शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

जिल्ह्यातील शेतकर्‍यांची धुळ पेरणीकडे पाठ

By admin | Updated: May 27, 2014 23:52 IST

आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्‍यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे.

पावसाची प्रतीक्षा: महागड्या बियाण्यांमुळे अडचण

वर्धा : आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्‍यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्‍यांनी याकडे पाठ फिरविली आहे. उत्पन्नात वाढ घेण्याकरिता जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील शेतकरी ही पद्धत अवलंबित होते; आज मात्र ही पद्धत नावालाच उरली आहे.

पावसाचे संकेत दिसताच शेतकरी धुळ पेरणीच्या कामाला लागत होते. यात एका एकरात किमान पाच किलो बियाणे शेतकरी पेरत होता. या वेळी घरचेच बियाणे वापरले जायचे. यामुळे विशेष फरक पडत नव्हता. धूळ पेरणीत डाब डुब पद्धत वापरली जात होती. यात सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात येत आहे. यातून पाऊस येण्यापूर्वी उगविलेल्या रोपट्यांची येणार्‍या पावसात चांगली वाढ होत होते. यामुळे उत्पन्न वाढण्याकरिता मदत होते, अशी धारणा पूर्वी होती. यातून उत्पन्नही वाढत होते; मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्‍यांना पावसानंतर केलेल्या पेरणीतूनच योग्य उत्पादन मिळण्याची शक्यता नाहिली नाही, मग धुळपेरणी कशी टिकणार.

आज धुळपेरणी होत नाही असेही म्हणता येणार नाही. ज्या शेतकर्‍यांकडे ओलीताची सोय आहे, ते आजही धुळ पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात गत तीन चार वर्षांपासून सरासरी ६0 हेक्टरवरील शेतकर्‍यांचे धुळ पेरणीचे नियोजन असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यातून दिसत आहे. पूर्वी जिल्ह्यात सुमारे ५00 हेक्टरवर पेरणी होत असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या काळात ठरल्यानुसार मान्सून येत होता. यामुळे शेतकर्‍यांच्या मान्सूनपूर्व पेरणी साधत होती. आता निसर्गाचा अनियमितपणाच या पारंपारीक पद्धतीला मारक ठरत आहे.

धूळ पेरणी झाल्यानंतर त्याची उगवण झाली नाही तर मोड होते. मोड झाल्यास महागडे बियाणे आणून पेरणे शक्य नाही.(प्रतिनिधी)