पावसाची प्रतीक्षा: महागड्या बियाण्यांमुळे अडचण वर्धा : आकाशात ढग दाटू लागले. शेतकर्यांची पेरणीकरिता लगबग सुरू झाली. पूर्वी ढग दाटताच धुळ पेरणी पद्धत होती; मात्र निसर्गाची साथ बियाण्यांच्या वाढत्या किमती यामुळे शेतकर्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. उत्पन्नात वाढ घेण्याकरिता जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील शेतकरी ही पद्धत अवलंबित होते; आज मात्र ही पद्धत नावालाच उरली आहे. पावसाचे संकेत दिसताच शेतकरी धुळ पेरणीच्या कामाला लागत होते. यात एका एकरात किमान पाच किलो बियाणे शेतकरी पेरत होता. या वेळी घरचेच बियाणे वापरले जायचे. यामुळे विशेष फरक पडत नव्हता. धूळ पेरणीत डाब डुब पद्धत वापरली जात होती. यात सोयाबीन व कपाशीची लागवड करण्यात येत आहे. यातून पाऊस येण्यापूर्वी उगविलेल्या रोपट्यांची येणार्या पावसात चांगली वाढ होत होते. यामुळे उत्पन्न वाढण्याकरिता मदत होते, अशी धारणा पूर्वी होती. यातून उत्पन्नही वाढत होते; मात्र आता निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकर्यांना पावसानंतर केलेल्या पेरणीतूनच योग्य उत्पादन मिळण्याची शक्यता नाहिली नाही, मग धुळपेरणी कशी टिकणार. आज धुळपेरणी होत नाही असेही म्हणता येणार नाही. ज्या शेतकर्यांकडे ओलीताची सोय आहे, ते आजही धुळ पेरणी करीत आहेत. जिल्ह्यात गत तीन चार वर्षांपासून सरासरी ६0 हेक्टरवरील शेतकर्यांचे धुळ पेरणीचे नियोजन असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यातून दिसत आहे. पूर्वी जिल्ह्यात सुमारे ५00 हेक्टरवर पेरणी होत असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली आहे. या काळात ठरल्यानुसार मान्सून येत होता. यामुळे शेतकर्यांच्या मान्सूनपूर्व पेरणी साधत होती. आता निसर्गाचा अनियमितपणाच या पारंपारीक पद्धतीला मारक ठरत आहे. धूळ पेरणी झाल्यानंतर त्याची उगवण झाली नाही तर मोड होते. मोड झाल्यास महागडे बियाणे आणून पेरणे शक्य नाही.(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील शेतकर्यांची धुळ पेरणीकडे पाठ
By admin | Updated: May 27, 2014 23:52 IST