शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची धुळ पेरणीकडे पाठ

By admin | Updated: May 27, 2014 23:52 IST

आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्‍यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे.

पावसाची प्रतीक्षा: महागड्या बियाण्यांमुळे अडचण

वर्धा : आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्‍यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. उत्पन्नात वाढ घेण्याकरिता जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील शेतकरी ही पद्धत अवलंबित होते; आज मात्र ही पद्धत नावालाच उरली आहे.

पावसाचे संकेत दिसताच शेतकरी धुळ पेरणीच्या कामाला लागत होते. यात एका एकरात किमान पाच किलो बियाणे शेतकरी पेरत होता. या वेळी घरचेच बियाणे वापरले जायचे. यामुळे विशेष फरक पडत नव्हता. धूळ पेरणीत डाब डुब पद्धत वापरली जात होती. यात सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात येत आहे. यातून पाऊस येण्यापूर्वी उगविलेल्या रोपट्यांची येणार्‍या पावसात चांगली वाढ होत होते. यामुळे उत्पन्न वाढण्याकरिता मदत होते, अशी धारणा पूर्वी होती. यातून उत्पन्नही वाढत होते; मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना पावसानंतर केलेल्या पेरणीतूनच योग्य उत्पादन मिळण्याची शक्यता नाहिली नाही, मग धुळपेरणी कशी टिकणार.

आज धुळपेरणी होत नाही असेही म्हणता येणार नाही. ज्या शेतकर्‍यांकडे ओलीताची सोय आहे, ते आजही धुळ पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात गत तीन चार वर्षांपासून सरासरी ६0 हेक्टरवरील शेतकर्‍यांचे धुळ पेरणीचे नियोजन असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यातून दिसत आहे. पूर्वी जिल्ह्यात सुमारे ५00 हेक्टरवर पेरणी होत असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या काळात ठरल्यानुसार मान्सून येत होता. यामुळे शेतकर्‍यांच्या मान्सूनपूर्व पेरणी साधत होती. आता निसर्गाचा अनियमितपणाच या पारंपारीक पद्धतीला मारक ठरत आहे.

धूळ पेरणी झाल्यानंतर त्याची उगवण झाली नाही तर मोड होते. मोड झाल्यास महागडे बियाणे आणून पेरणे शक्य नाही.(प्रतिनिधी)