शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

बालकांना देणार वन्यजीव संरक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 22:25 IST

आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चार ठिकाणी विशेष केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

ठळक मुद्देचार ठिकाणी उभारणार विशेष केंद्र : २७.५० कोटी खर्च अपेक्षित

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चार ठिकाणी विशेष केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांना पाठविण्यात आला आहे.खेळता-खेळता मुला-मुलींना विविध वन्यप्राणी तसेच विविध प्रजातींच्या वृक्षांची माहिती मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा तालुक्यातील सेलूकाटे, पवनार, देवळी तालुक्यातील गुंजखेडा व आर्वी तालुक्यातील सारंगपुरी येथे वन विभागाच्या पुढाकारातून इको टुरिझम केंद्र तयार करण्यात येणार आहे. सदर चारही केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून पवनार येथील केंद्रासाठी ३ कोटी, सेलूकाटे येथील केंद्रासाठी १० कोटी, गुंजखेडा येथील केंद्रासाठी ९ कोटी तर सारंगपुरी येथील केंद्रासाठी ५.५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविला जात आहे.या विशेष केंद्राच्या माध्यमातून निसर्गाची ओळखच मुला-मुलींना होणार आहे. विशेष करून सदर केंद्र एकूण सहा ठिकाणी करण्याचे पुर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु, अंतिम टप्प्यात चार ठिकाण निश्चित करून त्याबाबतचा डीपीआर इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डला पाठविण्यात आला. त्या डिपीआरला मंजुरीही मिळाली आहे.सध्या सदर चारही केंद्राचा विषय अंदाजपत्रकाला मंजुरी मिळण्याच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्याला तात्काळ हिरवी झेंडी देत प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यास हे केंद्र वर्धेकरांसाठी फायद्याचे ठरणार आहे.सेवाग्राम विकास आराखड्यातून साकारणार पवनारचे केंद्रसेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून वर्धा शहरासह परिसरात अनेक विकास कामे केली जात आहेत. याच विकास आराखड्यातून वर्धा शहराशेजारच्या पवनार येथील निसर्ग ओळख केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या केंद्रात वन्य प्राण्यांसंदर्भात आवश्यक माहिती राहणार आहे. शिवाय औषधी वनस्पतीचीही माहिती भेट देणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.सेलूकाटेमध्ये पाण्याच्या समस्येने वाढविली अडचणवर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथे तयार करण्यात येणाऱ्या विशेष केंद्रासाठी १० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी तेथे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या समस्येवर लवकरच मात करण्यात येईल, अशा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.अंदाजपत्रकाला हिरवी झेंडी मिळताच कार्यवाहीसदर चारही केंद्राचा डिपीआर तयार करून तो येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने संबंधितांना पाठविला. त्या डिपीआरला इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डने मंजुरी दिली आहे. त्यानंतर वन विभागाने अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र, ते अंदाजपत्रक सध्या त्याच्याकडे धुळखात आहे. अंदाजपत्रकाला हिरवी झेंडी मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.बोटिंगचा आनंद लुटला येणारजिल्ह्यात पवनार, सेलूकाटे, गुंजखेडा, सारंगपुरी, बोर व ढगा येथे निसर्ग ओळख केंद्र तयार करण्याचे पूर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु, या विषयाला अंतिम स्वरूप देताना बोर व ढगा हे ठिकाण वगळण्यात आले. सदर चारही ठिकाणी प्रामुख्याने साहसी खेळ, बच्चेकंपनीसाठी बगीचा, वन उद्यान, मचांग आदी तयार करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी बोटींगची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याने नागरिकांना त्याचा आनंद लुटला येणार आहे.

टॅग्स :PavnarपवनारSewagramसेवाग्राम