शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 23:11 IST

शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे.

ठळक मुद्दे ३८ आत्महत्या ठरल्या पात्र : १९ कुटुंबीयांना नाकारली मदत

सुरेंद्र डाफ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : शेतकरी आत्महत्यांनी अख्खा जिल्हा ढवळून निघत आहे. विविध उपाययोजना केल्यानंतरही तालुक्यात जानेवारी २०१५ ते २२ सप्टेंबर २०१७ या तीन वर्षांच्या कालावधीत एकूण ५६ शेतकऱ्यांनी मृत्यू जवळ केला आहे. आर्थिक संकटाला कंटाळून या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद महसूल विभागाने घेतली आहे.सततची नापिकी आणि कर्जाला कंटाळून २६ जानेवारी २०१५ या वर्षात तालुक्यात २२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या. यापैकी पाच आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्यात. या आत्महत्या वडगाव, राजणी, आर्वी, सोरटा, चोरांबा, टाकरखेडा, सालफळ, सालधरा, मोरांगणा, पाचोड (ठाकूर), वाढोणा, मांडला, धनोडी, वाढोणा, चिंचोली (डांगे), विरूळ (आ.), धनोडी, टोणा या गावांतील आहेत.२०१६ मध्ये २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात १४ शेतकरी आत्महत्या पात्र ठरविल्या असून सहा आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. सर्कसपूर, सावळापूर, हैबतपूर, बेल्हारा, विरुळ, पाचेगाव, नांदपूर, खुबगाव, पिंपळगाव, जळगाव, टाकळी, आर्वी, बेल्हारा, रसुलाबाद, वर्धमनेरी, धनोडी, निंबोली (शेंडे), चिंचोली (डांगे), मदना आदी गावांतील ते शेतकरी होते.२०१७ मध्ये १७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यात ७ आत्महत्या पात्र ठरल्या तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या. दोन प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. या शेतकरी आत्हत्या सोनेगाव, कर्माबाद, सोरटा, पिंपळा, आर्वी, पाचोड, सावरखेडा, आर्वी, बोथली (कि़), पाचोड, धनोडी, हुसेनपूर, रोहणा, डबलीपूर, लाडेगाव, अहिरवाडा या गावांत झाल्यात.तालुक्यात तीन वर्षांत ५६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्या .आर्थिक विंवचनेतून झाल्या असताना १९ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. बहुतांश आत्महत्या विष प्राशन करून करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आलेले आहे. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे कृषी धोरणाकडे गांभीर्याने पाहण गरजेचे झाले आहे. शासन, प्रशासन मात्र याबाबत गंभीर नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या