामुळे महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण होणे सद्य:स्थितीत अवघड झाले आहे.महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित करंजा (भोगे) मार्गावर विद्यापीठ निर्माण करण्याचा संकल्प सोडण्यात आला होता. या कामाकरिता गांधी विचाराने प्रेरीत झालेल्या काही सदस्यांची एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांच्याकडून केवळ उद्घाटन व काही अर्धवट भिंती उभारण्यापलीकडे कुठलेही काम झाले नसल्याचे दिसून येत आहे. या इमारतीचे भूमिपूजन करण्यात येऊन आठ वर्षांचा काळ लोटला तरी ते पूर्णत्वास आले नाही. यामुळे या विद्यापीठाच्या पूर्णत्वावर आता सर्वत्र प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सेवाग्राम आश्रमानजीक करंजी (भोगे) मार्गावर महात्मा गांधी जीवन प्राकृतिक विद्यापीठाच्या निर्माणाचे काम सुरू झाले होते. सध्या ते काम बंदावस्थेत आहे. गांधीजींची प्राकृतिक चिकित्सेवर श्रद्धा असल्याने त्यांनी येथे तसे विद्यापीठ तयार व्हावे असे स्वप्न पाहिले होते. महात्मा गांधी यांच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी गांधी विचार प्रचारकांनी येथे विद्यापीठ व्हावे असा संकल्पही सोडला होता. बापूंची कर्मभूमी व वास्तव्य सेवाग्राममध्ये असल्याने सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने या विद्यापीठाकरिता १० एकर जमीन प्राकृतिक चिकित्सा समिती राजघाट, दिल्ली यांना दिली.१ डिसेंबर २००७ रोजी खा. जनार्धन द्विवेदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. अनेक आर्थिक अडथळे पार करीत २०१६ वर्ष आले तरी यात खूपशी प्रगती झाली नाही. मुख्य इमारतीच्या मोठ्या हॉलची छपाई खिडक्या, दरवाजे, टाईल्स आदींसह बाजूचे बांधकाम अर्ध्यावरच आहे. बांधकाम पाहता विद्यापीठ होईल अथवा नाही असाच प्रश्न पडतो. येथे इमारतीच्या नावावर खंडहर तयार झाले आहे. यामुळे येथे आता इमारत पूर्णत्वास जाईल अथवा नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
‘जीवन विद्यापीठ पूर्णत्वाचे स्वप्न धूसर’, बांधकाम अपूर्णच
By admin | Updated: February 26, 2016 02:40 IST