शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवाहीसाठी डोंग्यातून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला.

ठळक मुद्देपवनारातील वास्तव : जिल्हा प्रशासनाचा समस्येकडे कानाडोळा

श्रीकांत तोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : तीनशे मीटर नदीपात्र ओलांडून शेतीवाहीसाठी येथील शेतकऱ्यांचा कित्येक वर्षांपासून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसून अनास्था कायम आहे.वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला. पवनारला येण्यास कान्हापूरमार्गे तीन किलोमीटरचा फेरा वाढल्याने त्यांनी सेलू येथे जाणे पसंत केले. मात्र, पवनार येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या पैलतीरावर आहे. त्यांना शेतीवर जाण्यासाठी नदी ही ओलांडावीच लागते, शेतमाल, शेतमजूर यांचीसुद्धा ने-आण करावी लागते. एम.आय.डी.सीच्या बंधाºयावरून छोटा पूल आहे. मात्र, त्या पुलावरून गेल्यास तीन-चार किलोमीटरचा फेरा पडतो. यात बराच वेळ खर्ची होत असल्याने या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी डोंग्याचा वापर केला जातो. साधारण ३०० मीटर नदीपात्र हे त्या डोंग्यातून पार केले जाते. ज्या मार्गाने डोंगा जातो, तेथे कमीत कमी पंधरा फूट पाण्याची पातळी असते. सकाळच्या वेळेस शेतात जाण्याची शेतमालकासह शेतमजुरांची लगबग असते. त्यामुळे क्षतमेपेक्षा जास्त प्रवासी नावाड्याने मनाई केल्यावर सुद्धा बसतात. प्रवास करणाऱ्यांसाठी कुठल्याही लाईफ जॅकेट्सची व्यवस्था नसते. पाणी अडविल्यामुळे नदीची पातळी वर्षभर कायम असते, त्यामुळे नेहमीकरीताच डोंग्याचा वापर केला जातो. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जो डोंगा हाकलतो, तो नाममात्र शुल्क घेत असल्याने सोयी-सुविधा देऊ शकत नाही. सोयी द्यायच्या म्हटले तर आकारलेले जास्तीचे शुल्क शेतमालक किंवा शेतमजुराला परवडणारे नाही. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.पुलाची निर्मिती कासवगतीनेही अडचण दूर व्हावी म्हणून अनेक वर्षापासून असलेली पुलाची मागणी आमदार पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून तत्कालीन सरकारने मंजूर केली. दोन वर्षांपासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. हीच गती कायम राहिल्यास अजून दोन वर्षे पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. पुलाचे काम लवकर करावे किंवा डोंग्याने जाण्यासाठी सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर