शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

७९ वर्षांत दीड कोटींच्या वर विद्यार्थ्यांना दिले हिंदीचे धडे

By admin | Updated: July 4, 2015 00:18 IST

वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करण्याचा विचार सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडला होता.

दिनविशेष : राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या माध्यमातूनहिंदीची लवचिकता तिला सहज बनवितेश्रेया केने वर्धावर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करण्याचा विचार सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडला होता. ४ जुलै १९३६ पासून कार्यरत या संस्थेच्या माध्यमातून देशविदेशात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे. या ७९ वर्षांच्या काळात आजवर १ कोटी ६६ लाखाहून अधिक हिंदीतेतर लोकापर्यंत या प्रचार समितीच्या माध्यमातून हिंदी भाषा पोहचवली आहे. भारतातील पूर्वोत्तर राज्यांना देशासोबत जोडण्यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समितीचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या राज्यात हिंदी भाषेचा प्रचार करून तेथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केल्यानंतर सैन्यभरती दरम्यान तेथील लोकांचा प्रथमच हिंदीशी परिचय झाला. भारतातील हिंदीतर राज्यात हिंदीचा प्रचार करण्यासाठी गांधीजींनी घेतलेल्या सभेला सुभाषचंद्र बोस उपस्थित होते. या माध्यमातून या सात राज्यात हिंदीचा प्रसार झाला. नागालँड राज्याने हिंदी भाषा अभ्यासक्रमात अनिवार्य केली आहे. वर्धा येथे पूर्वोत्तर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.प्रादेशिक भाषेची अस्मिता जपताना हिंदीचा प्रचार करण्याचे आव्हान संस्थेकडून लीलया पेलण्यात येत आहे. भारतात किंवा भारताबाहेर जेव्हा दोन भिन्न प्रांतातील आणि भिन्न प्रादेशिक भाषा बोलणारे व्यक्ती एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यातील संपर्क भाषा हिंदी असायला हवी, यासाठी संस्था प्रयत्नरत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी यांनी दिली. हिंदी ही राजभाषा असून संविधानाने तिचा स्विकार केला आहे. तरीही या भाषेला विरोध होतो. हिंदीप्रती आपुलकी निर्माण व्हावी, जनसामान्यांनी तिचा स्वीकार करावा, या भाषा प्रचार तंत्राचा वापर करून त्याची अंमलबजावणी करण्याचा कटाक्ष असतो. हिंदीच्या प्रचाराकरिता समितीच्यावतीने सतत कार्य सुरू आहे. आता त्याच्या मदतीला वर्धेत हिंदी विद्यापीठ आले आहे. त्याचाही लाभ होत आहे. हिंदी भाषा ही सहज, सोपी व बोधगम्य आहे. या विशेषतेमुळेच हिंदी भिन्न संस्कृतीतील व्यक्तींना जोडते. हिंदीची लवचिकता तिला सहज स्वीकार्ह बनविते. भारतात विविध भाषा आणि संस्कृतीचे लोक वास्तव्य करतात. यात एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी भावात्मक एकता आवश्यक आहे. हिंदी भाषा यात महत्त्वाची भूमिका पार पाडते, असे मत राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. त्रिपाठी यांनी व्यक्त केले.हिंदी भाषेची एक वेगळी क्षमता आहे. हिंदी क्रियापदाचा वाक्यात उपयोग केल्यास ते वाक्य हिंदी भाषेतील ठरते. विविध २१ देशात हिंदी प्रचार समितीचे कार्य आहे. दरवर्षी ३ लाख विद्यार्थी हिंदी भाषा परीक्षा देतात. ४ जुलै १९३६ रोजी स्थापित या समितीचे पहिले अध्यक्ष भारतीय गणराज्याचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद होते. देश पारतंत्रात असतानाही त्यांनी हिंदी प्रचार कार्याला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. भाषेचा प्रचार करताना ती स्वीकार्ह असावी, तिची सक्ती होऊ नये याकरिता डॉ. राजेंद्र प्रसाद आग्रही होते. या मूल्यांची देण त्यांच्याकडून संस्थेला मिळाली. त्याची आजही अंमलबजावणी करण्याचा कटाक्ष असतो.हिंदी भाषा प्रचार हाच या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. याला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन प्रचारचे माध्यम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न राहील. हिंदी भाषेतून रोजगार निर्मितीला वाव आहे. -प्रा. अनंतराम त्रिपाठी प्रधानमंत्री, राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा