शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

संपूर्ण विमा ग्राम योजनेकडे ग्रामस्थांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 00:32 IST

ग्रामीण भागातील नागरिकांनाही विम्याचे कवच देता यावे. त्यांच्या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने डाक विभागाच्यावतीने संपूर्ण विमा ग्राम योजना कार्यान्वीत केली. या योजनेची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १३ गावांची निवड करण्यात आली.

ठळक मुद्देउद्दिष्ट ९,६४८, पण प्रत्यक्ष विम्याचे कवच केवळ २,६२६ ग्रामस्थांना

महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रामीण भागातील नागरिकांनाही विम्याचे कवच देता यावे. त्यांच्या दु:खाच्या प्रसंगी त्यांना आर्थिक आधार मिळावा या हेतूने केंद्र सरकारने डाक विभागाच्यावतीने संपूर्ण विमा ग्राम योजना कार्यान्वीत केली. या योजनेची वर्धा जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी १३ गावांची निवड करण्यात आली. तेथील रहिवासी असलेल्या कमीत कमी ९ हजार ६४८ नागरिकांचा विमा काढणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ २ हजार ६२६ नागरिकांनाच विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.सुमारे १०० वर्षांपासून नागरिकांना सूविधा देणारे डाक विभाग बदलत्या काळानुसार कात टाकत आहे. नुकतीच डाक विभागाकडून आॅनलाईन पासपोर्ट नोंदणी सेवा सुरू करण्यात आली आहे. ती सेवा नागरिकांसाठी फायद्याचीही ठरत आहे. परंतु, काही योजना केवळ कागदावरच राहत असल्याचे दिसून येते. दु:खाच्या प्रसंगी ग्रामीण भागातील नागरिकांनाही आर्थिक आधार मिळावा म्हणून केंद्र सरकारने संपूर्ण ग्राम विमा योजना सुरू केली. शिवाय त्याच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी डाक विभागावर सोपविली. वर्धा जिल्ह्यात सदर योजनेची प्रभावी अंमल बजावणी करण्यासाठी गत वर्षी तरोडा या एका गावाची निवड करण्यात आली होती. पण त्यानंतर सदर योजनेसाठी आणखी १२ गावांची निवड करण्यात आल्याने ही संख्या १३ इतकी झाली. सदर १३ गावांमधील प्रत्येक कुटुंबातील एकाला विम्याचे कवच देणे असे गृहीत धरून ९ हजार ६४८ इतके उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, निवडलेल्या १३ गावांमधील केवळ २ हजार ६२६ ग्रामीण नागरिकांनाच आतापर्यंत विम्याचे कवच देण्यात आले आहे. त्यामुळे सदर योजनेच्या प्रभावीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.सांसद आदर्श ग्रामच्या दिव्याखाली अंधारसंपूर्ण विमा ग्राम योजनेचा एक भाग म्हणून सांसद आदर्श ग्राम योजनेसाठी निवड करण्यात आलेल्या पारडी व मदनी या दोन्ही गावातील प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला डाक विभागाच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या योजनेच्या माध्यमातून विम्याचे कवच देण्याचे निश्चित करण्यात आले. या दोन्ही गावांमध्ये एकूण १ हजार ८१ जणांना विम्याचे कवच देणे क्रमप्राप्त होते. परंतु, आतापर्यंत केवळ १०२ जणांनाच विम्याचे कवच देण्यात आल्याने योजनेची प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे.या गावांची झाली निवडडाक विभागाच्या संपूर्ण विमा ग्राम योजनेसाठी तरोडा, कोरा, मंगरूळ (द.), आर्वी छोटी, आजणसरा, घोराड, सालोड (हि.), कवठा, सोनोरा (ढो.), गौळ, पिंपळगाव (लु.), चिस्तूर, सेलसूरा या गावांची निवड करण्यात आली आहे. परंतु, अद्यापही या गावांमधील ६ हजार ८०७ नागरिकांना विम्याचे कवच देण्यात आले नसल्याचे वास्तव आहे.वयानुसार ठरतो विम्याचा हप्ताडाक विभागाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या संपूर्ण विमा ग्राम योजना ही जिल्ह्यातील १३ गावांमध्ये राबविली जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना विम्याचे कवच देणे हा सदर योजनेचा मुख्य उद्देश आहे. विम्याचे कवच घेणाºयाच्या वयोमर्यादेवर विम्याचा हप्ता निश्चित केला जातो. शिवाय त्याला विम्याचे कवच दिल्या जात असल्याचे सांगण्यात आले.संपूर्ण विमा ग्राम योजनेसाठी जिल्ह्यातील १३ गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमधील २ हजार ६२६ ग्रामस्थांना आतापर्यंत विम्याचे कवच देण्यात आले आहे. प्राप्त झालेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत आहेत.- एम.बी. लाखोरकर, अधीक्षक, डाकघर,वर्धा.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस