शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:11 IST

शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे.

ठळक मुद्दे ३८ आत्महत्या ठरल्या पात्र : १९ कुटुंबीयांना नाकारली मदत

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे.सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून २६ जानेवारी २०१५ या वर्षात तालुक्यात २२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यापैकी पाच आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्यात. या आत्महत्या वडगाव, राजणी, आर्वी, सोरटा, चोरांबा, टाकरखेडा, सालफळ, सालधरा, मोरांगणा, पाचोड (ठाकूर), वाढोणा, मांडला, धनोडी, वाढोणा, चिंचोली (डांगे), विरूळ (आ.), धनोडी, टोणा या गावांतील आहेत.२०१६ मध्ये २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात १४ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविल्या असून सहा आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सर्कसपूर, सावळापूर, हैबतपूर, बेल्हारा, विरुळ, पाचेगाव, नांदपूर, खुबगाव, पिंपळगाव, जळगाव, टाकळी, आर्वी, बेल्हारा, रसुलाबाद, वर्धमनेरी, धनोडी, निंबोली (शेंडे), चिंचोली (डांगे), मदना आदी गावांतील ते शेतकरी होते.२०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ७ आत्महत्या पात्र ठरल्या तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. दोन प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. या शेतकरी आत्हत्या सोनेगाव, कर्माबाद, सोरटा, पिंपळा, आर्वी, पाचोड, सावरखेडा, आर्वी, बोथली (कि़), पाचोड, धनोडी, हुसेनपूर, रोहणा, डबलीपूर, लाडेगाव, अहिरवाडा या गावांत झाल्यात.तालुक्यात तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या .आर्थिक विंवचनेतून झाल्या असताना १९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे कृषी धोरणाकडे गांभीर्याने पाहण गरजेचे झाले आहे. शासन, प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या