शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अंधाराचा नाश करू या, प्रकाशपूत्र होऊ चला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 22:12 IST

आजच्या काळात गरीब, श्रीमंत, दुर्बल, सबल, शोषक शोषित अशी दरी वाढत आहे. अजूनही दारिद्र्याने पिचलेला समाज पीडित जीवन जगत आहे. अशावेळी अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशपूत्र होऊन उजेड निर्माण करू असा संकल्प कवी संमेलनातून अनेक कवींनी केला.

ठळक मुद्देकवी संमेलनातून संकल्प : राष्ट्रीय कवी मंच व रंगलोक कला व्हिजनचे आयोजन

आॅनलाईन लोकमतवर्धा : आजच्या काळात गरीब, श्रीमंत, दुर्बल, सबल, शोषक शोषित अशी दरी वाढत आहे. अजूनही दारिद्र्याने पिचलेला समाज पीडित जीवन जगत आहे. अशावेळी अंधाराचा नाश करण्यासाठी प्रकाशपूत्र होऊन उजेड निर्माण करू असा संकल्प कवी संमेलनातून अनेक कवींनी केला. राष्ट्रीय कवी कला मंच व रंगलोक कला व्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रमोद नारायणे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंदना कोल्हे, शेखर सोळंके, प्रभाकर पाटील, गंगाधर पाटील, प्रभाकर उघडे उपस्थित होते. भास्कर नेवारे यांनी माझा शेतकरी राजाचं टपोर सपनं, कणसाला दाने यावे भरारून, अशी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारीत कविता सादर केली. कवी प्रशांत ढोले यांनी मित्रा, स्वत:च अस्तित्व निर्माण कर, तिमिराला दूर लोटून प्रकाशपर्वाला जवळ कर, अशी प्रकाशपर्वाची कविता सादर केली.प्रमोद नारायणे यांनी समरामधले सैन्य अजूनही दमले नाही, अजूनही माझे वादळ शमले नाही. ही गझल सादर केली. जयश्री कोटगीरवार यांनी काय भरवसा या कवितेद्वारे मानसाने मनाला मोठे करून आकाश व्यापून टाकावे अशी भावना व्यक्त केली. मोहन चिचपाने यांनी आजच्या व पूर्वीच्या काळाचे वर्णन कवितेतून केले. पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला, साधे घर साधी माणसे, कुठे होता बंगला असा प्रश्नही त्यांनी कविततेतून विचारला. संदीप धावडे यांनी वडाच्या पाकळ्या, उसवते टाके, वेदनेच्या धाके, चिडीचूप हा प्रेमविषयक अभंग सादर करून रसिकांची दाद मिळविली.डॉ. विद्या कळसाईत यांनी आम्ही स्वातंत्र्य झालो, पण स्वातंत्र्यांचा अर्थ आम्ही समजू शकलो काय? असा रोखठोक सवाल करणारी कविता सादर केली. संजय भगत यांनी दिव्याची जळते वात, तिचं थोर पावित्र्य, सावित्रीचं नाव मोठं शिक्षण क्षेत्र केलं पवित्र अशी कविता सादर करून रसिकांची दाद मिळवली. रमेश खुरगे यांनी जंजीर ही कविता सादर केली. अरविंद भोयर यांनी आम्हा ना म्हातारे, आम्ही आहोत ज्येष्ठ, उचलू आम्ही जबाबदारी, आम्ही नाही वेस्ट असे तरुणांना ठणकावणारी कविता सादर केली. स्रेहल हुकूम यांनी सावित्रीच्या लेकीला जरा साभाळून चालण्याची सूचना कवितेतून दिली. प्रा. जनार्दन ददगाळे यांनी कवीबद्दलची कविता सादर करून कवीचे समाजप्रबोधनातील महत्त्व अधोरेखित केले. प्रभाकर पाटील यांनी माणसं जोडावीत कशी ही कविता तर गंगाधर पाटील यांनी गझल सादर केली. वंदना कोल्हे, सुनील साधव, विजयकुमार यांनीही याप्रसंगी कविता सादर केल्या. विठ्ठल देवगडकर व शुभांगी सोळंके या कलाकारांनी सुरेख आवाजात गीत सादर केले.प्रा. प्रमोद नारायणे यांनी अध्यक्षीय भाषणातून कवितेचे महत्त्व सांगितले. समाज परिवर्तन करण्याची ताकद कवितेत असून अनेक चळवळी कवितेने क्रांतीकारक कार्य केल्याचेही ते म्हणाले. प्रारंभी गिरीष उपाध्ये यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रा. शेख हाशम, स्मिता देवगडकर, गुणवंत डकरे उपस्थित होते. संचालन रमेश खुरगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सुनील सावध यांनी मानले.