शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीवाहीसाठी डोंग्यातून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 05:00 IST

वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला.

ठळक मुद्देपवनारातील वास्तव : जिल्हा प्रशासनाचा समस्येकडे कानाडोळा

श्रीकांत तोटे ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनार : तीनशे मीटर नदीपात्र ओलांडून शेतीवाहीसाठी येथील शेतकऱ्यांचा कित्येक वर्षांपासून जीवघेणा प्रवास सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नसून अनास्था कायम आहे.वीस वर्षांपूर्वी वाहितपूर-मोर्चापूर येथील नागरिक पवनार येथे बाजारहाट करण्याकरिता येत असत. वर्ध्याला जायचे असेल तर पवनारपर्यंत पायी किंवा सायकलने येऊन मग तेथून एस.टी. किंवा इतर वाहनाने वर्ध्याला जायचे. मात्र, वर्धा एमआयडीसीला पाणीपुरवठा करण्यासाठी बंधारा बांधला गेला व परिस्थिती बदलली. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदीतून आवागमनाचा मार्ग बंद झाला. पवनारला येण्यास कान्हापूरमार्गे तीन किलोमीटरचा फेरा वाढल्याने त्यांनी सेलू येथे जाणे पसंत केले. मात्र, पवनार येथील अनेक शेतकऱ्यांची शेती नदीच्या पैलतीरावर आहे. त्यांना शेतीवर जाण्यासाठी नदी ही ओलांडावीच लागते, शेतमाल, शेतमजूर यांचीसुद्धा ने-आण करावी लागते. एम.आय.डी.सीच्या बंधाºयावरून छोटा पूल आहे. मात्र, त्या पुलावरून गेल्यास तीन-चार किलोमीटरचा फेरा पडतो. यात बराच वेळ खर्ची होत असल्याने या तिरावरून त्या तिरावर जाण्यासाठी डोंग्याचा वापर केला जातो. साधारण ३०० मीटर नदीपात्र हे त्या डोंग्यातून पार केले जाते. ज्या मार्गाने डोंगा जातो, तेथे कमीत कमी पंधरा फूट पाण्याची पातळी असते. सकाळच्या वेळेस शेतात जाण्याची शेतमालकासह शेतमजुरांची लगबग असते. त्यामुळे क्षतमेपेक्षा जास्त प्रवासी नावाड्याने मनाई केल्यावर सुद्धा बसतात. प्रवास करणाऱ्यांसाठी कुठल्याही लाईफ जॅकेट्सची व्यवस्था नसते. पाणी अडविल्यामुळे नदीची पातळी वर्षभर कायम असते, त्यामुळे नेहमीकरीताच डोंग्याचा वापर केला जातो. त्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जो डोंगा हाकलतो, तो नाममात्र शुल्क घेत असल्याने सोयी-सुविधा देऊ शकत नाही. सोयी द्यायच्या म्हटले तर आकारलेले जास्तीचे शुल्क शेतमालक किंवा शेतमजुराला परवडणारे नाही. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.पुलाची निर्मिती कासवगतीनेही अडचण दूर व्हावी म्हणून अनेक वर्षापासून असलेली पुलाची मागणी आमदार पंकज भोयर यांच्या प्रयत्नातून तत्कालीन सरकारने मंजूर केली. दोन वर्षांपासून या पुलाचे काम कासवगतीने सुरू आहे. हीच गती कायम राहिल्यास अजून दोन वर्षे पुलाचे काम पूर्ण होण्याची चिन्हे दिसत नाही. पुलाचे काम लवकर करावे किंवा डोंग्याने जाण्यासाठी सोयी-सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfloodपूर